Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईला पाणीपुरवठा करणारी 5 धरणं पूर्ण क्षमतेने भरली; पवना धरणाच्या पाणीसाठ्यात देखील वाढ

मुंबईला पाणीपुरवठा करणारी 5 धरणं पूर्ण क्षमतेने भरली आहेत. तुलसी, विहार, मोडक सागर, मध्य वैतरणा आणि तानसा ही जलाशये ओव्हर फ्लो झाली आहेत. आज ७ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमधील पाणीसाठा १३,०५,९४८ दशलक्ष लिटर इतका झाला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 07, 2024 | 12:37 PM
आपल्या पाण्याची चिंता मिटली?; राज्यातील बहुतांश धरणे तुडुंब भरली

आपल्या पाण्याची चिंता मिटली?; राज्यातील बहुतांश धरणे तुडुंब भरली

Follow Us
Close
Follow Us:

मुंबईला पाणीपुरवठ्या करणाऱ्या धरणांच्या पाण्यात प्रचंड वाढ झाली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारी 5 धरणं पूर्ण क्षमतेने भरली आहेत. याबाबत मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या X अकाऊंटवर माहिती दिली आहे. महानगरपालिकेने मंबईला पाणीपुरवठ्या करणाऱ्या धरणांची आकडेवारी जाहीर केली आहे. मुंबईत लागू करण्यात आलेली पाणीकपात 29 जुलैपासून बंद करण्यात आली आहे. तसेच आता मुंबईला पाणी पुरवठा करणारी धरणं देखील पूर्ण क्षमतेने भरली आहेत. त्यामुळे आता मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटली आहे.

हेदेखील वाचा- हवामान विभागाने दिला मुसळधार पावसाचा इशारा! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी

मे महिन्यापासून मुंबईत पाणीकपात लागू करण्यात आली होती. मात्र जून आणि जुलै महिन्यात मुंबईत दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाण्याच्या क्षमतेमध्ये वाढ झाली. त्यामुळे मुंबई महापालिकेने शहरात लागू करण्यात आलेली पाणीकपात बंद केली. आजच्या आकडेवारीनुसार मुंबईला पाणीपुरवठ्या करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठा 90 टक्क्यांपर्यंत भरला आहे. मुंबईत पावसाचा जोर कायम राहिल्यास ही सर्व धरणं 100 टक्के क्षमतेने भरतील.

महानगर पालिकेने जारी केलेल्या आकडेवारीनुसार मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणातील पाणीसाठा –

  • अप्पर वैतरणा -80.14 टक्के पाणीसाठा
  • मोडक सागर – 100 टक्के पाणीसाठा
  • तानसा – 99.30 टक्के पाणीसाठा
  • मध्य वैतरणा – 96.01टक्के पाणीसाठा
  • भातसा – 87.79 टक्के पाणीसाठा
  • विहार – 100 टक्के पाणीसाठा
  • तुलसी – 100 टक्के पाणीसाठा
हेदेखील वाचा- 7 वर्षे परफ्यूम वापरला पण सुगंधाने एकही तरूणी जवळ आली नाही; तरूणाची कोर्टात धाव

अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या 7 जलाशयांमधून मुंबईला पाणी पुरवठा केला जातो. यामध्ये 5 धरण आणि 2 तलाव आहेत. मुंबईला पाणीपुरवठा करणारी 5 धरणं पूर्ण क्षमतेने भरली आहेत. तुलसी, विहार, मोडक सागर, मध्य वैतरणा आणि तानसा ही जलाशये ओव्हर फ्लो झाली आहेत. आज ७ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमधील पाणीसाठा १३,०५,९४८ दशलक्ष लिटर इतका झाला आहे. म्हणजेच या धरणांमध्ये एकूण ९०.२३ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

मुंबईसह मावळ तालुक्यातील पवना धरणातील पाणीसाठा देखील 93.64 टक्के इतका झाला आहे. त्यामुळे पवना धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू करण्यात आला होता. पवना धरणातून मावळ तालुका आणि पिंपरी- चिंचवड शहराला पाणी पुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसांपासून पवना धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे पवना धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. त्यामुळे पवना धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू करण्यात आला होता. मात्र गेल्या 2 दिवसांपासून पवना धरण क्षेत्रात पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे धरणातून केला जाणारा विसर्ग आता थांबविण्यात आला आहे. पवना धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्याने आता मावळ आणि पिंपरी चिंचवड तालुक्यातील नागरिकांच्या पाण्याची चिंता मिटली आहे. मागील २४ तासांत पवना धरण पाणलोट क्षेत्रात केवळ ११ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Web Title: Mumbai news 5 dams supplying water to mumbai filled to capacity

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2024 | 12:37 PM

Topics:  

  • Mumbai

संबंधित बातम्या

Mumbai Local Fire: ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग
1

Mumbai Local Fire: ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग

Prakash Mahajan: “चार महिने लंडनमध्ये राहणाऱ्यांना मुंबईच्या समस्या काय कळणार”, प्रकाश महाजन यांची उबाठा-मनसेवर टीका
2

Prakash Mahajan: “चार महिने लंडनमध्ये राहणाऱ्यांना मुंबईच्या समस्या काय कळणार”, प्रकाश महाजन यांची उबाठा-मनसेवर टीका

Devendra Fadnavis on UBT: “तुमचा स्क्रिप्ट रायटर बदला…”, राज-उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर मुख्यमंत्र्यांची जळजळीत टीका
3

Devendra Fadnavis on UBT: “तुमचा स्क्रिप्ट रायटर बदला…”, राज-उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर मुख्यमंत्र्यांची जळजळीत टीका

Mahesh Manjrekar: “मुंबईकर म्हणून मला लाज वाटते”, महेश मांजरेकरांनी व्यक्त केली तीव्र खंत
4

Mahesh Manjrekar: “मुंबईकर म्हणून मला लाज वाटते”, महेश मांजरेकरांनी व्यक्त केली तीव्र खंत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.