Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Weather Alert: 13 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट; विदर्भात ऑरेंज अलर्ट, जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याचा अंदाज

महाराष्ट्रातील पावसाने घेतलेली उघडीप आता पुन्हा संपण्याची शक्यता असून, राज्यातील काही भागांत जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आज ३ सप्टेंबरला १३ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आला असून, अमरावती आणि गोंदियाला ऑरेंज तर जळगाव, छत्रपती संभाजीनगरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 03, 2026 | 09:50 AM
Maharashtra Weather Alert: 13 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट; विदर्भात ऑरेंज अलर्ट, जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याचा अंदाज

Maharashtra Weather Alert: 13 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट; विदर्भात ऑरेंज अलर्ट, जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याचा अंदाज

Follow Us
Follow Us:
  • विदर्भातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे
  • वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाची शक्यता
  • पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूरमध्ये हलका ते मध्यम पावसाचा अंदाज
Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रातील पावसाने घेतलेली उघडीप आता पुन्हा संपण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक भागांत हवामानात बदल जाणवत असून, काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने आज, ३ सप्टेंबर रोजी राज्यातील १३ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट दिला आहे. यामध्ये विदर्भातील अमरावती आणि गोंदिया जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, तर काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाडा, विदर्भ आणि जळगाव परिसरात हलका ते मध्यम, तसेच काही ठिकाणी जोरदार आणि वादळी पावसाची शक्यता आहे.

विदर्भात पावसाचा जोर वाढणार

विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. अमरावती आणि गोंदिया जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. अकोला, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा आणि वाशिम या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून, वादळी वाऱ्यांचाही अंदाज आहे. काही भागांत वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किलोमीटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उद्याही विदर्भातील काही जिल्ह्यांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.

जळगावसह उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता

जळगाव जिल्ह्याला आज आणि उद्यासाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह हलका, मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. नाशिक, नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यांतही काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस, तसेच वादळी सरींचा अंदाज आहे.

मराठवाड्यातही पावसाचे संकेत

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, हलका ते मध्यम आणि काही ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो. जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांतही पावसाची शक्यता आहे. मात्र, या जिल्ह्यांना सध्या कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही.

पश्चिम महाराष्ट्रात काय स्थिती?

पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी वादळी सरींचाही अंदाज आहे. मात्र, या जिल्ह्यांसाठी सध्या कोणताही अलर्ट जारी करण्यात आलेला नसून मागील काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रात पावसाने उघडीप घेतली आहे. त्यामुळे अनेक भागांत उष्ण आणि दमट हवामान जाणवत आहे. अधूनमधून पडणाऱ्या पावसाच्या सरींमुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळत आहे.

कोकणात पावसाची प्रतीक्षा कायम

पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी या कोकणातील जिल्ह्यांसाठी सध्या कोणताही विशेष अलर्ट देण्यात आलेला नाही. पुढील काही दिवस या भागात हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याचा अंदाज आहे. एकूणच, राज्यातील हवामानात पुन्हा बदल होत असला तरी सर्वदूर पाऊस झालेला नाही. सध्या विदर्भ, मराठवाडा आणि जळगाव परिसरात पावसाची शक्यता अधिक आहे. नागरिकांनी स्थानिक हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Maharashtra weather alert rain alert for 13 districts orange alert for vidarbhacheck the forecast for your district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2026 | 09:50 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.