Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुम्ही अद्याप e-KYC केलं नाही का? तर लवकर करून घ्या; अन्यथा रेशनकार्ड होणार बंद

शिधापत्रिकेत नावे असलेल्या कुटुंबातील सदस्यांनी ई-केवायसी पडताळणी प्रक्रिया पूर्ण न केल्यास संबंधितांना धान्य वितरणाचा लाभ मिळणार नाही, असे तासगाव पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 25, 2025 | 03:16 PM
तुम्ही अद्याप ई-केवायसी केलं नाही का? तर लवकर करून घ्या; अन्यथा रेशन कार्ड होणार बंद

तुम्ही अद्याप ई-केवायसी केलं नाही का? तर लवकर करून घ्या; अन्यथा रेशन कार्ड होणार बंद

Follow Us
Close
Follow Us:

तासगाव : आता शासकीय योजनेच्या लाभार्थी असलेल्या प्रत्येकाला ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. मग आधार असो, बँकेचे काम असो किंवा शासकीय योजनेचा लाभ घ्यावयाचा असो, प्रत्येक ठिकाणी ई-केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. अशातच अनेक नागरिकांकडे असणाऱ्या रेशनकार्डबाबत देखील ई-केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे.

तासगाव तालुक्यातील सर्व रेशनकार्डधारकांनी 30 जूनअखेर आपले रेशन कार्ड एक केवायसी करून घ्यावे, असे आवाहन तासगाव तहसीलदार अतुल पाटोळे यांनी केले आहे. प्रत्येक शिधापत्रिकाधारकाला आता ई-केवायसी करणे बंधनकारक झाले आहे. शिधापत्रिकेत नावे असलेल्या कुटुंबातील सदस्यांनी ई-केवायसी पडताळणी प्रक्रिया पूर्ण न केल्यास संबंधितांना धान्य वितरणाचा लाभ मिळणार नाही, असे तासगाव पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे रेशनकार्डधारकांनी लवकरात लवकर ई-केवायसी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रेशन दुकानात जाऊन करा ई-केवायसी

रेशनकार्डधारकांना रेशन दुकानातून धान्य मिळते. याच धान्य दुकानात ई-केवायसी करण्याची सोय आहे. या रेशन दुकानदारांकडे 4G-ePOS मशीन आहेत. या मशीनद्वारे ही केवायसी केली जाते. यासाठी आधार कार्ड घेऊन जाणे. या ठिकाणी या मशीनमध्ये आधार क्रमांक टाकला जातो. यानंतर संबंधित व्यक्तीच्या बोटांचे ठसे व डोळे स्कॅन करून ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली जाते.

ई-केवायसी नसलेले रेशन कार्ड होणार बंद

30 जूनपर्यंत ज्या ग्राहकांचे रेशन कार्ड ई-केवायसी होणार नाही. त्यांचे कार्ड बंद करण्यात येणार आहे. तसेच इतर शासकीय योजनांचा लाभ ही मिळणार नाही. शासनाने ई-केवायसी सर्वांसाठी बंधनकारक केली आहे.

18 लाख कार्ड करण्यात आले बाद

शिधापत्रिका धारकांना राज्य सरकारकडून अन्न धान्याचा पुरवठा केला जातो. मात्र, यामध्ये असेही अनेक जण आहेत, जे या योजनेचा गैरफायदा घेत आहेत. मोठी नोकरी आणि बलाढ्य पगार असून देखील शिधापत्रिकाच्या योजनांचा लाभ घेत आहेत. अशा सर्वांवर आता कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. राज्यातील तब्बल 18 लाख रेशन कार्ड रद्द करण्यात आले आहेत. यामुळे अनेक मोठा धक्का बसला आहे.

Web Title: If no kyc then no ration and also ration card will be canceled

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2025 | 03:01 PM

Topics:  

  • maharashtra government decision
  • Ration card News

संबंधित बातम्या

Ration Card Online Process: आता घरबसल्या रेशन कार्डसाठी करा अप्लाय! रांगेत उभं राहण्याची गरज नाही, फॉलो करा ‘ही’ प्रोसेस
1

Ration Card Online Process: आता घरबसल्या रेशन कार्डसाठी करा अप्लाय! रांगेत उभं राहण्याची गरज नाही, फॉलो करा ‘ही’ प्रोसेस

‘लाडकी बहीण’नंतर राज्यातील महिलांसाठी सरकारने घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय; आता महिलांना…
2

‘लाडकी बहीण’नंतर राज्यातील महिलांसाठी सरकारने घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय; आता महिलांना…

रेशन कार्डधारकांसाठी महत्वाची अपडेट! ३० जूनपूर्वी करा ‘हे’ काम, अन्यथा तुमचे रेशन होऊ शकते बंद
3

रेशन कार्डधारकांसाठी महत्वाची अपडेट! ३० जूनपूर्वी करा ‘हे’ काम, अन्यथा तुमचे रेशन होऊ शकते बंद

आनंदाची बातमी ! आता 35 लाख नवीन घरे उभारली जाणार; राज्याच्या नवीन गृहनिर्माण धोरणाला मंजुरी
4

आनंदाची बातमी ! आता 35 लाख नवीन घरे उभारली जाणार; राज्याच्या नवीन गृहनिर्माण धोरणाला मंजुरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.