Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऑक्टोबरच्या पावसामुळे कांदा सडला; शेतकऱ्यांचे झाले मोठे नुकसान

गेल्या आठवड्यापासून या पिकाची काढणी सुरू असून, उत्पादित कांदा हा गोण्यामध्ये भरून दोनवेळा सोलापूर बाजार समितीमध्ये पाठविला. परंतु, तेथेही कांदा स्वीकारण्यात आला नाही.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 22, 2024 | 08:44 AM
कांदा ८० तर लसणाचा ४०० रुपये प्रतिकिलो दर

कांदा ८० तर लसणाचा ४०० रुपये प्रतिकिलो दर

Follow Us
Close
Follow Us:

सोलापूर : इंदापूर तालुक्यातील भांडगाव येथील शेतकऱ्याचे कांद्याचे पीक पावसाने शेतात सडून गेले आहे. त्यामुळे उत्पादित कांदा सध्या अतिशय खराब निघत आहे. त्यामुळे हा कांदा सोलापूर बाजार समितीतून दोनवेळा माघारी आला आहे. परिणामी, शेतकऱ्याला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

पांडुरंग शिवाजी गायकवाड असे या नुकसानग्रस्त दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव आहे. गायकवाड यांनी साडेतीन महिन्यांपूर्वी एक एकर क्षेत्रावर सारा पद्धतीने बियाणे विस्कटून कांद्याचे पीक घेतले. या पिकातील आंतरमशागतीची कामे, रासायनिक खते, औषध फवारणी यासाठी पिकाची काढणीपर्यंत सुमारे 40 हजार रुपये खर्च त्यांना आला आहे. हे पीक अडीच महिन्यांचे होते, परंतु सप्टेंबरचा शेवटच्या आठवडा व ऑक्टोबर महिन्यात चांगला पाऊस झाल्याने गेली महिनाभर या पिकाची काढणी पांडुरंग गायकवाड यांना करता आली नाही. त्यामुळे कांदा शेतात सडून जाऊन खराब झाला आहे.

गेल्या आठवड्यापासून या पिकाची काढणी सुरू असून, उत्पादित कांदा हा गोण्यामध्ये भरून दोनवेळा सोलापूर बाजार समितीमध्ये पाठविला. परंतु, तेथेही कांदा स्वीकारण्यात आला नाही. त्यामुळे उत्पन्न तर सोडाच उलट वाहतूक खर्च, गोण्याचा खर्च आदी खर्च खिशातून करावा लागत असल्याचे त्यांचा मुलगा दत्ता गायकवाड यांनी सांगितले.

उर्वरित कांदा पिकाची काढणी सुरू

सध्या उर्वरित कांदा पिकाची काढणी सुरू असून, शेतमजुरांवर खिशातून खर्च करावा लागत आहे. त्यामुळे या कांदा पिकापासून मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. पावसामुळे खराब झालेल्या कांद्याचे पंचनामे करून शासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही दत्ता गायकवाड यांनी केली आहे.

Web Title: Onion rotted due to october rains nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2024 | 08:44 AM

Topics:  

  • Maharashtra Weather

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.