
बिबटयांना पकडा म्हणजे आम्ही अंगणात खेळू शकू, देवठाणच्या विद्यार्थ्यांची भाबडी विनंती
देवठाण परिसरातील वाढत्या बिबट्या-उपद्रवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या देवठाण शाळेत वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांच्या शंकांचे निरसन करताना अधिकाऱ्यांनी सर्व प्रश्नांना सोप्या अशा भाषेत उत्तरे दिली.
अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वास देत सांगितले की, योग्य सावधगिरी बाळगल्यास बिबट्यांचे हल्ले टाळता येऊ शकतात. अलीकडेच बिबट्याच्या हल्ल्यात एका बालकाचा मृत्यू झाल्याने परिसरात निर्माण झालेली भीती मुलांच्या वागण्यात स्पष्ट दिसत होती. या भीतीतून मुलांना बाहेर काढण्यासाठी आणि सुरक्षित वर्तनाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी वनपाल देविदास जाधव, विठ्ठल पारधी, वनरक्षक अंकुश काकडे आणि एकनाथ पारेकर यांनी मुलांशी सविस्तर चर्चा केली.
BMC Election : महापालिका निवडणुका मार्चनंतर? मुंबई, ठाणे, पुण्यासह 28 मनपांच्या निवडणुका होणार?