Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद नाहीत, काही कुरबुरी असतील तर…’; चंद्रशेखर बावनकुळे यांचं विधान

महायुतीचे सरकार हे समन्वयाने चालवावे लागते. ठाण्यापासून संपूर्ण कोकणच्या पट्टयात राष्ट्रवादीला कुठेच पालकमंत्रिपद मिळाले नव्हते. त्यामुळे त्यांच्याकडे रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 21, 2025 | 07:15 AM
राज्य सरकारकडून लवकरच नवं वाळू धोरण लागू करण्यात येत आहे.

राज्य सरकारकडून लवकरच नवं वाळू धोरण लागू करण्यात येत आहे.

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर आले आहे. त्यात देवेंद्र फडणवीस हे या सरकारचे नेतृत्त्व करत आहेत. मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. खातेपाटपही झाले. त्यानंतर विविध जिल्ह्यातील पालकमंत्री कोण असेल याच्या नावांची घोषणाही झाली. त्यामध्ये रायगडसाठी आदिती तटकरे तर नाशिक जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. मात्र, नंतर ही नावे मागे घेण्यात आली. त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान केले. ‘पालकमंत्रिपदावरून कोणतेही वाद नाहीत’, असे ते म्हणाले.

महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद नाहीत. काही कुरबुरी असतील त्यावर चर्चेतून मार्ग निघेल, असे महसूल मंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. सातारा, संभाजीनगर, यवतमाळ येथे आमचे मंत्री असतानासुद्धा शिवसेनेला पालकमंत्रिपद देण्यात आले आहे. पालकमंत्रिपदाबाबत तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी मिळून निर्णय घेतला आहे, असेही बावनकुळे म्हणाले.

रायगड, नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून सध्या महायुतीत विशेषतः शिवसेनेत नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर बावनकुळे म्हणाले, महायुतीचे सरकार हे समन्वयाने चालवावे लागते. ठाण्यापासून संपूर्ण कोकणच्या पट्टयात राष्ट्रवादीला कुठेच पालकमंत्रिपद मिळाले नव्हते. त्यामुळे त्यांच्याकडे रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. तसेच, नाशिक येथे आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांच्याकडे पालकमंत्रिपद देण्याची मागणी असल्याने निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, सत्ता न मिळाल्याने विरोधक अस्वस्थ असून, त्यांचा मानसिक पराभव झाला आहे. त्यामुळेच विरोधक सैफ अली खान यांच्यावरील हल्ला प्रकरणाचे तसेच बीड आणि परभणी येथील घटनांचे राजकारण करत आहेत. वास्तविक, अशा घटनांचे कोणीही राजकारण करू नये. संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनी आमच्या महायुतीकडे जास्त लक्ष देण्यापेक्षा आपली महाविकास आघाडी कशी टिकेल, याकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचा टोलाही या वेळी लगावला.

मुख्यमंत्री विरोधकांना पुरून उरतील

ज्या-ज्या वेळी राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार येते, त्या-त्या वेळी काही घटकांकडून महाराष्ट्र अशांत केला जातो, असेही बावनकुळे यांनी सांगितले. पण, विरोधकांचा हा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. आमचे सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे याला पुरून उरतील, असा विश्वासही बावनकुळे यांनी व्यक्त केला.

Web Title: Chandrashekhar bawankule talked about guardian minister issue nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2025 | 07:15 AM

Topics:  

  • chandrashekhar bawankule

संबंधित बातम्या

आधी पार्टीत धिंगाणा घातला, पोलिस येताच मंत्री बावनकुळेंच्या नावाने दमदाटी केली; नंतर कारवाई झाली
1

आधी पार्टीत धिंगाणा घातला, पोलिस येताच मंत्री बावनकुळेंच्या नावाने दमदाटी केली; नंतर कारवाई झाली

“जनतेमध्ये आक्रोश निर्माण झाला होता त्यामुळे हा निर्णय…; माणिकराव कोकाटेंबाबत बावनकुळे स्पष्टच बोलले
2

“जनतेमध्ये आक्रोश निर्माण झाला होता त्यामुळे हा निर्णय…; माणिकराव कोकाटेंबाबत बावनकुळे स्पष्टच बोलले

Tukdebandi Kayda : राज्य सरकारचा मोठा निर्णय; आता १ गुंठा भूखंड खरेदी-विक्री करता येणार
3

Tukdebandi Kayda : राज्य सरकारचा मोठा निर्णय; आता १ गुंठा भूखंड खरेदी-विक्री करता येणार

वरिष्ठांचा हिरवा तर स्थानिकांचा लाल कंदील; सुधाकर बडगुजरांचा भाजप प्रवेश करणार नाशिकमध्ये उलथापालथ? 
4

वरिष्ठांचा हिरवा तर स्थानिकांचा लाल कंदील; सुधाकर बडगुजरांचा भाजप प्रवेश करणार नाशिकमध्ये उलथापालथ? 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.