Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad : घोटभर पाण्यासाठी वणवण, आम्ही माणसं आहोत की गुरं? लाडक्या बहिणीला पैसे नको पाणी द्या; गावकऱ्यांनी केला संताप व्यक्त

रायगडमधील माळवाडीतील पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न!, रोज पहाटे उठून अंधारात डोंगरावरून थेंब-थेंब पाणी भरावे लागते.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 08, 2025 | 07:25 PM
Raigad : घोटभर पाण्यासाठी वणवण, आम्ही माणसं आहोत की गुरं? लाडक्या बहिणीला पैसे नको पाणी द्या; गावकऱ्यांनी केला संताप व्यक्त
Follow Us
Close
Follow Us:

रायगड: राज्यात पाणीटंचाईमुळे ठिकठिकाणी गावखेड्यातील नागरिकांचे अतोनात हाल होताना दिसत आहेत. एकीकडे अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकांचं नुकसान होतंय तर दुसरीकडे दुष्काळग्रस्त भागातील नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी करत असलेल्या संघर्षाने होरपळून निघत आहेत. पेण तालुका तरण खोप गावापासून 4ते 5 किलोमीटर अंतरावर असलेला हा माळवाडी गाव. या ठिकाणी 40 ते 25 घरांची वाडी आहे . या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी रोज रात्री 3 ते 4 वाजता नागरिक पाणी भरतात. भर अंधारात काट्याकुट्यातून वावर असलेल्या डोंगराच्या रस्त्यातून पाणी भरण्याकरिता संघर्ष करावा लागत आहे.

डोंगराच्या झऱ्याचं पाणी थेंबे थेंबे साचत असल्याने या ठिकाणी ग्लासातून पाणी भरावं लागतं. पाण्यासाठी लवकर उठून पळत जाणं, एका एका हांड्यासाठी लांबच्या लांब रांगा लागत असल्याने गावकरी मेटाकुटीला आले आहेत. घोटभर पाण्यासाठी रांग लावावी ते ही पाण्याचा दुषित पुरवठा होत आहे. दूषित पाण्यामुळे वाडीतील मुलं आजारी पडत आहेत. डोंगराच्या पाण्याचा झरा असल्याने या ठिकाणी जंगलातली जनावरे गुरेढोरे हाच पाणी पिण्याकरिता इथे येतात.य त्यामुळे या जंगली श्वापदांची देखील मोठी भिती असते अशी व्यथा गावकऱ्यांनी मांडली आहे.

जंगलातल्या जनावरांना जे पाणी आहे तेच पाणी आम्हाला प्यावं लागतं. आम्ही माणसं आहोत की गुरं असा संतप्त सवाल करत गावकऱ्यांनी सत्ताधारी सरकारावर ताशेरे ओढले आहेत. सरकार योजना गावात येतात परंतु त्या योजनांचा उपयोग आम्हा गरिबांना होत नाही. गावात बोरिंग आहे पण पाणी नाही. गावात टाकी आहे पाईप आहे पण पाणी नाही. मग आम्ही माणस आहोत ढोर आहेत अशी म्हणायची वेळ आता आम्हाला आलेली आहे. त्यामुळे शासनाला कळकळीची विनंती आहे की आम्हाला लाडकी बहिण योजनेचे पैसे नको पण रस्ता आणि पाणी द्या. हेटवणे धरण ,भोगावती नदी आमच्या उशाशी कोरड मात्र माळवाडीच्या नागरिकांच्या घशाला कोरड आहे. सरकारने पाण्याच्या या समस्येची दखल घ्यावी असं गावकऱ्यांनी सांगितलं आहे.

Web Title: Are we humans or cattle give water to beloved sister without asking for money villagers express anger pen villegers water issure raigad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2025 | 07:25 PM

Topics:  

  • raigad
  • water issues

संबंधित बातम्या

Raigad News: रोह्यात धोकादायक लोखंडी कॉईल वाहतूक सुरूच; नागरिकांच्या तक्रारीनंतरही कारवाई नाही
1

Raigad News: रोह्यात धोकादायक लोखंडी कॉईल वाहतूक सुरूच; नागरिकांच्या तक्रारीनंतरही कारवाई नाही

Raigad News: माथेरान पर्यटन हंगामात मिनी ट्रेनवर ताण! फेऱ्या वाढवण्याची नागरिकांची मागणी
2

Raigad News: माथेरान पर्यटन हंगामात मिनी ट्रेनवर ताण! फेऱ्या वाढवण्याची नागरिकांची मागणी

Raigad News: महाडमध्ये पाणीटंचाईची चाहूल; 20 गावे, 132 वाड्यांना टँकरने पाणीपुरवठ्याचा प्रस्ता
3

Raigad News: महाडमध्ये पाणीटंचाईची चाहूल; 20 गावे, 132 वाड्यांना टँकरने पाणीपुरवठ्याचा प्रस्ता

Raigad News: महाडकरांना दिलासा! वरंधा घाट बंद न करता रुंदीकरणाचे काम सुरूच, प्रशासनाचा मोठा निर्णय
4

Raigad News: महाडकरांना दिलासा! वरंधा घाट बंद न करता रुंदीकरणाचे काम सुरूच, प्रशासनाचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.