Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यातील रस्ते अपघातात मृत्यूचे प्रमाण वाढले; समृद्धीवरील प्रवास सर्वाधिक धोकादायक

मुंबई-नागपूर प्रवास वेगवान करणाऱ्या समृद्धी महामार्गावरील अपघातातदेखील वाढ झाली आहे. तीन महिन्यात या महामार्गावर ४५ जणांचे प्राण गेले आहेत. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील अपघातात मात्र मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 19, 2025 | 09:25 AM
मुंबई-गोवा मार्गावरून 'या' वाहनांना दोन दिवस बंदी; रायगड जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

मुंबई-गोवा मार्गावरून 'या' वाहनांना दोन दिवस बंदी; रायगड जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Follow Us
Close
Follow Us:

राज्यातील रस्ते अपघातात वाढ झाल्याने रस्ते सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. राज्यात जानेवारी ते मार्च २०२५ या पहिल्या तीन महिन्यात एकुण ९ हजार ३८५ रस्ते अपघात झाले. त्यात ४ हजार १७९ जणांनी आपला जीव गमावला आहे. तर याच कालावधीत गेल्या वर्षी राज्यात झालेल्या ९ हजार २३१ अपघातांत ४ हजार ३६ जणांचा मृत्यू झाला होता. मुंबई-नागपूर प्रवास वेगवान करणाऱ्या समृद्धी महामार्गावरील अपघातातदेखील वाढ झाली आहे. तीन महिन्यात या महामार्गावर ४५ जणांचे प्राण गेले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील अपघातात मात्र मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. रस्ते अपघातांमध्ये देशात महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो. राज्यातील रस्ते अपघात कमी करण्यासाठी परिवहन विभाग सुरक्षेसंदर्भात वेगवेगळ्या उपाययोजना राबविते. परंतु या उपाय योजनांना म्हणावे तसे यश येताना दिसत नाही. मानवी चुकांमुळे ८० टक्के रस्ते अपघात होतात. यात भरधाव वेगाने वाहन चालविणे, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, लेन कटिंग यासारख्या मानवी चुकांचा समावेश आहे.

पत्नीच्या जागी नोकरी करत होता पती; ५५ लाखांचा घोटाळा आला उघडकीस

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे सुरक्षित

मुंबई आणि पुणे शहरांदरम्यानचा प्रवास वेगवान होण्यासाठई मुंबई-पुणे एक्सप्रेस वेची निर्मिती झाली. एक्सप्रेस वे मुळे दोन्ही शहरांतील प्रवास वेगवान झाला असला तरी अपघात मात्र वाढले होते. हे अपघात कमी करण्यासाठी परिवहन विभागाने खास उपाययोजना राबविल्या. वाहनांच्या सुसाट वेगावर नियंत्रण आणले. परिवहन विभागाने राबविलेल्या विविध उपायांमुळे एक्सप्रेस वे वरील अपघातात आणि मृत्युमध्ये मोठी घट झाली आहे.

अपघातांची आकडेवारी
कालावधी           अपघात             मृत्यू
जाने ते मार्च २४      ५६                  २७
जाने ते मार्च २५      ३५                   ०८

राज्यातील ५ वर्षांतील अपघाती मृत्यू
वर्ष                     अपघात                मृत्यू
२०२०                 २४,९७१              ११,५६९
२०२१                 २९,४७७             १३.५२८
२०२२                ३३,३८३               १५,२२४
२०२३                ३५.२४३              १५,३३६
२०२४                ३६,११८               १५,७१५

Web Title: Death toll in road accidents in the state has increased travel on samriddhi is the most dangerous

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2025 | 09:25 AM

Topics:  

  • Accident
  • Mumbai
  • Pune

संबंधित बातम्या

वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले
1

वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले

Mumbai Rain Update : मुंबई पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्क रहावे, मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश
2

Mumbai Rain Update : मुंबई पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्क रहावे, मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश

Mumbai Rain Update : मुंबई, ठाण्यातील परिस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा, मिठी नदीची केली पाहणी
3

Mumbai Rain Update : मुंबई, ठाण्यातील परिस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा, मिठी नदीची केली पाहणी

Devendra Fadnavis on Mumbai Rain : पुढील 3 तास महत्त्वाचे, मुख्यमंत्री फडणवीसांचा महत्त्वाचा इशारा, आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू
4

Devendra Fadnavis on Mumbai Rain : पुढील 3 तास महत्त्वाचे, मुख्यमंत्री फडणवीसांचा महत्त्वाचा इशारा, आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.