Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Impact of Delhi election results on Maharashtra: दिल्ली निवडणुकांचा निकाल; ठाकरे-पवारांसाठी मोठा धक्का

जेव्हा भाजपने ‘ऑपरेशन लोटस’च्या माध्यमातून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडली, तेव्हा केंद्र आणि महाराष्ट्रात AAP नेत्यांनी भाजपवर जोरदार टीका केली होती

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Feb 09, 2025 | 03:17 PM
Impact of Delhi election results on Maharashtra: दिल्ली निवडणुकांचा निकाल; ठाकरे-पवारांसाठी मोठा धक्का
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा (AAP) दारूण पराभव झाला. पण हा पराभव महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी (NCP) मोठा धक्का मानला जात आहे. या निवडणुकीत शिवसेना (UBT) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (SP) यांनी अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा दिला होता. पण दिल्ली निवडणुकीच्या निकालाने  भारतीय जनता पक्षाला (BJP) केवळ राजधानीतच नव्हे तर महाराष्ट्रातही मोठा जल्लोष साजरा करण्याची संधी मिळाली आहे. याचे कारण म्हणजे महाराष्ट्रात AAPची कधीही मोठी राजकीय ताकद नव्हती, पण शिवसेना (UBT) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (SP) ला केजरीवाल यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. भाजपविरोधी आघाडीत केजरीवाल हे शिवसेना (UBT) आणि NCP (SP) सोबत कायम उभे राहिले.  पण  या पराभवानंतर त्यांना मोठा धक्का बसला आहे.

महाराष्ट्राशी आम आदमी पक्षाचा संबंध

अरविंद केजरीवाल आणि महाराष्ट्राचा संबंध 2011-12 मध्ये भ्रष्टाचारविरोधी मोहिमेशी जोडला जातो. या मोहिमेचे नेतृत्व पुणे जिल्ह्यातील राळेगणसिद्धी येथील समाजसुधारक अण्णा हजारे यांनी केले होते. दिल्लीत रामलीला मैदानात झालेल्या आंदोलनात लोकपाल विधेयकाच्या मागणीसाठी अरविंद केजरीवाल, शांती भूषण, प्रशांत भूषण, किरण बेदी, मेधा पाटकर, स्वामी अग्निवेश, कर्नल देविंदर सहरावत आणि हर्ष मंदर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. एप्रिल 2011 मध्ये अण्णा हजारे यांनी लोकपालसाठी उपोषण केले होते.

Five reasons for BJP’s victory: दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचा विक्रमी विजय; ‘ही’ आहेत पाच प्रमुख कारणे

2025 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत मात्र अण्णा हजारे यांनी AAP विरोधात मतदान करण्याचे आवाहन केले होते. यावेळी त्यांनी केजरीवाल यांच्यावर जोरदार टीका करत, “नेत्याने निःस्वार्थ आणि प्रामाणिक असले पाहिजे. जर तुम्हाला लोकांचा पाठिंबा हवा असेल, तर हे गुण असणे गरजेचे आहे,” असे विधान केले.

भाजपविरोधी संघर्षात एकत्र आलेले नेते

भाजपविरोधातील राजकीय लढाईत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी हातमिळवणी केल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनीही त्यांना पाठिंबा दिला होता. जेव्हा भाजपने ‘ऑपरेशन लोटस’च्या माध्यमातून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडली, तेव्हा केंद्र आणि महाराष्ट्रात AAP नेत्यांनी भाजपवर जोरदार टीका केली होती.

केंद्र सरकारने गट ‘A’ अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्तीसाठी प्राधिकरण निर्माण करणारे विधेयक आणल्यानंतर केजरीवाल यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेत त्यांच्याकडून पाठिंबा मागितला. त्यांनी सर्व भाजपविरोधी पक्षांनी या कायद्याला विरोध करावा, असे आवाहन केले.

दिल्लीत भाजपचा विजय होताच प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांचं मोठं विधान; म्हणाले, ‘सर्व

अनेक आव्हानांसोबत लढाई

अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर शिवसेना (UBT) आणि NCP (SP) यांनी त्यांना पाठिंबा दर्शवत दिल्लीतील आंदोलनात सहभागी झाले होते. गेल्या वर्षी लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान केजरीवाल यांनी शिवाजी पार्क आणि BKC येथे INDIA आघाडीच्या सभांमध्ये हजेरी लावली होती. मात्र, दिल्लीतील पराभवामुळे शिवसेना (UBT) आणि NCP (SP) चिंतेत आल्या आहेत. भविष्यात भाजपविरोधी संघर्षात केजरीवाल यांना अनेक आघाड्यांवर लढावे लागणार आहे, असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.

Web Title: Bjps victory in delhi elections is a shock for uddhav thackeray and sharad pawar too nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2025 | 02:49 PM

Topics:  

  • Delhi Election 2025

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.