Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष बदला’; मागणीला वाढतोय जोर

सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्ष आहेत. असे असतानाच नव्या तरुण रक्ताला संधी द्या, पक्षाला वेळ देईल असा प्रदेशाध्यक्ष निवडा, अशी मागणी करण्यात आली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 10, 2025 | 07:13 AM
हे सगळं कुणीतरी रचतंय! माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेवर जयंत पाटलांना वेगळाच संशय

हे सगळं कुणीतरी रचतंय! माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेवर जयंत पाटलांना वेगळाच संशय

Follow Us
Follow Us:

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. त्यातच विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात बहुतेक सर्वच पक्षांचे प्रदेशाध्यक्ष बदलण्याचे वारे वाहत आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा गटही त्यास अपवाद राहिलेला नाही. त्यांच्या पक्षाकडूनही आता मागणीला जोर दिला जात आहे.

सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्ष आहेत. असे असतानाच नव्या तरुण रक्ताला संधी द्या, पक्षाला वेळ देईल असा प्रदेशाध्यक्ष निवडा, अशी मागणी करण्यात आली आहे. पवार गटाच्या निवडणुकीनंतरच्या पहिल्याच व्यापक बैठकीतील एका कार्यकर्त्याचे भाषण व्हायरल होत असून, त्यात ही मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्रदेशाध्यक्ष मराठा समाजातील नको, असेही या कार्यकर्त्याने म्हटले आहे.

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि पर्यायाने शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा दारुण पराभव झाला. त्यानंतर पक्षाची पहिलीच महत्त्वाची बैठक मुंबईत होत आहे.

सर्वांचे राजीनामे घ्या, तरुणाईला संधी द्या

सर्वांचे राजीनामे घ्या आणि तरुणांना संधी द्या. प्रदेशाध्यक्षापासून सर्व बदला. सामान्य कार्यकर्त्यांना भेटेल, अशा बिगरमराठा तरुण नेत्याला संधी द्या. राज्यात वेगळे वातावरण चालू आहे, आपल्याला पवार साहेबांच्या नेतृत्वाचा फायदा घ्यायचा असेल तर पक्षासाठी वेळ देऊ शकेल अशा कार्यकर्त्याला अध्यक्षपदी संधी द्या. याचा अर्थ जयंत पाटील वेळ देत नव्हते असा नाही. पण, नवीन तरुणांना संधी द्या, अशी विनंती करतो, असे एका कार्यकर्त्याने सांगितले.

पराभवाचे कारण आणि नाराजीचे सूर

शरद पवार यांच्या पक्षात, गेल्या काही दिवसांपासून काही आलबेल नसल्याच्या चर्चा सुरू आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावरही अनेकांची नाराजी आहे. त्यामुळे पक्षाच्या काही प्रमुख नेत्यांनी विधानसभा निवडणुकीतील अपयशासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील  यांना जबाबदार धरले आहे. उमेदवारांच्या निवड प्रक्रियेमध्ये स्थानिक नेत्यांच्या सूचना दुर्लक्षित केल्याचा आरोप होत आहे. निवड समितीकडून आलेल्या काही नावांवर फुली मारल्यामुळे नाराजी वाढली आहे.

लोकसभा निवडणुकीत 8 जागांवर विजय

लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाने १० जागांवर लढत ८ जागांवर विजय मिळवला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळालं नाही. पवार गटाने ८६ जागांवर उमेदवार उभे केले होते, पण फक्त १० जागांवरच विजय मिळवता आला. विधानसभा निवडणुकीतील या अपयशामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटात राजकीय हालचालींना वेग आला आहे, आणि प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या शक्यतेची चर्चा सुरु आहे.

Web Title: Sharad pawars ncp state president may be changed soon nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2025 | 07:13 AM

Topics:  

  • jayant patil

संबंधित बातम्या

‘विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज म्हणजे लोकशाहीच्या मूल्यांवरच..,’ दिल्लीतील आंदोलनावर जयंत पाटलांचे मोठे वक्तव्य
1

‘विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज म्हणजे लोकशाहीच्या मूल्यांवरच..,’ दिल्लीतील आंदोलनावर जयंत पाटलांचे मोठे वक्तव्य

सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून हटवल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक, ‘हे भ्याड सरकार आहे,’ म्हणत केला हल्लाबोल
2

सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून हटवल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक, ‘हे भ्याड सरकार आहे,’ म्हणत केला हल्लाबोल

‘अजितदादांनंतर जयंत पाटीलच अर्थखातं सांभाळू शकतात, पण..,’ सुषमा अंधारेंचं मोठं विधान; तटकरे, प्रफुल्ल पटेलांवर सडकून टीका
3

‘अजितदादांनंतर जयंत पाटीलच अर्थखातं सांभाळू शकतात, पण..,’ सुषमा अंधारेंचं मोठं विधान; तटकरे, प्रफुल्ल पटेलांवर सडकून टीका

‘केवळ सत्तेच्या एखाद्या तुकड्यासाठी..,’ राष्ट्रवादीच्या एनडीए प्रवेशाच्या चर्चांवर अंबादास दानवे यांचे परखड मत
4

‘केवळ सत्तेच्या एखाद्या तुकड्यासाठी..,’ राष्ट्रवादीच्या एनडीए प्रवेशाच्या चर्चांवर अंबादास दानवे यांचे परखड मत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.