
PM Narendra Modi visit to Puducherry draws strong criticism from Congress party
द्रमुक आणि काँग्रेसवर निशाणा साधताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “डबल इंजिन सरकारच्या चांगल्या कामाचे स्वागत करणे महत्त्वाचे आहे, परंतु पूर्वी परिस्थिती किती वाईट होती हे देखील लक्षात ठेवा. काँग्रेस आणि द्रमुकच्या राजवटीत पुद्दुचेरी राजकीय अस्थिरता, भ्रष्टाचार, गुन्हेगारी आणि गरिबांसाठी असलेल्या अडचणींनी त्रस्त होते. रेशन दुकानांमध्ये तांदळाची कमतरता होती, पगारात विलंब झाला होता आणि रस्त्यांवर गुंड आणि ड्रग्ज माफियांचे राज्य होते. या पक्षांनी पुद्दुचेरीचा विकास रोखला होता, अशी टीका पंतप्रधान मोदींनी केली आहे.
हे देखील वाचा : अयातुल्ला अली खामेनेईच्या हत्येमुळे रमजानवर पसरली शोककळा; शिया मुस्लीमांचा भारतात शोक
पुढे पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, “काँग्रेसने पुद्दुचेरीला दिल्लीतील एका कुटुंबासाठी एटीएम बनवले होते. द्रमुकवर आरोप करत ते म्हणाले की तामिळनाडूमध्ये भ्रष्टाचाराची असंख्य प्रकरणे आहेत. काँग्रेस आणि द्रमुक यांनी पुद्दुचेरीच्या विकासात अडथळा आणला. आता, याच शक्तींना पुन्हा सत्तेत यायचे आहे. पुद्दुचेरी भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीच्या युगात परतेल का? मला खात्री आहे की पुद्दुचेरीच्या लोकांना ते नको असेल.”असे मोदी म्हणाले आहेत.
Vanakkam Puducherry! Delighted to be among my sisters and brothers of Puducherry for the launch of several development works. The double-engine NDA government has worked extensively for the welfare of the people. pic.twitter.com/Acs1Swj0WF — Narendra Modi (@narendramodi) March 1, 2026
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्यटन हे पुद्दुचेरीचे बलस्थान असल्याचे वर्णन करताना म्हटले की, “ते एक प्रमुख वीकेंड डेस्टिनेशन बनले आहे, जे हजारो पर्यटकांना आकर्षित करते. गाड्या आणि विमाने नेहमीच भरलेली असतात आणि हे पुद्दुचेरीच्या लोकांच्या प्रेमामुळे आहे. आध्यात्मिक, पर्यावरणीय पर्यटन आणि आरोग्य पर्यटनातील गुंतवणूक आपल्याला नवीन उंचीवर घेऊन जात आहे.”
हे देखील वाचा : Iran Israel वादाचे भारतात पडसाद; खामेनेईच्या मृत्यूनंतर शेकडो शिया मुस्लीम रस्त्यावर, श्रीनगरमध्ये जोरदार निदर्शने
पुद्दुचेरी एक वैद्यकीय पर्यटन केंद्र
आरोग्यावर भर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, जोपर्यंत मानवी संसाधने निरोगी आहेत तोपर्यंत देशाची प्रगती शक्य आहे. ते म्हणाले, “आरोग्यसेवा ही आमची प्राथमिकता आहे आणि ती सर्वांना उपलब्ध, उपलब्ध आणि परवडणारी असावी.” त्यांनी असेही म्हटले की पुद्दुचेरीच्या नागरिकांना उपचारांसाठी लांबचा प्रवास करावा लागू नये. पुद्दुचेरीमध्ये आधीच नऊ वैद्यकीय महाविद्यालये असल्याने ते वैद्यकीय पर्यटन केंद्र बनू शकते, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.