Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ कारणामुळे खारेपाटमधील 28 गावातील शेतकऱ्यांचा 15 मे रोजी आक्रोश मोर्चा

शहापूर-धेरंड मधील सिनारमन्स कंपनीचा कागद प्रकल्प वादाचा विषय ठरला आहे. त्यामुळेच हजारोंच्या संख्येने एमआयडीसी कार्यालयावर धडक देणार म्हणत शिवसेना जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे आंदोलन होणार.

  • By मयुर नवले
Updated On: May 06, 2025 | 09:05 PM
'या' कारणामुळे खारेपाटमधील 28 गावातील शेतकऱ्यांचा 15 मे रोजी आक्रोश मोर्चा

'या' कारणामुळे खारेपाटमधील 28 गावातील शेतकऱ्यांचा 15 मे रोजी आक्रोश मोर्चा

Follow Us
Follow Us:

शहापूर-धेरंड परिसरात उभा राहत असलेल्या सिनारमन्स कंपनीच्या महाकाय कागद प्रकल्पामुळे स्थानिक शेतकरी संतप्त झाले आहेत. अद्याप भूसंपादन प्रक्रियाच पूर्ण झालेली नसताना, पाण्याची पाईपलाईन टाकण्यासाठी तब्बल ३५६ कोटी रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, ज्या शेतकऱ्यांच्या जमिनींमधून ही पाईपलाईन जाणार आहे, त्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता त्यांची पिकती शेती बळकावण्याचा प्रयत्न सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटना खारेपाट विभागाचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांच्या नेतृत्वाखाली १५ मे रोजी अलिबाग येथील एमआयडीसी कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी प्रति एकर ९६.६९ लाख, तर हेक्टरी २.४१ कोटी रुपयांचा दर जाहीर करण्यात आला आहे. परंतु ज्यांच्या जमिनीवरून पाईपलाईन जाईल त्या शेतकऱ्यांना कोणताही मोबदला देण्यात आलेला नाही.

Mock Drill: ‘उद्या चार वाजता भोंगे वाजणार पण,…’; जिल्हाधिकाऱ्यांचे पुणेकरांना आवाहन

राजाभाई केणी यांनी राज्याच्या उद्योग मंत्रालयाची भूमिका संशयास्पद असल्याचे ठामपणे सांगितले. स्थानिक ग्रामस्थ गेल्या अनेक वर्षांपासून पाणीटंचाईचा सामना करत आहेत, मात्र त्यांना पाणी पुरवण्यासाठी सरकारने कधीही तत्परता दाखवलेली नाही. उलट, भूसंपादन होण्याआधीच नव्या प्रकल्पाला पाणीपुरवठा करण्यात येत आहे, हे धक्कादायक आहे.

यापूर्वीही १९८२ मध्ये एमआयडीसीला शेतकऱ्यांनी स्वतःची पिकती जमीन कवडीमोल दरात दिली होती. त्या वेळी करारामध्ये शेतकऱ्यांचे अधिकार सुरक्षित ठेवण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र १९९७ मध्ये हे सर्व बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या परस्पर जमिनीवरून निपॉन कंपनी आणि सध्याच्या जेएसडब्ल्यू कंपनीसाठी पाईपलाईन टाकण्यात आली.

या नव्या प्रकल्पासाठी नागोठणे ते बांधण २८ किमी लांबीची पाईपलाईन टाकली जाणार असून, त्यासाठी १६७ कोटींचा खर्च प्रस्तावित आहे. तसेच बांधण येथे जॅकवेलसाठी १८९ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. मात्र या सगळ्या प्रकल्पांबाबत बाधित शेतकऱ्यांना अजिबात विश्वासात घेतले गेलेले नाही.

“देश के गद्दार हैं…, बुरखा घातलेल्या महिलेने पाकिस्तानच्या झेंड्याचे स्टिकर्स काढले, Video Viral

काय आहे शेतकऱ्यांचे म्हणणे?

सिनारमन्स कंपनीसाठी टाकल्या जाणाऱ्या पाईप लाईनमुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना धेरंड-शहापुरच्या शेतकऱ्यांप्रमाणे भाव दिल्यानंतरच पुढील प्रक्रिया सुरु करावी व पाईपलाईनच्या कामाची प्रसिध्द करण्यात आलेली निवीदा रद्द करण्यात यावी. तसेच रिलायन्स कंपनी झोतीरपाडा या कंपनीची पाण्याची लाईन व केबल आमच्याच शेतकऱ्यांच्या जागेतून टाकण्यासाठी एमआयडीसीने ज्या रिलायन्स कंपनीला परवानगी दिली ती ताबडतोब रद्द करावी.

सदर शेतकऱ्यांनी केलेल्या मागण्यांचा सहानभूतीपूर्वक विचार न केल्यास गुरुवार, (ता १५) रोजी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अलिबाग येथील कार्यालयावर शेतकऱ्यांच्या आक्रोश मोर्चाला सामोरे जावे लागेल. यावेळी जर कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्यास याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहिल.

Web Title: Farmers from 28 villages in kharepat will be on protest on 15 may 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2025 | 09:05 PM

Topics:  

  • Farmer March
  • maharashtra news
  • Marathi News

संबंधित बातम्या

Raigad News: देवकुंड धबधब्यावर मोठी दुर्घटना; प्रवेशबंदी झुगारून गेलेले दोन पर्यटक पाण्यात बुडाले, शोधमोहीम सुरू
1

Raigad News: देवकुंड धबधब्यावर मोठी दुर्घटना; प्रवेशबंदी झुगारून गेलेले दोन पर्यटक पाण्यात बुडाले, शोधमोहीम सुरू

‘रस्त्याच्या मध्येच…’ यूट्यूबर मनीष कश्यप यांच्यानंतर E20 पेट्रोलवर ‘या’ व्यावसायिकाने  उपस्थित केला प्रश्न
2

‘रस्त्याच्या मध्येच…’ यूट्यूबर मनीष कश्यप यांच्यानंतर E20 पेट्रोलवर ‘या’ व्यावसायिकाने उपस्थित केला प्रश्न

Train Ticket Alert : रेल्वेच्या ‘या’ नव्या नियमामुळे लोकं नाराज; तुम्हालाही भरावा लागू शकतो दंड, ‘ही’ चूक करणं टाळा
3

Train Ticket Alert : रेल्वेच्या ‘या’ नव्या नियमामुळे लोकं नाराज; तुम्हालाही भरावा लागू शकतो दंड, ‘ही’ चूक करणं टाळा

पैसे वाचवण्याचा अनोखा पर्याय, तुमची लाइफस्टाइल बदलण्याची अजिबात गरज नाही; फक्त ‘या’ टिप्स आजमावून बघा
4

पैसे वाचवण्याचा अनोखा पर्याय, तुमची लाइफस्टाइल बदलण्याची अजिबात गरज नाही; फक्त ‘या’ टिप्स आजमावून बघा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.