
Maharashtra Launches Pilot Project for Migrant Sugarcane Workers
साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय उच्चस्तरीय गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले. साखर आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या या बैठकीत सात महत्त्वाचे शासकीय विभाग, ७० हून अधिक साखर कारखान्यांचे प्रतिनिधी, दोन उद्योग संघटना तसेच विविध स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. या बैठकीत स्थलांतरित कामगारांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली आणि समन्वयात्मक कृती आराखडा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला.या परिषदेत ‘बॉन्सुक्रो’ आणि ‘वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (WISMA)’ यांच्या सहकार्याने राबवण्यात येणाऱ्या ‘ग्री’ या पथदर्शी कार्यक्रमाला मान्यता देण्यात आली. हा प्रकल्प प्रारंभी सोलापूर, पुणे, कोल्हापूर आणि विजापूर या जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येणार आहे. कारखाना स्तरावरील कृती आणि सरकारी वितरण प्रणाली यांच्यात सुसूत्रता निर्माण करून कामगारांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचवण्यावर भर दिला जाणार आहे.
Pune Crime: भिगवण अपहरण प्रकरणाला ट्विस्ट; तरुणीचा व्हिडिओ समोर, “मी मर्जीने आले”
पुढील सहा महिन्यांत या मॉडेलचा विस्तार चार ते पाच अतिरिक्त जिल्ह्यांमध्ये करण्यासाठी सविस्तर आराखडा तयार करण्याचाही निर्णय घेण्यात आला. शाश्वत ऊस उत्पादन, सामाजिक जबाबदारी आणि कामगार कल्याण यांचा समतोल साधत हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. त्यामुळे स्थलांतरित ऊसतोड कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्यक्ष आणि दीर्घकालीन लाभ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.