Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राणे-शिवसेना संघर्षातून काय साध्य झालं?

या राड्यातून भाजपाला अनेक गोष्टी साध्य करायचा आहेत. एक मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलिन करुन नकारात्मक दाखवणे, राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना आणि कोरोनाचे संकट असताना शिवसैनिक कसे रस्त्यावर उतरुन आंदोलन करताहेत? यावर मुख्यमंत्री गप्प का? राज्यातील पोलीस खाते कसे बेकायदशीर कारवाई करते आणि सरकारच्या इशाऱ्यावर कसे चालते, इत्यादी अनेक गोष्टी भाजपाला या संघर्षातून साध्य करायचा आहेत.

  • By Amrut Sutar
Updated On: Aug 24, 2021 | 03:54 PM
राणे-शिवसेना संघर्षातून काय साध्य झालं?
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्रातील चार नेत्यांना मंत्रीपदाची संधी मिळाली. साधारण एक ते दिड महिन्याच्या कालावधीनंतर हे चार मंत्री महाराष्ट्रात परत आले, तेव्हा त्यांनी लोकांमध्ये पोहोचण्यासाठी आणि लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी जन आशीर्वाद यात्रेचे आयोजन केले. या 4 पैकी 3 मंत्र्यांची जन आशीर्वाद यात्रा संपली, मात्र केंद्रीयमंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा सुरु आहे.

नारायण राणे यांची १९ ऑगस्टला मुंबईतून जन आशीर्वद यात्रेला सुरुवात केली. २६ ऑगस्टला या जन आशीर्वाद यात्रेचा समारोप होणार आहे. मात्र, सोमवारी रायगडमध्ये जन आशीर्वाद यात्रेत बोलताना नारायण राणे यांनी “मुख्यमंत्र्यांना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव माहिती नाही, त्यावेळी मी त्यांच्याजवळ असतो तर, मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारली असती.” असे वादग्रस्त वक्तव्य केले. आणि येथूनच राणे-शिवसेना संघर्षाची ठिणगी पडली.

मुळात कोकणात भाजपाची ताकद वाढविण्यासाठी आणि शिवसेनेला आव्हान निर्माण करण्यासाठी म्हणून भाजपाने नारायण राणे यांना पक्षात घेतलं. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी राणेंना केंद्रीय मंत्रीपद दिले असल्याची राजकीय वर्तुळत चर्चा आहे. तसेच, आगामी मुंबई महानगरपालिकेत भाजपाला जास्तीत जास्त यश मिळवायचे असेल तर राणेंना शिवसेनेसमोर उभे केले पाहिजे ही रणनिती भाजपाने आखली आहे.

राणे आणि शिवसैनिकांचा मूळ डिएनए एकच आहे. कारण, राणेंची आक्रमकता, टीका करण्याची पद्धत, एकेरी भाषेच उल्लेख तसेच राणेंची टीका थेट शिवसेनेच्या नेतृत्त्वावर असल्याने ती शिवसैनिकांच्या अधिक जिव्हारी लागते. त्यामुळे शिवसैनिक पेटून उठतात. आता राणेंच्या वक्तव्याचा निषेध करताना राज्यातील विविध भागात भाजपच्या कार्यालयांवर दगडफेक करतायेत. यातून भाजपाचा संविधानीक पदावर असणाऱ्या मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलिन करण्याचा मुख्य प्रयत्न आहे. राणे-शिवसेना जर असाच संघर्ष चालू राहिला तर, माध्यमं सुद्धा फक्त या दोघांचीच दखल घेतील. आणि जर महाराष्ट्रात राणेंना अटक झाली तर, त्याचे देशभर पडसाद उमटतील आणि यामुळे भाजप आणि राणे हे लक्ष वेधून घेतील.

जन आशीर्वाद यात्रेला मिळाणारा प्रतिसाद शिवसेनेच्या डोळ्यात खूपत आहे, असं भाजपाटं म्हणण आहे.

या राड्यातून भाजपाला अनेक गोष्टी साध्य करायचा आहेत. एक मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलिन करुन नकारात्मक दाखवणे, राज्यात मुख्यमंत्री शिवसेनेचा असताना आणि कोरोनाचे संकट असताना शिवसैनिक रस्त्यावर उतरुन कसे आंदोलन करताहेत? यावर मुख्यमंत्री गप्प का? राज्यातील पोलीस खाते कसे बेकायदशीर कारवाई करते आणि सरकारच्या इशाऱ्यावर कसे चालते, इत्यादी अनेक गोष्टी भाजपाला या संघर्षातून साध्य करायचा आहेत.

नाराय़ण राणे यांचा शिवसेनेवर किंबहुना उद्धव ठाकरेंवर अधिक राग आहे, आणि शिवसैनिक नारायण राणे यांचा तिरस्कार करताहेत. भाजपाला या दोघांचा असाच संघर्ष पेटताना पाहयचे आहे, आणि यातून शिवसेनेला अधिकाधिक कसे नामोहरम करता येईल, शिवसेनेच खच्चीकरण कसे करता येईल हे पाहयचे आहे. भविष्यात राणेंची ढाल वापरुन भाजपला पक्षाची ताकद वाढवायची आहे. एवढे मात्र नक्की.

Web Title: What was achieved through rane shiv sena struggle nrkk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2021 | 03:54 PM

Topics:  

  • Narayan Rane vs Shiv Sena

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.