Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लोकसभेच्या निकालानंतर कॉंग्रेसचं वजन वाढलं! विधानसभेमध्ये लढणार 150 हून अधिक जागा

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यामध्ये कॉंग्रेसचे पारडे जड झाले आहे. यानंतर आता प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये कॉंग्रेस जास्त जागेवर निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jun 06, 2024 | 11:44 AM
लोकसभेच्या निकालानंतर कॉंग्रेसचं वजन वाढलं! विधानसभेमध्ये लढणार 150 हून अधिक जागा
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीचा निकाल महाविकास आघाडीच्या बाजून लागला आहे. भाजप या निवडणुकीमध्ये मागे पडली असून याचा फटका त्यांना देशाच्या राजकारणामध्ये बसला आहे. राज्यामध्ये महायुतीला 48 जागांपैकी फक्त 17 जागा मिळाल्या असून महाविकास आघाडीला 30 जागा मिळल्या आहेत. राज्यामध्ये भाजप पेक्षा जास्त जागा कॉंग्रेसला मिळाल्या असून एकूण 13 जागा आणि अपक्ष विशाल पाटील यांच्या पाठिंब्यासह 14 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे राज्यामध्ये कॉंग्रेसचे पारडे जड झाले आहे. यानंतर आता प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये कॉंग्रेस जास्त जागेवर निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले आहे.

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यापूर्वी देखील लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवार गट व ठाकरे गट यांना इशारा दिला होता. ‘कॉंग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असून मोठा भावासारखा महाविकास आघाडीमध्ये आहे. जागावाटपावेळी देखील कॉंग्रेसने मोठ्या भावाची भूमिका बजावली असून लहान भावांनी लहान भावांसारखं रहावं,’ असा इशारा देखील नाना पटोले यांनी दिला होता. त्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत राजकारण सुरु आहे का असा सवाल विचारला जात होता. यानंतर आता पुन्हा एकदा नाना पटोले यांनी विधानसभेच्या जागावाटपाबद्दल वक्तव्य केले आहे.

काँग्रेस पक्ष 150 जागा लढवण्याच्या विचारात

माध्यमांशी संवाद साधताना नाना पटोले म्हणाले, “लोकसभेनंतर आता विधानसभेची तयारी करावी लागेल. आगामी विधानसभेत काँग्रेस पक्ष 150 जागा लढवण्याच्या विचारात आहे. लोकसभेत जागा वाटपाचा फॉर्म्युला तयार करण्यासाठी साडे तीन महिने गेले. विधानसभेत हे टाळावे लागेल. त्यासाठी महिन्याभरात जागा वाटपाचा फॉर्म्युला तयार करावा लागेल. म्हणूनच आत्तापासूनच तयारी करावी लागेल. सांगलीचे अपक्ष उमेदवार विशाल पाटीलही आमच्यासोबत येतील. लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा मोठा फायदा झाला. या यात्रेमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनाही बळ मिळाले. आम्ही हाच उत्साह घेऊन विधानसभेच्या मैदानात उतरु,” असे नाना पटोले म्हणाले आहेत.

Web Title: Maharashtra politics after loksabha elections congress will contest 150 assembly seat says nana patole political news nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2024 | 11:44 AM

Topics:  

  • loksabha elections 2024
  • Nana patole

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.