Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rohit Patil: “मराठी अस्मिता जपण्याचा प्रयत्न…”; महाराष्ट्र – कर्नाटक सीमा वादावर आमदार रोहित पाटलांचे विधान

महाराष्ट्र - कर्नाटक सीमा वादात अनेकांनी हुतात्म्य पत्करले आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. मात्र शेजारच्या राज्याकडून मराठी भाषिकांना मिळणारी वागणूक निषेधार्ह आहे. असे आमदार रोहित पाटील म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 07, 2025 | 06:19 PM
Rohit Patil: “मराठी अस्मिता जपण्याचा प्रयत्न…”; महाराष्ट्र – कर्नाटक सीमा वादावर आमदार रोहित पाटलांचे विधान
Follow Us
Close
Follow Us:
तासगाव: महाराष्ट्र – कर्नाटकच्या सीमा वादात बेळगाव भागात मराठी भाषिकांवर अन्याय होत आहे. केवळ मराठीत फलक लावला म्हणून तेथील पोलीस मराठी बांधवांना मारहाण करीत आहेत. बेळगावमध्ये संघर्ष सुरू असताना तिथल्या कन्नड संघटना आपल्या संघटनेतील लोकांना त्रास देत आहेत. त्यामुळे मराठी अस्मिता जपण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सरकारने संरक्षण दिले पाहिजे, असे मत आमदार रोहित पाटील यांनी विधानसभेत व्यक्त केले. मुंबईत विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावर आमदार रोहित पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्र – कर्नाटकाच्या सीमा वादात बेळगाव भागात मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाबाबत विधानसभेचे लक्ष वेधले.

आमदार पाटील म्हणाले, राज्यपालांनी आपल्या अभिभाषणात महाराष्ट्राच्या दृष्टीने बेळगावचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा घेतला आहे. ‘अंधार सरुदे आणि बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र होऊ दे’, ही घोषणा बेळगाव भागात लोक करतात. 1956 पासून बेळगावचे लोक यासाठी संघर्ष करीत आहेत. महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी या संघर्षामध्ये बेळगावातील मराठी भाषिकांना साथ दिली आहे. संघर्षाच्या काळात तेथील लोकांबरोबर खांद्याला खांदा लावून काम केले आहे. प्रसंगी काठ्या खाल्ल्या आहेत. पण गेल्या अनेक वर्षात परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून बेळगाव भागातील परिस्थिती बघितली तर ती अत्यंत भयावह आहे.

आपण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. पण बेळगावमध्ये परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे आपण सर्वांनी एकत्रितपणे निर्णय घेण्याची गरज आहे. सीमावाद न्यायप्रविष्ट असताना आपण यशवंतराव चव्हाण यांचे विचार व मानवतेचा धर्म डोळ्यासमोर ठेवून तिथल्या लोकांवर कधीही काठी उगारण्याचा प्रयत्न केला नाही. पण ‘येळूर’सारख्या गावात केवळ मराठीत फलक लावला म्हणून तेथील पोलीस मराठी भाषिकांना मारहाण करत आहेत. विद्यार्थी अन् बस कंडक्टरची तुंबळ हाणामारी; का भडकतो पुन्हा पुन्हा महाराष्ट्र-कर्नाटक वाद? आमदार पाटील म्हणाले, महाराष्ट्र – कर्नाटक सीमा वादात अनेकांनी हुतात्म्य पत्करले आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. मात्र शेजारच्या राज्याकडून मराठी भाषिकांना मिळणारी वागणूक निषेधार्ह आहे. त्याठिकाणी महाराष्ट्रातून जाणाऱ्या बसेसवर झेंडे लावले जातात. चालक – वाहकाला कन्नडची सक्ती केली जाते.

सांगली, सातारा, कोल्हापूर भागातील अनेक विद्यार्थी बेळगाव येथे शिक्षणासाठी जात आहेत. या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची काळजी सरकारने घेतली पाहिजे. महाराष्ट्रातील नोकऱ्या, उद्योगधंदे व रोजगाराच्या बाबतीत बोलताना आमदार पाटील म्हणाले, राज्यपालांनी आपल्या अभिभाषणात दावोस कराराचा उल्लेख केला. 15 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात झाल्याचे सांगितले. पण या कराराच्या माध्यमातून किती नोकऱ्या निर्माण झाल्या, किती उद्योग आले, किती टिकले, याबाबत काहीच माहिती नाही. झालेले करार तपासले तर अनेक कंपन्या केवळ कागदावरच आहेत, असे दिसून येत आहे. त्यामुळे उद्योगधंद्यांच्या बाबतीतही गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.

Web Title: Mla rohit patil said injustice against marathi speaking people in belgaum in maharashtra budget session 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2025 | 05:19 PM

Topics:  

  • Maharashtra Karnataka Border Dispute
  • Maharashtra Karnataka Dispute
  • Rohit Patil

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.