Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात; नाफेड ‘एनसीसीएफ’कडून खरेदी होत नसल्याने चिंतेत भर

नाफेड एनसीसीएफमार्फत सुमारे 3 लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, तीन महिने उलटले तरीही खरेदी सुरू झालेली नाही. लासलगावात सध्या कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 11, 2025 | 07:04 AM
राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात; नाफेड 'एनसीसीएफ'कडून खरेदी होत नसल्याने चिंतेत भर

राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात; नाफेड 'एनसीसीएफ'कडून खरेदी होत नसल्याने चिंतेत भर

Follow Us
Close
Follow Us:

नाशिक : अवकाळी पावसामुळे कांद्याचे प्रचंड नुकसान झाले. त्यातच आता बाजारातही कांद्याला भाव मिळत नाही. गुरुवारी सर्वाधिक 20 रुपये किलो घाऊक भाव मिळाला. तर दुसरीकडे, केंद्र सरकारच्या नाफेड एनसीसीएफमार्फतही कांद्याची खरेदी होत नसल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.

नाफेड एनसीसीएफमार्फत सुमारे 3 लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, तीन महिने उलटले तरीही खरेदी सुरू झालेली नाही. लासलगावात सध्या कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. घोषणा होऊन अद्याप नाफेडची कांदा खरेदी नाही. नाफेडला जर कांदा खरेदी करायचा असेल तर तीन हजार रुपये क्विंटलने कांदा खरेदीची मागणी करण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांना लाभ होईल.

सध्या कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. तीन महिन्यांपूर्वी नाफेड, एनसीसीमार्फत कांदा खरेदी केला जाईल, अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र, खरेदी सुरू झाली नाही.

हेदेखील वाचा : School abuse case : शालेय विद्यार्थिनींच्या प्रकरणाचे विधानसभेत पडसाद उमटले, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले महत्त्वाचे आदेश

दरम्यान, नाफेडच्या अध्यक्षांनी पण या व्यवस्थेवर बोट ठेवले होते. मग तरीही त्याच पद्धतीची खरेदी यावर्षी सुरू आहेत का? अशा शंका शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण होत आहे. त्यामुळे कांदा खरेदीत पारदर्शकता आणणे गरजेचे आहे, असे शेतकऱ्यांचे मत आहे.

लासलगाव बाजारात झाली सर्वाधिक आवक

गुरुवारी छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीत ३६३२ क्विंटल कांद्याची आवक झाली, तर कमीत कमी ३०० रुपये क्विंटलने भाव मिळाला, जो ३५० रुपयांनी कमी होता. तर सरासरी दर १७५ रुपयांनी उतरले. तसेच लासलगावमध्ये सर्वाधिक ९ हजार २८२ क्विंटल कांद्याची आवक झाली. आवक जास्त असली तरीही भाव मात्र आधीपेक्षा २५ रुपयांनी कमी मिळाला. कोल्हापुरात जास्तीत जास्त २ हजार रुपये भाव मिळाला, जो मागील दरापेक्षा २०० रुपयांनी कमी होता.

Web Title: Onion farmers in maharashtra are in crisis due to onion price issue

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2025 | 07:04 AM

Topics:  

  • maharashtra farmers
  • onion farmers

संबंधित बातम्या

माणिकराव कोकाटेंना झाली उपरती; अजित पवारांच्या भेटीच्या दिवशी अखेर आला शेतकऱ्यांबाबत कळवळा
1

माणिकराव कोकाटेंना झाली उपरती; अजित पवारांच्या भेटीच्या दिवशी अखेर आला शेतकऱ्यांबाबत कळवळा

‘शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा; अन्यथा गांजा लागवडीला परवानगी द्या’; स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी
2

‘शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा; अन्यथा गांजा लागवडीला परवानगी द्या’; स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

राज्यात रखडलेल्या मान्सूनचा प्रवास परत झाला सुरु; बळीराजाला मिळाला दिलासा
3

राज्यात रखडलेल्या मान्सूनचा प्रवास परत झाला सुरु; बळीराजाला मिळाला दिलासा

कांद्याला हंगामातील मिळाला सर्वात कमी दर; 800 ते 1500 रुपये प्रति क्विंटल भाव
4

कांद्याला हंगामातील मिळाला सर्वात कमी दर; 800 ते 1500 रुपये प्रति क्विंटल भाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.