Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अवकाळी पावसाने शेतीचे व फळ बागांचे मोठे नुकसान, आपत्तीग्रस्त लोकं मदतीच्या प्रतिक्षेत

अवकाळी पावसामुळे पालघरमधील शेतकरी व नागरिक हवालदिल झाले आहेत. या अचानक आलेल्या पावसामुळे घरांचे व शेतीचे मोठे नुकसान झाले आहेत.

  • By मयुर नवले
Updated On: May 08, 2025 | 08:42 PM
अवकाळी पावसाने शेतीचे व फळ बागांचे मोठे नुकसान, आपत्तीग्रस्त लोकं मदतीच्या प्रतिक्षेत

अवकाळी पावसाने शेतीचे व फळ बागांचे मोठे नुकसान, आपत्तीग्रस्त लोकं मदतीच्या प्रतिक्षेत

Follow Us
Close
Follow Us:

मोखाडा / दीपक गायकवाड: पालघर जिल्ह्यात बुधवार दि. 7 मे रोजी झालेल्या अवकाळी पावसाने ग्रामीण भागातील आदिवासी बांधवांचे अतोनात नुकसान केले आहे. तसेच, वादळी पावसामुळे किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांचे तसेच जिल्ह्यातील इतर भागांतील घरांचे व शेतीचे व फळ बागांचे मोठे नुकसान झालेले आहे. एकूणच वास्तविक परिस्थितीचे अवलोकन करण्यासाठी खासदार डॉ हेमंत सवरा यांनी आज जिल्ह्यात ठिक ठिकाणी भेट दिली आहे. यावेळी विशेष बाब तातडीने मदत मिळवून देण्याची ग्वाही सवरा यांनी आपत्तीग्रस्तांना दिली आहे.

पालघर जिल्ह्यात अवकाळी वादळी पावसामुळे किनारपट्टी भागातील मच्छीमार बांधवांवर मोठे संकट ओढावले आहे. बोटी, जाळी, मासेमारीसाठीची यंत्रसामग्री यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, अनेक कुटुंबांच्या घरांची छतं उडून गेली आहेत. या पार्श्वभूमीवर पालघरचे खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आहे.

Raigad : घोटभर पाण्यासाठी वणवण, आम्ही माणसं आहोत की गुरं? लाडक्या बहिणीला पैसे नको पाणी द्या; गावकऱ्यांनी केला संताप व्यक्त

खासदारांनी मच्छीमार बांधवांशी ग्रामीण भागातील आदिवासी बांधवांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आणि नुकसानग्रस्त बोटी तसेच साधनसामग्रीची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी प्रशासनाला तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाईची प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

“मच्छीमार समाज हा आर्थिकदृष्ट्या अत्यंत कष्टकरी आहे. अशा आपत्तीच्या वेळी शासनाने त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे अत्यावश्यक आहे. सध्याच्या शासकीय नियमानुसार नादुरुस्त बोटींना आणि अन्य नुकसानग्रस्तांना दिली जाणारी मदत अत्यंत अपुरी आहे. त्यामुळे या नुकसानग्रस्तांना योग्य तो मोबदला मिळावा, यासाठी मी स्वतः मुख्यमंत्री आणि मत्स्य व्यवसाय मंत्री यांच्याकडे तौक्ते चक्रीवादळाच्या वेळी ज्या पद्धतीने विशेष आर्थिक मदत जाहीर करण्यात आले होते, त्याच धर्तीवर याही वेळी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करण्याची मागणी केली आहे. मदतीचा मार्ग जलदगतीने खुला व्हावा यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे सवरा यांनी सांगितले आहे.”

तसेच, जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये घरांचे व शेतीचे झालेले नुकसानही गंभीर आहे. या ठिकाणीही तातडीने पंचनामे करून शासकीय आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले. या दौऱ्यात मच्छीमार संघटनांचे पदाधिकारी, पक्षीय पदाधिकारी, स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

Pahalgam Terror Attack: भाजपच्या मंडळ अध्यक्षाने बांगलादेशींचे घेतले वकील पत्र; शिवसेना ठाकरे गटाचा आरोप

दरम्यान आजही पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. पावसाचे प्रमाण जोरदार असले तरी वादळाने विश्रांती घेतल्याने कोणत्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही. तथापि, वीजेचा लपंडाव मात्र सुरुच होता.डहाणू गंजाड भागांतून विद्यूत पुरवठा होत असल्याने दरम्यान कुठेही तांत्रिक बिघाड झाल्यास थेट मोखाडा तालुक्यातील शेवटच्या टोका पर्यंत विद्यूत पुरवठा दीर्घकाळ खंडित होत असतो. ही बाब दरवर्षी पावसाळ्यात सुरुवातीला व अखेरीस उद्भवत असते .त्यामुळे जामसर येथील केंद्राचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी पुन्हा चर्चेत आली आहे.

Web Title: Palghar news unseasonal rains cause major damage to agriculture

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2025 | 08:42 PM

Topics:  

  • maharashtra news
  • Marathi News
  • Palghar news

संबंधित बातम्या

Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी
1

Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे
2

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Ratnagiri News : चिपळूण नागरीतर्फे नवरात्रोत्सवनिमित्त ‘नवदुर्गा सुयश ठेव’ योजनेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद
3

Ratnagiri News : चिपळूण नागरीतर्फे नवरात्रोत्सवनिमित्त ‘नवदुर्गा सुयश ठेव’ योजनेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको
4

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.