Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“….आता नातू भाजपावर संविधान बदलाचा आरोप करतो”; अकलूजमध्ये धडाडली नितीन गडकरींची तोफ

टेंभू आणि म्हैसाळ या पाणी उपसा सिंचन योजनांना मी निधी दिल्यानेच या योजना सुरू झाल्या आहेत. या देशातील शेतकरी अन्नदात्या बरोबरच इंधनदाता कसा होईल, या दृष्टीने केंद्रीय सरकार पावले उचलत आहे, असे नितीन गडकरी म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 17, 2024 | 02:42 PM
....आता नातू भाजपावर संविधान बदलाचा आरोप करतो"; अकलूजमध्ये धडाडली नितीन गडकरींची तोफ

....आता नातू भाजपावर संविधान बदलाचा आरोप करतो"; अकलूजमध्ये धडाडली नितीन गडकरींची तोफ

Follow Us
Close
Follow Us:

अकलूज: राज्यात विधानसभा निवडणूक अगदी शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. उद्या प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. प्रचारसभा घेऊन महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. २० तारखेला मतदान तर २३ तारखेला मतमोजणी होणार आहे. दरम्यान केंद्रीय मंत्री आणि खासदार नितीन गडकरी यांनी अकलुजमध्ये महायुतीच्या उमेदवारासाठी प्रचारसभा घेतली आहे. यावेळी त्यांनी संविधान बदलाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीवर टीका केली आहेत. नितीन गडकरी यांनी राम सातपुते यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. नितीन गडकरी यावेळेस नेमके काय म्हणाले आहेत, ते जाणून घेऊयात.

“अलाहाबाद कोर्टाने इंदिरा गांधी यांची निवडणुक रद्द ठरवल्यानंतर काँग्रेसने १९७५ साली संविधान बदलण्याचे पाप केले, आता त्यांचा नातू भाजपावर संविधान बदलणार असल्याचा आरोप करतो आहे. संविधान तर तुम्ही बदलले. काँग्रेसने गरीबी हटावचा नारा दिला आणि निवडणुका जिंकल्या परंतु त्यांनी आदिवासी, दलित आणि गरीबांची गरीबी न हटवता आपल्या सत्तेचा दुरूपयोग करून स्वतःच्या बगलबच्चांची गरीबी हटवली. त्यामुळेच भारताची प्रगती होऊ शकली नसल्याचा घणाघाती आरोप,” केंद्रीय वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी केला.

हेही वाचा: “तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी घटना…”; इचलकरंजीतून नितीन गडकरींचे विधान

खेडी शहराला जोडण्याचे काम

केंद्रीयमंत्री गडकरी म्हणाले, काँग्रेस जे गत ६० वर्षात करू शकली नाही ते आम्ही पक्त १० वर्षात केले. देशाला स्वयंपूर्ण, आत्मनिर्भर व संरक्षण क्षेत्रात खंबीर केले. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना राबवून संपुर्ण देशातील खेडी शहराला जोडण्याचे काम केले. येणाऱ्या काळात गावे समृध्द आणि संपन्न करण्याची योजना पक्त भाजपाचे सरकारच राबवू शकते.

पाणी उपसा सिंचन योजनांना निधी

केंद्रीयमंत्री गडकरी म्हणाले, या भागातील टेंभू आणि म्हैसाळ या पाणी उपसा सिंचन योजनांना मी निधी दिल्यानेच या योजना सुरू झाल्या आहेत. या देशातील शेतकरी अन्नदात्या बरोबरच इंधनदाता कसा होईल, या दृष्टीने केंद्रीय सरकार पावले उचलत आहे. तरूणांची बेरोजगारी घालवून त्यांच्या हाताला काम देण्यासाठी विविध योजना आखत आहे. सिंचनाला प्राधान्य दिले जात असल्याचे गडकरी यांनी नमूद केले.

📍अकलुज, माळशिरस, सोलापूर माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे भाजप-महायुतीचे उमेदवार श्री @RamVSatpute जी यांच्या प्रचारार्थ अकलुज, सोलापूर येथे आयोजित जाहीर सभेला आज संबोधित केले. सोलापूर ही संतांची भूमी आहे. मागील १० वर्षांत जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गांची लांबी तीन पटीने वाढली… pic.twitter.com/QpQfi0S1RL — Nitin Gadkari (@nitin_gadkari) November 16, 2024

मंत्री गडकरी म्हणाले, उद्योग आणि व्यापारात खऱ्या अर्थाने प्रगती करायची असल्यास मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध असणे गरजेचे आहे. जोपर्यंत या सुविधा निर्माण होत नाहीत तोपर्यंत कोणत्याच भागाचा विकास होणार नाही. पाणी, वीज, दळणवळण यामध्ये देशाची प्रगती होत आहे. केंद्रात सत्तेत आल्यानंतर देशातील ७० टक्के नॅशनल हायवेचे काम पुर्ण झाले आहे. आता राज्य अंतर्गत रस्ते आणि उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यात येणार आहे. जोपर्यंत विकासाला गती मिळत नाही, तोपर्यंत सर्वसामान्य कष्टकऱ्यांची प्रगती होणार नाही.

Web Title: Nitin gadkari criticizes to mva and congress for constitution change narrative ram satpute rally akluj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2024 | 02:42 PM

Topics:  

  • Akluj
  • Maharashtra Assembly election 2024
  • Nitin Gadkari

संबंधित बातम्या

Solapur News : शिक्षणाबरोबरच सृजनात्मक कला अवगत करावी; ‘सृजनरंग’ महोत्सव पारितोषिक समारंभ उत्साहात
1

Solapur News : शिक्षणाबरोबरच सृजनात्मक कला अवगत करावी; ‘सृजनरंग’ महोत्सव पारितोषिक समारंभ उत्साहात

Nagpur News: नागपूरची सिलिंडरमुक्तीकडे वाटचाल; नितीन गडकरींकडून HCGच्या CGS कम मदर स्टेशनचे उद्घाटन
2

Nagpur News: नागपूरची सिलिंडरमुक्तीकडे वाटचाल; नितीन गडकरींकडून HCGच्या CGS कम मदर स्टेशनचे उद्घाटन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.