Demand to file a case against Union Minister of State Raosaheb Danve
अकोला : केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालना येथील एका कार्यक्रमात राज्यातील आघाडी सरकारवर टीका करताना नाभिक समाजाबाबत अवमानजनक वक्तव्य केल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. सकल नाभिक समाजाकडून त्याचा निषेध करण्यात येत आहे. रावसाहेब दानवे यांनी समाजाचा अवमान करून मानवाधिकाराचे उल्लंघन केले असून, त्यांच्यावर गुन्हे दाखल करुन न्याय द्यावा, या मागणीसाठी समाजाच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
[read_also content=”राज्यातील शाळांमध्ये आता सखी सावित्री, मुलींच्या सुरक्षेसाठी शिक्षण विभागाचे प्रयत्न https://www.navarashtra.com/latest-news/vidarbha/gondia/sakhi-savitri-now-in-schools-in-the-state-efforts-of-education-department-for-the-safety-of-girls-nraa-256220.html”]