देशभरातील काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून, त्यामुळे जनजीवन विस्कळीत होताना दिसत आहे. देशातील 13 राज्यांसाठी पुढील 8 तास महत्त्वाचे असून, मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
कोकणातील मोठ्या धरणांमध्ये जवळपास ६० टक्के, मध्यम प्रकल्पांमध्ये ७२.५५ टक्के पाणीसाठा आहे. पुणे विभागातील मोठ्या धरणांमध्ये ५३.५९ टक्के साठा नोंदविण्यात आला आहे.
विशेषतः भात लागवडीसह सोयाबीन, भुईमूग, खरीप ज्वारी आणि मका या पिकांच्या पेरण्यांवर प्रतिकूल हवामानाचा परिणाम झाला आहे. अनेक शेतांमध्ये पाणी साचल्याने शेतकरी पावसाचा जोर पूर्णपणे ओसरण्याची वाट पाहत आहेत.
हवामानशास्त्र विभागाने अंदाज वर्तवला होता. त्यात शनिवारी (ता.११) शहरातील किमान तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे. कमाल तापमान ३० अंश सेल्सिअसच्या आसपास स्थिर राहण्याचा अंदाज आहे.
वडज धरणाची पाणीपातळी सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ७१५.६१ मीटर इतकी नोंदविण्यात आली असून, धरणातील उपयुक्त पाणीसाठा ७५ टक्क्यांवर पोहोचला आहे. पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणात पाण्याची आवक वाढत आहे.
गेल्या २४ तासांत लोणावळा, मावळ, खेड, लोहगाव आणि लोणी काळभोर या भागांत राबवलेल्या धडक मोहिमेत शेकडो नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात प्रशासनाला यश आले आहे.
केरळच्या वायनाडमध्ये २४ तासांत २६५ मिमी झालेल्या मुसळधार पावसामुळे भीषण भूस्खलन झाले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. टनेल रोड प्रकल्पाच्या मलब्याखाली अनेक जण अडकल्याची भीती असून NDRF कडून बचावकार्य सुरू…
पुरंदर तालुक्यात गेल्या तीन ते चार दिवसापासून सलग पाऊस सुरू असून यामुळे पुरंदर तालुक्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात प्रचंड वाढ झाली आहे. दरम्यान सासवडला पाणी पुरवठा करणारे पश्चिम भागातील गराडे धरण पूर्ण…
अग्निशमन दलाच्या जवानांनी विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने आतापर्यंत सुमारे १,५०० नागरिकांची बोटींच्या सहाय्याने सुखरूप सुटका केली असून, ५,००० हून अधिक पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवले आहे.
देवगड तालुक्यात सुमारे १०६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, यंदाच्या हंगामात आतापर्यंत १०५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने आणखी मुसळधार पावसाचा इशारा दिला.
सध्या हे मॉडेल दक्षिण भारतातील पश्चिम घाट आणि किनारी भागांसाठी विकसित करण्यात आले असले, तरी आवश्यक पुनर्प्रशिक्षण आणि स्थानिक भौगोलिक घटकांचा समावेश केला आहे.
आंबेगाव तालुक्यात मान्सूनच्या आगमनानंतर सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना आता दिलासा मिळाला आहे. भात पिकासह रखडलेल्या खरीप पेरण्यांना वेग आला आहे.
महाबळेश्वरमध्ये गेल्या २४ तासांत विक्रमी २० इंच (५१३ मिमी) पाऊस झाला आहे. वेण्णा नदीचा पूल खचल्याने ३ वाहने नदीत कोसळली, तर अनेक गावांचा संपर्क तुटला असून संपूर्ण तालुक्याची वीज गूल…
पावसामुळे पुणे–मुंबई एक्सप्रेसवे, जुना पुणे–मुंबई महामार्ग, रेल्वे मार्ग तसेच तालुक्यातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून, संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे.
ओतुर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या बस स्थानकाला पावसाने अक्षरशः 'पाणलोट क्षेत्रा'चे स्वरूप आणले आहे. ओतूर बस स्थानक परिसरात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर साचल्याने संपूर्ण आगार चिखलमय झाले आहे.
पावसाचा जोर पाहता, कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी होऊ नये यासाठी महापालिका प्रशासनाने पूर्णपणे सतर्क राहावे, असे कडक निर्देश महापौर रवि लांडगे यांनी प्रशासनाला दिले आहेत.