Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आनंद वार्ता! नद्याजोड प्रकल्पामुळे चार लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार; ‘या’ जिल्ह्यांना होणार फायदा

शासकीय पातळीवर विकास कामांच्या प्रकल्पाबाबत सर्वांचे लक्ष फक्त टेंडरकडे असते. परंतु आता हे टेंडर प्रक्रियेकडे फारसे लक्ष न देता त्या शासकीय प्रक्रिया आहेत. त्या वेगाने होतील, असे मंत्री विखे पाटील म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 17, 2025 | 08:31 PM
आनंद वार्ता! नद्याजोड प्रकल्पामुळे चार लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार; 'या' जिल्ह्यांना होणार फायदा

आनंद वार्ता! नद्याजोड प्रकल्पामुळे चार लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार; 'या' जिल्ह्यांना होणार फायदा

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : नद्याजोड प्रकल्पामध्ये गोदावरी खोऱ्यासाठी ४० हजार कोटी, विदर्भासाठी एक लाख कोटी खर्च होणार आहे. त्यामुळे गोदावरी खोऱ्यात ११२ टीएमसी पाणी, तर कृष्णा खोऱ्यात ७० टीएमसी अशा दोन्ही खोऱ्यात एकूण १८२ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होणार असून यामुळे चार लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. त्याचा लाभ मराठवाड्यातील सहा जिल्हे, पश्चिम महाराष्ट्रातील तीन जिल्हयांना होणार आहे, अशी माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्यावतीने पश्चिम महाराष्ट्रातील कोकण ते इतर नदी खोऱ्यात पाणी वळविण्याच्या नदीजोड प्रकल्पांबाबत शुक्रवारी (ता. १७) कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी श्री विखे पाटील बोलत होते. यावेळी जलसंपदा विभागाचे मुख्य सचिव दिपक कपूर, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, गोदावरी खोऱ्यांचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार, मेरीचे महासंचालक प्रमोद मांदाडे, माजी कृषीमंत्री अण्णासाहेब म्हस्के, यशदाचे उपमहासंचालक शेखर गायकवाड, डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जलतज्ञ दि. मा. मोरे, पाणी परिषदेचे सदस्य या.रा. जाधव आदि उपस्थित होते.

विखे पाटील म्हणाले, “नद्याजोडसाठी राज्यात जे प्रकल्प आहेत. त्या प्रकल्पाचे तीन, पाच वर्षात काम पूर्ण करण्यासाठी आराखडे तातडीने तयार करावेत. त्यासाठी आराखडे हे फक्त सादरीकरणापुरते मर्यादीत न राहता कामा नये. त्यासाठी रोड मॅप तयार करावा. राज्यात अनेक प्रकल्प रखडले जातात. यापुढे हे प्रकल्प  रखडू नये. यासाठी महानगरपालिका, संस्था जे विकास कामांचे विविध प्रकल्प हाती घेतात. त्यासाठी लागणारा कर्ज रूपी निधी उभा करण्याचे अधिकार त्यांना असतात. त्याप्रमाणे विभागाला हे अधिकार असावेत यासाठी शासकीय पातळीवर लवकरच बैठक घेण्यात येईल. नद्याजोड आव्हानात्मक प्रकल्प असला तरी तो शासनाने स्विकारला आहे. त्यामुळे या प्रकल्पाला राज्य, केंद्र सरकारडून निधीची कमतरता भासू देणार नाही. गरज वाटल्यास जागतिक बॅकेकडून कर्जरूपाने निधी उपलब्ध केला जाईल. परंतु हे फक्त सादरीकरणापुरते, आराखड्यापुरते मर्यादित राहू नये.

