गरोदरपणात रोज शहाळ्याचे पाणी पिणे योग्य आहे की अयोग्य (फोटो सौजन्य - iStock)
गरोदरपणात संतुलित आणि पौष्टिक आहार हा आई आणि बाळ दोघांसाठीही अत्यंत महत्त्वाचा असतो. निरोगी आहारामुळे बाळाचा विकास होण्यास मदत होतेच, शिवाय गर्भधारणेच्या गुंतागुंतीचा धोकाही कमी होतो. नारळ पाण्याचे सेवन करणे देखील फायदेशीर मानले जाते. बरेचदा गरोदर राहिल्यानंतर आईला नारळ पाणी पिण्याचा सल्ला देण्यात येतो. मात्र रोज नारळ पाणी पिणे योग्य आहे की नाही?
नारळाचे पाणी हे सौम्य गोड, थंड आणि चवीला पौष्टिक असते. त्यात नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्स असतात, जे शरीराला डिहायड्रेशनपासून वाचवतात. याशिवाय, त्यात पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि सोडियम सारखे पोषक घटक असतात, जे थकवा, बद्धकोष्ठता, स्नायू पेटके नियंत्रित करण्यास मदत करतात. पण ते दररोज पिणे सुरक्षित आहे का? डॉ. अंजली कुमार, MBBS, MD – प्रसूती आणि स्त्रीरोगशास्त्र यांनी अलीकडेच त्यांच्या इन्स्टाग्राम व्हिडिओमध्ये याबद्दल शेअर केले आहे, जे प्रत्येक गर्भवती महिलेला माहीत असले पाहिजे (फोटो सौजन्य – iStock)
रोज नारळ पाणी पिण्याने काय होते?
रोज नारळ पाणी पिणे चांगले आहे का?
डॉ. कुमार म्हणतात की दररोज एक छोटा ग्लास नारळ पाणी पिणे सामान्यतः सुरक्षित मानले जाते. तथापि, दररोज फक्त एकाच प्रकारचे पेय पिणे टाळावे. गर्भधारणेदरम्यान अन्नात विविधता असणे महत्वाचे आहे जेणेकरून शरीराला सर्व आवश्यक पोषक तत्वे मिळू शकतील. नारळ पाण्याशिवाय हेल्दी पर्याय काय आहेत जाणून घ्या
रोज सकाळी रिकाम्या पोटी नारळाचे पाणी पिण्याचे फायदे जाणून घ्या
मधुमेह असल्यास काळजी
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जर तुम्हाला गरोदरपणात मधुमेह असेल तर मर्यादित प्रमाणात नारळ पाणी घ्या कारण त्यात नैसर्गिक साखर असते. जास्त प्रमाणात नारळ पाणी पिण्यामुळे शरीरातील आवश्यक मीठ काढून टाकता येते. पण याचे अतिसेवन करणे आपल्या बाळासाठी हानिकारक ठरू शकते. तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा नारळपाण्याचे सेवन करू शकता.
संतुलित आहार गरजेचा
गरोदरपणात संतुलित आहार घेणे अत्यंत गरजेचे आहे
डॉ. कुमार यांचा असा विश्वास आहे की गरोदरपणातील आहारात फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, पातळ प्रथिने आणि निरोगी चरबी यांचा समतोल असावा. हे सर्व आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे आणि ऊर्जा प्रदान करतात, जे आई आणि बाळ दोघांच्याही आरोग्यासाठी आवश्यक आहेत. त्यामुळे गरोदरपणात डॉक्टरांच्या सल्ल्याने आहार घ्यावा आणि बाळाच्या विकासाकडे लक्ष द्यावे
आठवडाभर नियमित करा नारळ पाण्याचे सेवन, शरीर आणि त्वचेमध्ये दिसून येतील अनेक सकारात्मक बदल
डॉक्टरांचा सल्ला
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.