
उन्हाच्या कडाक्यानंतर पावसाळ्याने हवेत गारवा निर्माण होतो आणि मनाला शातंता मिळते. त्याचप्रमाणे पावसाळ्यात खाण्यापिण्याच्या सवयींकडे दुर्लक्ष केल्यास शरीरावर याचे वाईट परिणाम होतात. अनेक प्रकारच्या हिरव्या भाज्या पाहून खाण्याची ईच्छा होत असेल तर जरा थांबा! कारण पावसाळ्यात उघड्या डोळ्यांनी न दिसणारे खूप प्रकारचे किटाणू आणि किडे त्यावर असतात. तुम्ही जर डाएट किंवा वजन कमी करण्याच्या विचारात आहात तर पालक, ब्रॉकूली, कोशींबीर करत असाल तर त्याचे तोटेही जाणून घ्या. पावसाळ्यात जर तुम्हाला हिरव्या पालेभाज्या खायच्याच असतील तर त्यांना मीठ किंवा लोणी लावून नंतर पाण्याने धुवून खाणे आरोग्यासाठी केव्हाही चांगले.
पावसाळ्यात कोबी, फुलकोबी आणि पालक यासारखे पदार्थ खाऊ नये कारण कीटक यामध्ये आपले घर बनवतात.त्यांना आपण उघड्या डोळ्यांनी पाहूही शकत नाही. या भाज्या खाण्यामुळे पोटदुखी आणि इतर संबंधित समस्या वाढतात.
पावसाळ्यात या भाज्या धुवूनही त्याची घाण बाहेर पडत नाही. या भाजीपाला मुख्यत्वे दलदलीच्या जमिनीतून येत असल्याने इन्फेक्शन होण्याचा धोका अधिक असतो.
मान्सूनमध्ये सूर्यप्रकाश भाज्यांपर्यंत न पोहोचल्याने किटाणूंची संख्या वाढते आणि तशा भाज्या खाल्ल्याने शरीरात संसर्गजन्य रोगाना आमंत्रण मिळते.
भाज्या हिरव्या आणि चमकदार भासविण्यास रंग भरलेल्या इंजेक्शन दिले जाते. बनावट रंगा परीणाम शरीरावर होत असतो. सध्याबाजारात असे खूपदा केले जाते.
रस्त्यावरील हिरव्या पालेभाज्यांनी बनलेले खाऊ नका. त्या चांगल्या प्रकारे धुतल्या गेलेल्या नसतात. त्यामुळे पोटात बॅक्टेरीया गेल्यास इन्फेक्शन होऊ शकते. यामुळे अपचन, जंत, येऊ शकतात.