मुंबई – मुंबई – औषध व्यावसायिक उमेश कोल्हे ( Umesh Kolhe Murder Case ) यांची गळ चिरुन 21 जूनला हत्या करण्यात आली होती. कोल्हे यांच्या खूनामागे नूपूर शर्मा प्रकरणाचा वाद आहे का? याबाबत सखोल चौकशीअंती हा खून नुपूर शर्मा प्रकरणातूनच झाला असल्याचा खुलासा अमरावती पोलिसांनी केला आहे. याच प्रकरणात सतत नवनवीन खुलासे होत आहेत. त्यावरती आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले मत व्यक्त केलं आहे.
या घटनेतील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. तरीदेखील त्याच्यामागे काही विदेशी ताकद आहे का?, (International Connection Inquiry ) याची सुद्धा चौकशी केली ( Umesh Kolhe Murder Case ) जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस ( DCM Devendra Fadnavis ) यांनी म्हटलं आहे.
विधानभवनाबाहेर देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, उमेश कोल्हे यांची झालेली हत्या ही फार गंभीर घटना आहे. ज्या कारणाने त्यांना मारण्यात आलं, ते अतिशय निंदणीय आहे. या घटनेतील आरोपी त्याचबरोबर त्याचा मास्टरमाइंड हा पकडला गेला आहे. तरीसुद्धा याच्यामागे काही विदेशी ताकद आहे का? याची सुद्धा चौकशी होणार आहे. सुरुवातीला या प्रकरणाला दरोड्याचं कारण देण्यात आलं होतं. तशा प्रकारच्या बातम्या पसरवल्या गेल्या होत्या. परंतु, या प्रकरणात अजूनही पूर्ण चौकशी करण्याची गरज असल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.