
Free Fire Max: अखेर तो क्षण आला! प्लेअर्ससाठी Mystery Shop लाईव्ह, बंडल आणि ईमोट कमावण्याची
देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहेत. तर सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी नुकतीच स्वीकारली आहे. तसेब कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्त के, मंजूलक्ष्मी यांची प्रशासनावर पकड आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक कोल्हापूरच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. तसेच महापालिका निवडणुकही त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरळीत पार पडली, गेल्या पाच महिन्यापासून शिक्षण उपसंचालक प्रभावती कोळेकर उत्कृष्ट कार्य करीत आहे. तर जिल्हा परिषदेमध्ये माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर यांनी संपूर्ण जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यावर भर दिला आहे, तसेब पहिल्यांदाच जिल्हा परिषदेच्या विद्याथ्यांनी इस्रोची सहल केली.
शिवाजी विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला म्हणून प्र कुलगुरू पदाची जबाबदारी डॉ. ज्योती जाधव यांनी स्वीकारली आहे. त्या जागतिक पातळीवरील संशोधक असल्याने आपल्या संशोचन्नाचा फायदा सर्वच विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधक यांना करून देत आहेत. तसेच राजाराम महाविद्यालय, कमला महाविद्यालय, कॉमर्स महाविद्यालय, देवचंद महाविद्यालयासह अन्य महाविद्यालयातही महिला प्राचार्य कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच संपूर्ण महाविद्यालयाच्या प्रगतीचा आलेख उंचावत आहे. अशा पद्धतीने शासकीय यंत्रणा व शिक्षण खाते महिला सक्षमपणे सांभाळत आहेत.
सत्ता प्रक्रियेमध्ये महिलांचे प्रमाण वाढले असले तरी निर्णय प्रक्रियेपासून त्यांना वंचित ठेवले जाते. परंतू सध्याच्या महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये निवडून आलेल्या सर्वच महिला पदवीधर आहेत, त्यामुळे या महिला आपल्या भागात व सभागृहात स्वतःचे अस्तित्व निर्माण करतील. यातून जिल्हा परिषद महापालिकेच्या कामकाजात पारदर्शकता येईलच, पण सक्षम व निर्णय क्षमता असणाऱ्या या रणरागिणी असल्याने नारी शक्तीचा विजय होईल.
नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीतही ४३ महिला नगरसेवक आहेत, एवदेव नाही, तर स्याराणी निकम यांनी बहुमताने महापौर होण्याचा मान मिळवला आहे. महिलांच्या विकासासाठी जास्तीत जास्त काम करण्याचा त्यांचा मानस आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही जास्तीत जास्त महिला सदस्य निवडून आले आहेत. जिल्हा परिषद अध्यक्षपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने जिल्हा परिषदेचा कारभारही एक महिलाथ सांभाळणार आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याच्या कारभारात महिलाराज असल्याचे निदर्शनास येते, या महिला आपल्या घराप्रमाणेच जिल्ह्याचीही प्रगती करतील. सर्वसामान्य जनतेला न्याय देऊन राज्यातील राजकारणात कोल्हापूरचे वेगळे स्थान निर्माण करतील.