Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आंबेगाव तालुक्यात 65 टक्के पेरण्या पूर्ण; 4 हजार हेक्टरवर कडधान्यांची झाली पेरणी

आंबेगाव तालुक्यातील बहुतांश भागात यंदा मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे काही प्रमाणात पिकांचे नुकसान झाले. पूर्वमशागतीच्या कामांनाही त्याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 02, 2025 | 12:00 PM
वाई येथे उभारले जाणार शेतकरी भवन; आठ लाखांचे शासन अनुदानही मिळणार

वाई येथे उभारले जाणार शेतकरी भवन; आठ लाखांचे शासन अनुदानही मिळणार

Follow Us
Close
Follow Us:

रांजणी : पावसाने काहीशी उघडीप दिल्याने आंबेगाव तालुक्यात शेतीकामांसाठीची लगबग वाढली आहे. तालुक्यात खरीप पेरणी तसेच मशागतींची कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत. आंबेगाव तालुक्यात सुमारे 65 टक्के क्षेत्रावर पेरणी झाल्याने शेतशिवार गजबजल्याचे चित्र पाहायला मिळते. वरूणराजाच्या कृपेमुळे उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

आंबेगाव तालुक्यातील बहुतांश भागात यंदा मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे काही प्रमाणात पिकांचे नुकसान झाले. पूर्वमशागतीच्या कामांनाही त्याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. मात्र, गेल्या आठवड्याभरापासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी पुन्हा पेरणीच्या कामात व्यग्र झाल्याचे पाहायला मिळते. आत्तापर्यंत तालुक्यात 65 टक्क्यांहून अधिक पेरणी पूर्ण झाली असून, त्यामध्ये कडधान्यांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे.

तालुक्यात गतवर्षीपेक्षा यंदा चांगला पाऊस पडला. त्यामुळे शेत-शिवारे पाण्याने तुडुंब भरली आहेत. यावर्षी ऊस लागवड क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळते. आतापर्यंत तालुक्यात कडधान्य आणि तृणधान्य पिकांच्या सुमारे 15 हजार 465 हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच तब्बल 65 टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे यांनी दिली.

बाजरी, मका, तूर या तृणधान्य पिकांची पेरणी पूर्ण झाल्याचे चित्र पाहायला मिळत असून, झालेल्या पेरण्या समाधानकारक आहेत. कडधान्यांमध्ये तूर, उडीद, मटकी, वाटाणा, हुलगा, चवळी, वाल, घेवडा या पिकांची सरासरी 11 हजार हेक्टर क्षेत्रापैकी सुमारे 4 हजार 500 हेक्टरवर पूर्ण झाली आहे. तसेच पारंपारिक पीक पद्धतीला काहीसा फाटा देखील देण्यात आला आहे.

दरम्यान, तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात भाताची लागवड जवळजवळ अंतिम टप्प्यात आहे. यावर्षी भात पिकाच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात असून, गतवर्षीपेक्षा यंदा आदिवासी पश्चिम भागात चांगला पाऊस पडल्याचे चित्र पाहायला मिळते. तसेच पूर्व भागात शेतकरी वर्गाने मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाकडे आपला मोर्चा वळवला असून, यंदा सोयाबीन पिकाचे उत्पन्न देखील वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मे आणि जून महिन्यात पाऊस चांगला

चालू वर्षी मे आणि जून महिन्यात पाऊस चांगला झाल्याने लवकरच कडधान्य आणि बाजरीची पेरणी केली. तसेच हवामान देखील पोषक असल्याने चांगले उत्पादन येऊन शेतकऱ्यांच्या पिकाला बाजार भाव देखील चांगला मिळण्याचा अंदाज जाधववाडी ( ता. आंबेगाव ) येथील शेतकरी महेश कुंडलिक जाधव यांनी व्यक्त केला.

Web Title: 65 percent sowing completed in ambegaon taluka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2025 | 12:00 PM

Topics:  

  • Ambegaon taluka
  • Pune Rain
  • Rain News

संबंधित बातम्या

MI Vs PBKS Live: पावसाने विश्रांती घेतली तरी बुमराहने वाढवली पंजाबची चिंता; टॉस जिंकून घेतला ‘हा’ निर्णय
1

MI Vs PBKS Live: पावसाने विश्रांती घेतली तरी बुमराहने वाढवली पंजाबची चिंता; टॉस जिंकून घेतला ‘हा’ निर्णय

उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा हाहा:कार; तीव्र वादळामुळे 62 जणांचा मृत्यू, अनेक जिल्ह्यांत वीजपुरवठा खंडित
2

उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा हाहा:कार; तीव्र वादळामुळे 62 जणांचा मृत्यू, अनेक जिल्ह्यांत वीजपुरवठा खंडित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.