नेरळ पाडा येथील मिनीट्रेन मार्गावरील फाटक आणि रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने वाहनचालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या निर्णयामुळे दैनंदिन प्रवासात अडथळे निर्माण झाले आहेत.
मुरुडमध्ये वाढत्या उष्णतेमुळे पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर झाला असून वीज पुरवठ्याच्या अडचणींमुळे नागरिकांना अत्यल्प पाणी मिळत आहे. ग्रामीण भागाप्रमाणेच मुरुड शहराला सुद्धा पाणी टंचाईस सामोरे जावे लागत आहे.
कर्जत तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायतीत प्रशासक काळात मोठा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. कोणतीही अधिकृत नोंद नसताना 43 अनधिकृत नळजोडण्या देण्यात आल्याचे समोर आले असून या प्रकरणात कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली…
कर्जत-नेरळ मार्गावरील नेरळ-खांडा येथे सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामावर मनसेने गंभीर आक्षेप घेतले आहेत. कमी दर्जाच्या साहित्याचा वापर आणि निकृष्ट कामामुळे पुलाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दासगाव-गोठे येथील सावित्री नदीवरील प्रस्तावित खाडी पूल प्रकल्प भूसंपादनाच्या वादामुळे रखडला आहे. शेतकरी आणि प्रशासन यांच्यात मोबदल्यावरून मतभेद निर्माण झाले असून, प्रकल्पाच्या कामाला विलंब होत आहे.
महाराष्ट्रातील ऐतिहासिक रायगडावर वाढत्या पाणीटंचाईमुळे संवर्धन कामांवर परिणाम होत आहे. जलस्रोत आटत चालल्याने कामांचा वेग मंदावला असून, प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
रायगड जिल्ह्यात आदिवासी विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा पोलीस दलाकडून 'प्रेरणा' उपक्रम राबविण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या पुढाकारातून शिक्षण, करिअर मार्गदर्शन आणि अंधश्रद्धा निर्मूलनावर
महाड तालुक्यातील दासगाव खाडी संगम परिसरात मोठ्या प्रमाणात साचलेल्या गाळामुळे जलवाहतूक आणि नौकाविहार अनेक वर्षांपासून बंद आहे. स्थानिकांच्या मते तातडीने गाळ उपसा केल्यास पर्यटन क्षेत्राला मोठा फायदा होऊ शकतो.
रायगडावरचा इतिहास पुन्हा एकदा जिवंत झाला आहे. खुबलढा बुरुजाचे शास्त्रीय पद्धतीने जतन पूर्ण झाले असून संवर्धनादरम्यान समोर आलेल्या नव्या पुराव्यांमुळे संशोधकांमध्येही उत्सुकता वाढली आहे.
रायगडच्या महाडमध्ये खासगी शिकवणीच्या शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. पीडिताने तक्रार दिल्यानंतर आरोपीवर POCSO अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून पोलिस तपास सुरू आहे.
रायगड किल्ला परिसरातील वाहतूक सुलभ करण्यासाठी तयार केलेला खर्डी नगरभवन-नेवाळीवाडी पर्यायी मार्ग पुन्हा वादात सापडला आहे. कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या या रस्त्यावर नागरिकांनी सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित केला आहे.
रायगडमध्ये 15 वर्षीय मुलगी फेसबुकवर मित्राशी बोलताना घरच्यांना कळल्याने घाबरली. ओरडतील या भीतीतून तिने घरातच गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
रायगड जिल्हा परिषदेत अध्यक्षपद आणि सत्ता वाटपाचे सूत्र ठरले आहे. मात्र तरी देखील सर्वात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या अर्थ व बांधकाम खात्यावरून महायुतीतील प्रमुख पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे.
रोहा शहरात अवजड लोखंडी कॉईल वाहतुकीमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. तक्रारी असूनही वाहतूक सुरूच राहिल्याने स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
Matheran Mini Train News: माथेरानमध्ये मिनी ट्रेनच्या सध्या केवळ दोनच फेऱ्या सुरू आहेत. यामुळे वाढत्या पर्यटकांना मिनी ट्रेनमधून प्रवास करण्यात अडचणी येत आहेत.
महाड तालुक्यात मार्च अखेरीस पाणीटंचाईची समस्या अधिक तीव्र होत असल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर 20 गावे आणि 132 वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवण्यात आला आहे.
वरंधा घाट येथे रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु आहे. रस्ता रुंदीकरणामुळे घाट पूर्ण बंद करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने फेटाळला आहे. तसेच स्थानिकांसाठी पर्यायी मार्ग देखील उपलब्ध ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
रायगडच्या पेणमधील भोगावती नदीत बॉल काढण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीय वसीम अन्सारीचा बुडून मृत्यू झाला. मित्रांसोबत व्हॉलीबॉल खेळताना ही दुर्दैवी घटना घडली. रेस्क्यू टीमने साडेतीन तासांनी मृतदेह बाहेर काढला.