गोंदिया जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात 9 वर्षीय रुची पारधीचा मृत्यू झाला. वडिलांसोबत शेतात असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केला. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात भीती व संताप पसरला आहे.
ज्यभर गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. याला अपवाद महाबळेश्वर देखील नाही. गेल्या काही दिवसांपासून महाबळेश्वर तालुक्यातील पांगारी आणि भोसे या परिसरात बिबट्याची दहशत वाढत जात आहे.
बिबट्याच्या मुक्त वावरामुळे भारतीय जनता पार्टी–शिवसेना महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार अँड. मृणाल गुलाब म्हाळसकर यांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
निरावागज परिसरातून मंगळवारपासून एक ७५ वर्षीय वृद्ध महिला अचानक बेपत्ता झाली आहे. शेतात फिरत असताना, अचानक ही महिला गायब झाल्याने या वृद्ध महिलेचे कुटुंबीय मोठ्या प्रमाणावर भयभीत झाले आहे.
बारामती तालुक्यातील निरावागज परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा मुक्तपणे संचार आढळल्याने या परिसरातील नागरिकांमध्ये कमालीची भीती निर्माण झाली आहे.
ऊसाच्या शेतासह आता रानावनात आणि अगदी गावात बिबटे हल्ला करत आहेत. पुण्यातील औंध भागामध्ये देखील बिबट्या दिसला असल्याचे बोलले जात आहे. वडगाव मावळमध्ये देखील बिबट्या दिसून आला आहे.
मागील काही वर्षांपासून भीमा नदीकाठावर कानगाव हातवळण व नानगाव परिसरात बिबट्यांची हालचाल सुरू होती. काटेरी झुडपे व उसाच्या शेतात त्यांनी ठाण मांडले होते.
भक्ष्याचा पाठलाग करत असताना बरेच बिबटे उघड्या विहिरीमध्ये पडतात. बिबट्यांचा वावर असलेल्या गावांची संख्या निश्चितपणे सांगता येत नाही. जंगल क्षेत्र असलेल्या गावांमध्ये बिबट्या अधिक प्रमाणात असतो.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, राजगुरूनगर व शिरुर परिसरातील बिबट्यांमुळे मनुष्यहानी होणे ही दुर्देवी घटना आहे. यावर दीर्घ व तातडीच्या उपाययोजना करण्यात येतील, असे गणेश नाईक म्हणाले.
ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बिबट्याच्या हल्ल्यांचे प्रमाण वाढत आहे. अशातच अहिल्यानगरमधील देवठाणच्या विद्यार्थ्यांनी चक्क वनविभागाच्या अधिकाऱ्यांना एक भाबडी विनंती केली आहे.
महाराष्ट्रातील ग्रामीण भागात बिबट्याच्या हल्ल्याचे प्रमाण वाढत असतानाच अहिल्यानगर तालुक्यात बिबट्याने अजून एकाचा बळी घेतला आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
राज्यातील अनेक भागात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर , आंबेगाव, जुन्नर परिसरात तर बिबट्याने कहर केला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात ११५० बिबटे असल्याचा अंदाज असून यापैकी २५ बिबटे पकडले आहेत. यावरून वनविभागाच्या हलगर्जीपणावर मंत्री विखे पाटील यांनी संताप व्यक्त केला.
मानव बिबट संघर्ष लक्षात घेऊन जुलै २०२४ मध्ये तत्कालीन उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी सर्व विभागांचा समन्वय साधून मानव बिबट संघर्ष टाळण्यासाठी सविस्तर कृती आराखडा तयार केला होता.