Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बद्धकोष्ठतेची समस्या होईल कायमची दूर! सकाळी उठल्यानंतर ‘या’ पद्धतीने करा भिजवलेल्या अंजीरचे सेवन, हार्ट अटॅकचा धोका होईल कमी

अंजीर खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. शरीरात वाढलेले पित्त आणि ऍसिडिटी कमी करण्यासाठी अंजीर खावे. नियमित पाण्यात भिजवलेले दोन किंवा तीन अंजीर खावेत.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 16, 2025 | 05:30 AM
बद्धकोष्ठतेची समस्या होईल कायमची दूर! सकाळी उठल्यानंतर 'या' पद्धतीने करा भिजवलेल्या अंजीरचे सेवन

बद्धकोष्ठतेची समस्या होईल कायमची दूर! सकाळी उठल्यानंतर 'या' पद्धतीने करा भिजवलेल्या अंजीरचे सेवन

Follow Us
Close
Follow Us:

धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, आहारात होणारे बदल, जंक फूडचे अतिसेवन, पाण्याची कमतरता आणि पोषक घटकांचा अभाव निर्माण झाल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात. या बदलांकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. बऱ्याचदा आहारात तिखट किंवा अतितेलकट पदार्थांचे खूप जास्त सेवन केल्यामुळे शरीराची पचनक्रिया बिघडून जाते आणि बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवते. पोटात वाढलेला गॅस, अपचन आणि ऍसिडिटीमुळे शरीरात अतिरिक्त पित्त जमा होते. यामुळे आतड्यांमध्ये विषारी घटक तसेच साचून राहतात. आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक आरोग्याला हानी पोहचवतात. त्यामुळे शरीराची काळजी घेणे आवश्यक आहे. बद्धकोष्ठता झाल्यानंतर अनेक लोक दुर्लक्ष करतात. पण सतत दुर्लक्ष केल्यास आरोग्यासंबंधित गंभीर आजारांची लागण होऊ शकते.(फोटो सौजन्य – istock)

कपाळावर टक्कल पडण्याची भीती वाटते? मग सकाळच्या नाश्त्यात नियमित खा बीट आवळा डोसा, महिनाभरात कपाळावर येतील केस

कायमच निरोगी आणि आनंदी राहण्यासाठी पोषक आहार घेणे आवश्यक आहे. आहारात सुकामेवा खाल्यास शरीराला अनेक फायदे होतात. बदाम, अक्रोड, खजूर, मनुका इत्यादी अनेक पदार्थ अतिशय आवडीने खाल्ले जातात. त्यातील गुणकारी पदार्थ म्हणजे सुकवलेले अंजीर. अंजीर खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. यामध्ये फायबर, कॅल्शियम, लोह आणि अँटिऑक्सिडंट्स इत्यादी अनेक घटक आढळून येतात. हाडांमध्ये वाढलेली कमजोरी, सतत अशक्तपणा, थकवा आणि हार्मोन्सचे असंतुलन इत्यादी समस्या अतिशय समस्या झाल्या आहेत. नियमित भिजवलेले अंजीर खाल्ल्यास शरीरावर अनेक सकारात्मक परिणाम दिसून येतात. आज आम्ही तुम्हाला अंजीर खाण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत.

अंजीर खाल्यामुळे शरीराला होणारे फायदे:

पचनक्रिया निरोगी राहते:

दैनंदिन आहारात अंजीरचे नियमित सेवन केल्यास शरीरात अनेक फायदे होतात. अंजीरामध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळून येते, ज्यामुळे आतड्यांच्या हालचाली सुधारतात. बऱ्याचदा अन्नपदार्थ सहज पचन होत नाही किंवा पोट फुगल्यासारखे वाटते अशावेळी भिजवलेले अंजीर खावे. यामुळे शरीरातील जुनाट बद्धकोष्ठता कायमची नष्ट होईल आणि आरोग्य सुधारेल. नियमित पोट व्यवस्थित स्वच्छ होत नसेल तर भिजवलेल्या अंजिराचे सेवन करावे.

हृदयाचे आरोग्य सुधारते:

शरीरात साचून राहिलेले खराब कोलेस्ट्रॉल हृदयाच्या रक्तवाहिन्या पूर्णपणे ब्लॉक करून टाकते. यामुळे कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक किंवा स्टोक येऊ शकतो. शरीरात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल कायमचे नष्ट करण्यासाठी नियमित सकाळी उठल्यानंतर भिजवलेले एक किंवा दोन अंजीर खावे. यामध्ये असलेल्या पोटॅशियममुळे हृदयावर जास्तीचा तणाव येत नाही आणि रक्तदाब कायमच नियंत्रणात राहतो. हार्ट अटॅकचा धोका कमी करण्यासाठी अंजीर खाण्याचा सल्ला दिला जातो.

मधुमेह राहील कायमच नियंत्रणात! नियमित फॉलो करा १०-१०-१० चा नियम, शरीरात दिसून येईल सकारात्मक बदल

हाडे मजबूत होतात:

वाढत्या वयात हाडांमधील कॅल्शियम कमी होऊन जाते. तसेच हाडांसंबंधित गंभीर समस्या उद्भवतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी एक किंवा दोन अंजीर खावे.यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस इत्यादी अनेक घटक आढळून येतात. महिलांमध्ये रजोनिवृत्तीनंतर कॅल्शियमची कमतरता मोठ्या प्रमाणावर जाणवते. त्यामुळे नियमित एक किंवा दोन अंजीर खावे.

FAQs (संबंधित प्रश्न)

बद्धकोष्ठता म्हणजे काय?

बद्धकोष्ठता म्हणजे मल (शौच) बाहेर टाकताना वारंवार त्रास होणे आणि आतड्याची हालचाल क्वचितच होणे.या स्थितीत आठवड्यातून तीनपेक्षा कमी वेळा आतड्याची हालचाल होऊ शकते.

बद्धकोष्ठतेची कारणे काय आहेत?

फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्ये यांसारख्या उच्च फायबरयुक्त पदार्थांचे कमी सेवन. पुरेसे पाणी न पिणे, ज्यामुळे आतड्यातील मल कठीण होतो.

बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी उपाय:

आहारात फळे, भाज्या, आणि संपूर्ण धान्यांचा समावेश करा. जास्त चरबीयुक्त पदार्थ आणि प्रक्रिया केलेले अन्न टाळा. दिवसातून किमान 6 ते 8 ग्लास पाणी प्या. कोमट पाणी पिणे फायदेशीर ठरू शकते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: The problem of constipation will be gone forever consume soaked figs in this way after waking up in the morning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2025 | 05:30 AM

Topics:  

  • constipation home remedies
  • Digestion Problem
  • fig benefits

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.