Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ग्राहकांसाठी खुशखबर! देशभरात वाढले अन्नधान्याचे उत्पादन; अन्नधान्याच्या दरात झाली घट, पहा दर…

यंदा तांदळाचे उत्पादन १० ते १५ टक्क्यांनी वाढले असून, बासमती वगळता इतर सर्व तांदळाचे दर कमी झाले आहेत. तसेच, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून नवीन गहू मोठ्या प्रमाणात बाजारात येत असून, त्याचाही दर कमी आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 17, 2025 | 07:03 PM
ग्राहकांसाठी खुशखबर! देशभरात वाढले अन्नधान्याचे उत्पादन; अन्नधान्याच्या दरात झाली घट, पहा दर...

ग्राहकांसाठी खुशखबर! देशभरात वाढले अन्नधान्याचे उत्पादन; अन्नधान्याच्या दरात झाली घट, पहा दर...

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : यंदा पावसाचे प्रमाण चांगले झाल्यामुळे देशभरात अन्नधान्याचे उत्पादन वाढले आहे. त्यामुळे तांदूळ, गहू, डाळी आणि कडधान्यांचे दर सामान्यांच्या आवाक्यात आले आहेत. व्यापाऱ्यांनी ग्राहकांना नैसर्गिकरित्या साठवलेले, रसायनमुक्त आणि शुद्ध सात्त्विक अन्नधान्य वर्षभरासाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. पूर्वी ग्राहक नवीन हंगामातील धान्य वर्षभरासाठी साठवून ठेवत.

मात्र, बदलत्या काळात गरजेप्रमाणे खरेदी करण्याची प्रवृत्ती वाढली आहे. परिणामी, व्यापाऱ्यांना अन्नधान्य दीर्घकाळ साठवावे लागते, आणि त्यासाठी कीटकनाशके वापरण्याची गरज निर्माण होते. नैसर्गिकरित्या साठवलेले धान्य आणि डाळी शरीरासाठी अधिक फायदेशीर ठरतात. यामध्ये फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास मदत होते.

तांदूळ आणि गव्हाच्या दरात मोठी घट

यंदा तांदळाचे उत्पादन १० ते १५ टक्क्यांनी वाढले असून, बासमती वगळता इतर सर्व तांदळाचे दर कमी झाले आहेत. तसेच, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून नवीन गहू मोठ्या प्रमाणात बाजारात येत असून, त्याचाही दर कमी आहे. सध्या अन्नधान्याचा पुरवठा मुबलक असला तरी हळूहळू साठा कमी होत जाईल आणि दर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे गृहिणींनी या संधीचा लाभ घेत वर्षभरासाठी गहू तांदूळ, ज्वारी , डाळी, साबुदाणा, शेंगदाणे यांची खरेदी करून ठेवावी, असे मत राजेंद्रकुमार मोहनलाल कंपनी    मार्केट यार्ड (आर.एम. फूड  मार्ट)  चे यश बाठिया यांनी व्यक्त केले.

80 कोटी लोकांना मोफत धान्य, मग कोणाचा विकास केला? काँग्रेस खासदाराचा भाजपला सवाल

फ्युमिगेशनविरहित धान्य दीर्घकाळ टिकू शकते
फ्युमिगेशन न केलेले धान्य आणि डाळी तेल लावून योग्य प्रकारे साठवल्यास वर्षभर टिकतात. त्यामुळे ग्राहकांनी योग्य विचार करून मोठ्या प्रमाणात खरेदी करणे फायदेशीर ठरणार आहे. शुद्ध सात्त्विक अन्नामुळे आरोग्य सुधारते आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीकडे वळण्याची संधी मिळते. सर्व अन्नधान्य छोट्या आणि मोठ्या पॅकिंगमध्ये उपलब्ध असल्याने ग्राहकांना खरेदी सोयीस्कर होत आहे. तसेच घरपोच सेवेमुळेही ग्राहकांचा प्रतिसाद वाढत आहे, असे मत ३३ वर्षांपासून तांदूळ महोत्सवाचे आयोजन करणाऱ्या आर.एम. ग्रुपचे संचालक आणि दि पूना मर्चंट्स चेंबरचे माजी अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी व्यक्त केले.काँग्रेस खासदाराचा भाजपला सवाल

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या माध्यमातून देशात 80 कोटी तर महाराष्ट्रातील ग्रामीण भागात 76.32% आणि शहरी भागात 45.34% लोकसंख्या लाभार्थी आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात गरिब लोक आहेत तर मग 11 वर्षात कोणाचा विकास झाला? असा प्रश्न उपस्थित करत भाजपा सरकारच्या काळात फक्त मुठभर लोकांचा विकास झाला असून बहुसंख्य जनता ही गरिबीचे जीवन जगत आहे, विकासाच्या फक्त गप्पा मारल्या जात आहेत, असे खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.

Web Title: Grocery rate are decreased in india because good rainy season know the rates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2025 | 07:03 PM

Topics:  

  • food news update
  • Wheat Prices

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! सरकारने गहू साठवणुकीची मर्यादा कमी केली, नियम मोडल्यास कठोर कारवाई
1

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! सरकारने गहू साठवणुकीची मर्यादा कमी केली, नियम मोडल्यास कठोर कारवाई

सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतेय हैदराबादची 24 कॅरेट गोल्ड इडली, किंमत ऐकून व्हाल अचंबित
2

सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतेय हैदराबादची 24 कॅरेट गोल्ड इडली, किंमत ऐकून व्हाल अचंबित

अमेरिकेत सरकारी कर्मचाऱ्याच्या पोटावर पाय; डोनाल्ड ट्रम्प यांचा भयानक निर्णय
3

अमेरिकेत सरकारी कर्मचाऱ्याच्या पोटावर पाय; डोनाल्ड ट्रम्प यांचा भयानक निर्णय

10 देश जेथील खाण्याच्या नियमांविषयी ऐकून मन हेलावेल; शाकाहारी झाल्यास मिळते कठोर शिक्षा
4

10 देश जेथील खाण्याच्या नियमांविषयी ऐकून मन हेलावेल; शाकाहारी झाल्यास मिळते कठोर शिक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.