हेही वाचा: River Linking Project: देशातील २० नद्या एकमेकांशी जोडणार; केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील

शासकीय पातळीवर विकास कामांच्या प्रकल्पाबाबत सर्वांचे लक्ष फक्त टेंडरकडे असते. परंतु आता हे टेंडर प्रक्रियेकडे फारसे लक्ष न देता त्या शासकीय प्रक्रिया आहेत. त्या वेगाने होतील. मात्र, नदीजोड पाणी परिषदेने जो विचार मांडला त्यात आता राज्य सरकार व केंद्र सरकार लक्ष घालत असल्याने सर्वच अधिकार्यांनी मर्यादेपलिकडे जाऊन कामे केली पाहिजे. त्यासाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन त्या सोडविल्या जातील. गरज वाटल्यास शिफारशीसह सुचना घेण्यासाठी समिती तयार करून त्यावर तातडीने अंमलबजावणी केली जाईल, मंत्री िवखे-पाटील यांनी सांगितले.

राज्याच्या हितासाठी महत्वाचा प्रकल्प
मंत्री विखे -पाटील म्हणाले, राज्यात २००५ मध्ये पहिल्यांदा पाणी परिषदेच्या माध्यमातून नद्याजोड प्रकल्प पुढे आला होता. त्यासाठी गणपतराव देशमुख, बाळासाहेब विखे पाटील यांचे मोठे योगदान आहे. सध्या कृषी आराखडा तयार करण्यासाठी पाऊले उचलण्यासाठी ही कार्यशाळा घेतली आहे. या सरकारने प्रकल्पाना गती देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या पाण्याचे वाद हे गावपातळीवर राहिलेले नाही. ते आता हे वाद आंतरराष्ट्रीय पातळीवरचे झाले आहे. त्यामुळे हा प्रकल्प राज्याच्या हितासाठी महत्वाचा आहे. कारण यापूर्वी वर्षानुवर्षे जे आराखडे तयार केले जातात. ते बंद करून त्यांची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने सर्वांनी नियोजन करून या कामासाठी पुढाकार घ्यावा.

हेही वाचा: राज्यातील दोन मोठ्या नदीजोड प्रकल्पांना मंजुरी, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेतले 19 महत्त्वाचे निर्णय

काम न केल्यास अधिकाऱ्यांनी धरणांवर जाऊन बसावे

मी महसूलमंत्री असताना जे अधिकारी काम करत नव्हते. त्यांना थेट मराठवाडा व विदर्भात पाठविले होते. त्यामुळे माझ्याकडे बदल्यासाठी अधिकारी फारसे येत नव्हते. या विभागातही तशीच पद्धत राबविली जाणार नसून ज्या अधिकाऱ्यांना काम करायचे नसेल त्यांनी थेट धरणांवर जाऊन बसावे. तेथे खुर्ची तयार आहे, असे मंत्री िवखे-पाटील म्हणाले.

Web Title: Radhakrushna vikhe patil said river linking project will bring four lakh hectares of area under irrigation marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2025 | 08:31 PM

Topics:  

  • Pune

संबंधित बातम्या

पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क डीसीपीच्या गाडीलाच ठोकलं; डीसीपींची मुलगी किरकोळ जखमी
1

पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क डीसीपीच्या गाडीलाच ठोकलं; डीसीपींची मुलगी किरकोळ जखमी

पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाकडून मेडिकल चालकाला शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी; सर्वप्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद
2

पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाकडून मेडिकल चालकाला शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी; सर्वप्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद

पिंपरीत जिम ट्रेनर तरुण आणि तरुणीने केली युवकाची हत्या; हत्येनंतर दोघेही आरोपी पोलीस स्टेशला झाले हजर, आणि…
3

पिंपरीत जिम ट्रेनर तरुण आणि तरुणीने केली युवकाची हत्या; हत्येनंतर दोघेही आरोपी पोलीस स्टेशला झाले हजर, आणि…

पुण्यात तीन मंत्री, मात्र स्वारगेटकडे दुर्लक्ष का? ७० वर्षांपासून विकासाच्या प्रतीक्षेत, प्रवाशांकडून होतेय ‘ही’ मागणी
4

पुण्यात तीन मंत्री, मात्र स्वारगेटकडे दुर्लक्ष का? ७० वर्षांपासून विकासाच्या प्रतीक्षेत, प्रवाशांकडून होतेय ‘ही’ मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.