Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जरांगे आणि भुजबळांनी एकत्र येत दिल्लीसमोर लढा उभारला पाहिजे; बच्चू कडूंची प्रतिक्रिया

मनोज जरांगे आणि भुजबळांनी त्यांच्यातील वाद बाजूला ठेऊन एकत्र येत दिल्ली समोर लढा उभा केला पाहिजे, असा सल्ला बच्चू कडूंनी दिला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 19, 2024 | 12:55 PM
फोटो सौजन्य - सोशल मीडिया

फोटो सौजन्य - सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी एकत्र येत दिल्लीसमोर लढा उभारला पाहिजे, असे वक्तव्य प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु असणाऱ्या मराठा आणि ओबीसीच्या आरक्षणाच्या वादावर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे, अशी मागणी करत मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केलं होतं. मात्र मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी अनेकांनी विरोध केला आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी देखील मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोध केला होता. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. याच वादावर आता बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वाद बाजूला ठेवत मनोज जरांगे आणि भुजबळांनी एकत्र यावं, असा सल्ला बच्चू कडूंनी दिला आहे.

बच्चू कडू यांनी म्हटले आहे की, गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु असलेला मराठा आणि ओबीसी समाजातील वाद आता शांत झाला पाहिजे. महाराष्ट्र शांत राहिला पाहीजे. मराठवाड्यातील मराठा हा कुणबी आहे, त्यामुळे त्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं, ही जरांगेंची मागणी रास्त आहे. पण सगळे मराठे ओबीसीमध्ये आले तर ओबीसीमध्ये अडचण निर्माण होईल, असा संशय नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे. हा संशय सुद्धा वास्तविक आहे. त्यामुळे आता या समस्येवर उपाय काढण्यासाठी मनोज जरांगे आणि भुजबळांनी त्यांच्यातील वाद बाजूला ठेऊन एकत्र येत दिल्ली समोर लढा उभा केला पाहिजे. ओबीसी मधील आरक्षणाचा कोटा कसा वाढविता येईल यासाठी याकडे लक्ष दिलं पाहिजे. यासाठी मी मनोज जरांगे पाटील व छगन भुजबळ यांना उद्या किंवा परवा भेटणार आहे. या भेटीवेळी मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या वादावर मार्ग काढणार आहे.

मराठा समाजातील सगेसोयरेंच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगेंनी सरकारला १३ जुलैपर्यंतचा वेळ दिला आहे. १३ जुलैपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास विधानसभेत उतरणार, असा इशारा देखील जरांगेंनी सराकारला दिला आहे.

Web Title: Jarange and bhujbal must unite and put up a fight before delhi bachu kadus reaction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2024 | 12:55 PM

Topics:  

  • Chagan Bhujabal

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.