छगन भुजबळ यांचं थेट PM नरेंद्र मोदी आणि CM फडणवीसांना पत्र; पत्रात नक्की काय, वाचा सविस्तर
नाराजीच्या या वातावरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. मंत्रिमंडळातून डावलल्यामुळे छगन भुजबळ नाराज आहेत. याबाबत नाशिकमध्ये समता परिषदेचा मेळावा घेऊन भूमिका मांडली.ते भाजपमध्ये जाणार असल्याच्याही चर्चा असताना मोदी आणि फडणवीसांना पत्र लिहिल्यामुळे पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे.
“मी आमदार होणं किंवा मंत्री होणं हे माझं काम नाही आणि मला मंत्रिपदाची हाव असती तर मी १६ नोव्हेंबरला राजीनामा देऊन १७ नोव्हेंबरला आलो नसतो. मी राजीनामा दिला होता पण उल्लेख केला नाही कारण मला तसे फोन सारखे येत होते. मी राजीनामा दिला होता हे मी अडीच महिन्यांनी सांगितलं.मात्र प्रश्न फक्त मंत्रिपदाचा नाही तर अस्मितेचा आहे. एखाद्या समाजाला बरोबर घेऊन लढणारी माणसं आपल्याकडे आहेत. कुणीही दुःखात राहण्याचं कारण नाही असं म्हणत त्यांनी, कभी डर न लगा मुझे फासला देखकर, मै बढता गया रास्ता देख कर, खुदही खुद नजदिक आती गयी मंजिल मेरा बुलंद हौसला देखकर”, अशी शायरी आज एका मुलाखतीत बोलून दाखवली होती. त्यानंतर आता त्यांनी फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे.
लाल कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे राज्यातील कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क माफ करण्यात यावे, अशी मागणी आपण देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी, केंद्रीय वाणिज्यमंत्री मा. पीयूषजी गोयल यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. तर महाराष्ट्रातील कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क माफ करण्यासाठी केंद्र शासनाकडे शिफारस करावी, अशी मागणी मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
लाल कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे राज्यातील कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क माफ करण्यात यावे, अशी मागणी आपण देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी, केंद्रीय वाणिज्यमंत्री मा. पीयूषजी गोयल यांच्याकडे पत्राद्वारे… pic.twitter.com/NOy3XdieS6
— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) December 19, 2024
कांद्याच्या भावाचा परिणाम हा शेतकऱ्यांच्या जीवन मरणाशी निगडीत असून वेळोवेळी कांद्याच्या किमान निर्यात दरातील वाढीचा किंवा निर्यातबंदीचा जिल्ह्यातील कांदा निर्यातीवर विपरीत परिणाम होत आहे. आपल्या येवला मतदारसंघातील लासलगावमध्ये आशिया खंडातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ असून येथून मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात होते. सद्यस्थितीत उन्हाळ कांद्याचे उत्पादन संपले असून लाल कांद्याची बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आवक होत आहे, मात्र कांद्याचे दर घसरल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीतया आहे. आधीच बिगरमोसमी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे त्रस्त असताना आता उत्पादन खर्चापेक्षाही कमी दर मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. लाल कांदा टिकाऊ नसल्याने तात्काळ विक्री करावी लागते, हेही नुकसानीचे महत्वाचे कारण आहे.
त्यामुळे हे नुकसान टाळण्यासाठी, राज्यातील शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळणे गरजेचे असून राज्यात उत्पादित लाल कांद्याची परदेशात जास्तीत जास्त निर्यात होणे आवश्यक आहे. त्यासाठी २० टक्के निर्यात शुल्क हटविणे गरजेचे आहे. तसेच श्रीलंका सरकारने कांद्यावरील आयातशुल्क २० टक्क्यांनी कमी करुन अधिकाधिक कांदा आयातीचे प्रयत्न सुरु केले आहे.
त्यामुळे नाशिकसह राज्यातील शेतकऱ्यांना त्यांचा लाल कांदा श्रीलंकेसह परदेशांमध्ये निर्यात करता यावा यासाठी केंद्र सरकारने कांद्यावरील २० टक्के निर्यातशुल्क तातडीने माफ करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी आपण केली आहे. आपल्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळून लवकरच आपल्या बळीराजाला दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे.