Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राजकारणात ना मैत्री ना शत्रू! राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाऊ शकतं मुख्यमंत्रिपद; हे तीन मुद्दे ठरू शकतात महत्त्वाचे

८४ वर्षांच्या शरद पवारांनी प्रचारासाठी अक्षरश: संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. त्यामुळे राज्यातील सत्तेच्या चाव्या या ना त्या कारणाने शरद पवार यांच्याकडे राहतील अशी चर्चा देशभरात रंगली आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Nov 21, 2024 | 06:16 PM
राजकारणात मैत्री ना शत्रू! राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे जाऊ शकतं मुख्यमंत्रिपद; हे तीन मुद्दे ठरू शकतात महत्त्वाचे

राजकारणात मैत्री ना शत्रू! राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे जाऊ शकतं मुख्यमंत्रिपद; हे तीन मुद्दे ठरू शकतात महत्त्वाचे

Follow Us
Close
Follow Us:

महाराष्ट्राची यंदाची निवडणूक फक्त राज्यातच नाही तर संपूर्ण देशातच ऐतिहासिक म्हणावं लागेलं. दोन पक्ष दोन्ही राष्ट्रीय पक्षांसोबत युती आणि आघाडीत आहेत. त्यामुळे दिल्लीपासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात यंदाच्या निवडणुकीची चर्चा आहे. त्यात ८४ वर्षांच्या शरद पवारांनी प्रचारासाठी अक्षरश: संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. त्यामुळे राज्यातील सत्तेच्या चाव्या या ना त्या कारणाने शरद पवार यांच्याकडे राहतील अशी चर्चा देशभरात रंगली आहे.

सरकार स्थापनेसाठी फक्त ३ दिवस

महाराष्ट्रातील २८८ जागांसाठी २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी १४५ आमदारांची आवश्यकता आहे. २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल आणि २६ नोव्हेंबरला विधानसभा कार्यकाळ समाप्त होणार आहे. ३ दिवसांत जर सरकार स्थापनेसाठी दावा करण्यात आला नाही, तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते.

राष्ट्रपती राजवट लागू झाली तर निर्णय केंद्र सरकारच्या हातात जाऊ शकतो. अशी परिस्थिती टाळण्यासाठी राजकीय पक्ष सरकार स्थापनेची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. त्याचा फायदा शरद पवार उठवू शकतात. २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली. त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. त्यावेळी पवारांनी अर्थ व गृहमंत्रिपद राष्ट्रवादीकडे ठेवलं होतं.

राष्ट्रवादी कॉंग्रेसला मिळू शकतात ७० जागा

महाराष्ट्रातील विविध एक्झिट पोलमध्ये शरद पवार व अजित पवार यांच्या गटाला मिळून ७० जागा मिळण्याचा अंदाज आहे. यातील ४२ जागांवर शरद पवार आणि अजित पवार यांच्या गटांमध्येच थेट सामना आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ३८ विधानसभा जागांवर शरद पवार व ६ जागांवर अजित पवार यांच्या गटांना आघाडी मिळाली होती. मात्र या आकड्यांत बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अजित पवार यांनी निवडणुकीत भाजपच्या ध्रुवीकरणाच्या प्रयत्नांचा उघडपणे विरोध केला. यामुळे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर टीका केली होती. या राजकीय प्रभावामुळे यंदा मुख्यमंत्रिपद पवार कुटुंबाकडे जाऊ शकतं, अशी चर्चा आहे.

ना शत्रूत्व ना मैत्री

शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणात कोणाशी जवळीक ठेवत नाहीत किंवा शत्रुत्वही ठेवत नाहीत. २०१४ मध्ये भाजपला पाठिंबा देणारे पवार २०१९ मध्ये उद्धव ठाकरेंसोबत गेले. त्यांच्या गटातील उमेदवार नवाब मलिक यांनी अलीकडेच सांगितले की, शरद पवार कोणत्याही गटासोबत जाऊ शकतात. या वेळी महाविकास आघाडी व महायुती दोघांनीही मुख्यमंत्रीपदासाठी चेहरा जाहीर केलेला नाही. त्यामुळे मुख्यमंत्रिपदासाठीची शर्यत अजून संपलेली नाही.

काय आहे शरद पवार यांच्या मनात?

८४ वर्षीय शरद पवार यांनी निवडणुकीसाठी पूर्ण ताकद लावली. त्यांनी तब्बल ५५ सभांना संबोधित केले आणि महाराष्ट्राला नवीन दिशा देण्यासाठी महाविकास आघाडीला निवडून देण्याचं आवाहन केलं. इस्लामपूरमधील एका सभेत त्यांनी जयंत पाटील यांच्याबद्दल मोठे विधान केले. पवार म्हणाले की, जयंत पाटील यांनी संपूर्ण राज्याची जबाबदारी घ्यायला सुरुवात करावी. या विधानामुळे पवारांच्या मनात काय सुरू आहे, याबद्दल चर्चेला उधाण आलं आहे.

१९९५ नंतर मुख्यमंत्रीपद नाही

१९९५ च्या निवडणुकीत पराभव झाल्यापासून शरद पवारांना मुख्यमंत्रिपदावर बसण्याची संधी मिळालेली नाही. ते चार वेळा किंगमेकर ठरले, पण मुख्यमंत्रिपदापासून दूर राहिले. त्यांच्या पक्षातील छगन भुजबळ व अजित पवार उपमुख्यमंत्री झाले आहेत.

शरद पावर-अजित पवार गट ४२ जागांवर आमने-सामने

महाविकास आघाडीत शरद पवार यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस ८९ जागांवर निवडणूक लढवत आहे. यातील ४२ जागांवर त्यांचा सामना अजित पवार यांच्या गटाशी आहे, तर उर्वरित ४७ जागांवर त्यांचा सामना भाजप व शिवसेनेशी (शिंदे गट) आहे. अजित पवार ६० जागांवर लढत आहेत, जिथे बहुतेक ठिकाणी त्यांचा सामना काँग्रेसशी आहे.

 

Web Title: Maharashtra cm post likily go to ncp these 3 points important in maharashtra assembly election 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2024 | 06:15 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024
  • Maharashtra CM

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: मोठी बातमी! हायकोर्टाचे मुख्यमंत्री फडणवीसांना समन्स; नेमके प्रकरण काय?
1

Devendra Fadnavis: मोठी बातमी! हायकोर्टाचे मुख्यमंत्री फडणवीसांना समन्स; नेमके प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.