Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतकऱ्यांचा मोर्चा मंत्रालयात धडकणार; विविध मागण्यांसाठी अर्धनग्न राहून करणार निषेध

शेती व्यवसाय डबघाईला आला असून, त्याला कारण राज्य सरकारची धोरणे आहेत. त्यामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. आज शेतकऱ्यांसाठी कृषीमूल्य आयोग नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादित केलेल्या उत्पादनांना भाव ठरत नाही.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 12, 2025 | 07:43 AM
शेतकऱ्यांचा मोर्चा मंत्रालयात धडकणार; विविध मागण्यांसाठी अर्धनग्न राहून करणार निषेध

शेतकऱ्यांचा मोर्चा मंत्रालयात धडकणार; विविध मागण्यांसाठी अर्धनग्न राहून करणार निषेध

Follow Us
Close
Follow Us:

वाशिम : राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्या आहेत. त्यात गेल्या काही महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या या मागण्यांकडे सरकारकडून सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. याचा निषेध करण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील शेतकरी मुंबई मंत्रालयावर अर्धनग्न मोर्चा काढणार आहेत. यातील लाखो शेतकऱ्यांनी आधीच मुंबईच्या दिशेन कूच केली आहे. बुधवारी (दि.१२) हा मोर्चा मुंबईतील मंत्रालयावर धडकणार आहे.

वाशिम जिल्ह्यातील शेतकरी नेते सतीश इढोळे यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, गेल्या काही महिन्यांपासून शेतकरी कर्जमाफी, हमीभाव, वीजबिल माफी, शेतीसाठी पुरेसा पाणीपुरवठा यांसह विविध मागण्या शेतकऱ्यांकडून केल्या जात आहे. मात्र, या मागण्यांकडे सरकारकडून सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. या कारणामुळे शेतकऱ्यांनी आता थेट मुंबईतील मंत्रालयावर अर्धनग्न मोर्चा काढण्याची तयारी सुरु केली आहे. 12 फेब्रुवारी रोजी हजारो शेतकरी मुंबईतील मंत्रालयावर धडकणार आहेत.

दरम्यान, शेती व्यवसाय डबघाईला आला असून, त्याला कारण राज्य सरकारची धोरणे आहेत. त्यामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. आज शेतकऱ्यांसाठी कृषीमूल्य आयोग नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांना त्यांना भाव ठरवता येत नाही. त्यांच्या उत्पादनांचे भाव ठरवण्याचा अधिकार भांडवलदारांकडे आहे.

शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे केलं जातंय दुर्लक्ष

शेतकऱ्यांच्या मागण्यांबद्दल विविध आंदोलन करण्यात आले. उपोषण, रास्ता रोको, आत्महत्येचा इशारा आणि अवयव विक्रीसारख्या टोकाच्या पद्धतींचा अवलंब करूनही शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सरकारने कानाडोळा केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

…तर तीव्र आंदोलन करणार

या संदर्भात शेतकरी नेते सतीश इढोळे, बालाजी मोरे आणि विशाल गोटे यांच्या नेतृत्वाखालील पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी तातडीने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढावा, अन्यथा मोठ्या प्रमाणावर तीव्र आंदोलन छेडले जाईल.

सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त

नाफेडचे सोयाबीन खरेदी केंद्र बंद झाल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त आहे. नाफेडचे हमीभाव खरेदी केंद्र बंद झाल्याने 23 हजार शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी विना राहिले आहेत. त्यामुळे याच सोयाबीनची हमीभावाने खरेदी केली जावी. या मागणीसाठी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलनकर्ते गणेश ढवळे यांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांनी सोयाबीनची उधळण करून आंदोलन केलंय.

Web Title: Farmers will do long march for his various demands nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2025 | 07:43 AM

Topics:  

  • Agriculture News
  • maharashtra farmers

संबंधित बातम्या

विदर्भासह मराठवाड्यातील 1183 शेतकऱ्यांनी केल्या आत्महत्या; केवळ 8 महिन्यांतील धक्कादायक आकडेवारी समोर
1

विदर्भासह मराठवाड्यातील 1183 शेतकऱ्यांनी केल्या आत्महत्या; केवळ 8 महिन्यांतील धक्कादायक आकडेवारी समोर

Nanded News : हदगावमध्ये शेतकरी एकवटले! पीक नुकसानीच्या पंचनाम्यावरून तहसील कार्यालयावर धडक
2

Nanded News : हदगावमध्ये शेतकरी एकवटले! पीक नुकसानीच्या पंचनाम्यावरून तहसील कार्यालयावर धडक

राजू शेट्टींनी घेतली कृषीमंत्र्यांची भेट; शेतकऱ्यांसाठी केली ‘ही’ मोठी मागणी
3

राजू शेट्टींनी घेतली कृषीमंत्र्यांची भेट; शेतकऱ्यांसाठी केली ‘ही’ मोठी मागणी

माणिकराव कोकाटेंना झाली उपरती; अजित पवारांच्या भेटीच्या दिवशी अखेर आला शेतकऱ्यांबाबत कळवळा
4

माणिकराव कोकाटेंना झाली उपरती; अजित पवारांच्या भेटीच्या दिवशी अखेर आला शेतकऱ्यांबाबत कळवळा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.