वाळवा तालुक्यात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे भीतीचे सावट पसरले आहे. अलीकडेच झालेल्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये संताप आणि असुरक्षिततेची भावना वाढली आहे. शेतकरी व मजुरांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
ओतूर (ता. जुन्नर) वनपरिक्षेत्रात बिबट्यांच्या वावरामुळे स्थानिक नागरीकांसह शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. नोव्हेंबर महिन्यापासून या परिसरात राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत आतापर्यंत एकूण १४ बिबटे पकडण्यात आले आहेत.
गावात मोकाट भटक्या कुत्र्यांची संख्या लक्षणीयरीत्या घटल्याचे ग्रामस्थ सांगतात. बिबट्याच्या तावडीतून भटक्या श्वानांचीही सुटका होत नसल्याने तो नियमितपणे गावात येत असल्याचे स्पष्ट होत आहे.
शेवाळेवाडी विभागात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी आटोपून आदिराज पाटील हे दुचाकीवरून घरी परतत असताना उंडाळे-शेवाळेवाडी रस्त्यावर अचानक बिबट्याने त्यांच्या दुचाकीवर झेप घेतली.
वन विभागाने वैद्यकीय तपासणी केल्यानंतर २५ डिसेंबर रोजी बिबट्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात, म्हणजेच येऊर वनपरिक्षेत्रातील नागला भागात सोडण्यात आले होते.
अहिल्यानगरच्या खडकी गावात बिबट्यांचे वारंवार दर्शन पाहायला मिळत आहे. यामुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. तसेच गावकऱ्यांकडून महावितरणला देखील एक निवेदन देण्यात आले आहेत.
शिराळा येथील बिउरमध्ये सहा वर्षीय बालक राजवीर हनुमंत पाटील याचा बळी घेतल्यानंतर वन विभाग नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले आहे. त्यामुळे स्थानिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
पुणे जिल्ह्यात वाढत्या मानव-बिबट संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जुन्नर वनविभागाच्या वतीने आपत्तकालीन प्रतिसाद दलासाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
राजवीर मृत झाल्याने जमाव संतप्त झाला होता. त्यातच वनविभागाचे कर्मचारी फोन उचलत नव्हते. त्यामुळे जमावाने वन विभागाचे भुईकोट किल्ला परिसरात असणारे कार्यालय फोडले.
गोंदियाच्या तिरोडा तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात 4 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. यापूर्वीही मुलीचा बळी गेला होता. जंगलालगतच्या गावांत बिबट्याची दहशत असून तातडीच्या उपाययोजनांची मागणी होत आहे.
Leopard Viral Video : अमरावतीतून बिबट्याच्या शिकारीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात त्याने चालू ट्रेनमधून व्यक्तीला खेचतच त्याची शिकार केल्याचे दिसते. व्हिडिओतील दृश्यांनी स्थानिकांना घाबरवले पण सत्य काही वेगळेच निघाले.
अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्यांची हालचाली वाढत आहेत. यावरच उपाय म्हणून वनविभागातर्फे 'एआय वाईल्ड नेत्र' ही सौरउर्जेवर चालणारी अत्याधुनिक सायरन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.
मानवी वसाहतींमध्ये वाघ आणि बिबट्यांचा वावर वाढू लागल्यामुळे या दोन प्राण्यांनी केलेल्या हल्ल्यात मागील दहा महिन्यांत 47 जणांचा बळी गेला आहे, तर वनविभागाच्या डायरीत पाच वर्षात 377 लोकांचा मृत्यू झाल्याची…
राज्यभर बिबट्याची दहशत वाढत जात आहे. कोकण, पुणे, नाशिकनंतर आता कल्याणमध्ये देखील बिबट्याचा वावर आढळला आहे. तालुक्यातील वसद गावात बिबट्याने गाईच्या वासरांचा फडशा पडला.
पारगावतर्फे आळे परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात एका 8 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.