रविवारी वर्षासहलीसाठी माथेरानला आलेल्या पर्यटकांनी टॅक्सी न मिळाल्याने मालवाहू टेम्पोतून नेरळकडे प्रवास केला. जुम्मापट्टीजवळ टेम्पो उलटल्याने सात जण जखमी झाले. जखमींवर उपचार करण्यात आले असून नेरळ पोलिसांनी टेम्पो चालकाविरोधात गुन्हा…
महाड तालुक्यात जुलैच्या सुरुवातीला झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. मात्र अवघ्या काही दिवसांतच पावसाने अचानक माघार घेतल्याने शेतकरी आणि प्रशासनाचे लक्ष आता पुढील पावसाकडे लागले आहे.
Devkund Waterfall: रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध देवकुंड धबधब्यावर प्रवेशबंदी असतानाही चोरवाटेने गेलेल्या पर्यटकांवर मोठे संकट ओढवले आहे. दोन तरुण पाण्यात बुडाल्यानंतर बचाव पथकाकडून शोधमोहीम सुरू असून प्रशासनाने पर्यटकांना सुरक्षिततेच्या नियमांचे पालन…
रविवारी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटकांनी माथेरानकडे धाव घेतली. मात्र, पर्यटकांच्या विक्रमी गर्दीमुळे घाटरस्त्यापासून दस्तुरी नाक्यापर्यंत वाहतूक कोंडी, लांबच लांब रांगा आणि गैरसोयीचे चित्र पाहायला मिळाले.
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील डिकसळ-पाली गावातील आदिवासी बांधव मुसळधार पावसामुळे भीषण संकटाचा सामना करत आहेत. दरड कोसळण्याच्या भीतीमुळे ७ ते ८ कुटुंबांना जिल्हा परिषद शाळेत स्थलांतरित होण्याच्या सूचना देण्यात आल्या…
Karjat Torrent Hydropower Project : रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात प्रस्तावित टोरंट जलविद्युत प्रकल्पासाठी सुरू असलेल्या माती व दगड परीक्षणाच्या ड्रिलिंगमुळे साई डोंगर परिसरात पहिल्यांदाच भूस्खलन झाल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे.…
रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून भूस्खलनाच्या घटनाही घडल्या आहेत. या आपत्तीत आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला असून ९ जण…
रायगडच्या पेण तालुक्यातील रावे आणि तांबडशेत गावाला पुराने वेढले असताना, धाडसी 'आपदा मित्र' अभिकेत म्हात्रे आणि राजेश म्हात्रे यांनी रबर बोटीच्या साहाय्याने दोन ९ महिन्यांच्या गर्भवती महिलांची सुखरूप सुटका केली.
रायगडमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसला मोठा धक्का. जिल्हाध्यक्ष अंकित साखरे यांचे बंधू अखिल साखरे आणि ग्रामपंचायत सदस्या अनन्या साखरे यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
कर्जत तालुक्यातील पळसदरी-ठाकूरवाडी येथे पहाटे दरड कोसळून दोन चारचाकी व तीन दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी टळली असून वस्तीकडे जाणारा मुख्य रस्ता बंद झाला आहे.
रोहा येथे शेतकरी कामगार पक्षाची तालुकास्तरीय महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांची तयारी, पक्ष संघटन मजबूत करणे आणि स्मार्ट मीटरविरोधी आंदोलनाची दिशा यावर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
Rain Alert Update: रायगड जिल्ह्यात हवामान विभागाचा (IMD) अतिवृष्टीचा इशारा! विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी २ जुलै रोजी सर्व शाळांना सुट्टी जाहीर. अलिबाग, पनवेल, उरणसह कोणत्या भागातील शाळा बंद राहतील? सविस्तर वाचा.
यंदा मान्सून उशिरा दाखल झाल्यामुळे महाड तालुक्यात जून महिन्यात अपेक्षेपेक्षा खूपच कमी पावसाची नोंद झाली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांतील समाधानकारक पावसामुळे धरणांतील जलसाठा वाढू लागला असून पाणीपुरवठा आणि शेतीबाबत…
रोहा शहरात हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी आणि दंडात्मक कारवाई सुरू झाल्यानंतर काही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. हेल्मेटला विरोध नसल्याचे सांगत, शहरातील दैनंदिन प्रवासाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बेदरकार वाहनचालक आणि ट्रिपल सीट…
महाडमधील काळ नदीच्या पात्रात हजोर मासे मृतावस्थेत आढळले आहेत. यामुळे आता मोठी खळबळ उडाली आहे. उद्योगांकडून विषारी सांडपाणी नदी-नाल्यात सोडण्यात आल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. या सांडपाण्यामुळे माशांचा बळी…
अलिबाग तालुक्यातील भाकरवड-देहेन येथे सुरू असलेले पुलाचे काम अपूर्ण राहिल्याने गावाचा बाहेरील भागाशी संपर्क तुटला आहे. पर्यायी मार्ग नसल्याने ग्रामस्थ, कामगार, दुग्धव्यवसायिक आणि शाळकरी विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत.
रायगडच्या पालकमंत्रीपदावरून सुरू असलेल्या रस्सीखेचीला लवकरच पूर्णविराम मिळण्याची चिन्हे आहेत. एकनाथ शिंदे, सुनील तटकरे आणि भरत गोगावले यांच्यात झालेल्या चर्चेनंतर गोगावलेंकडे पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
रायगड जिल्ह्यातील अवचितगडाच्या ६०० फूट खोल दरीतून शिवशंभू प्रतिष्ठानने अत्यंत कठीण परिस्थितीत दोन ऐतिहासिक शिवकालीन तोफांना सुखरूप बाहेर काढले आहे. या थरारक मोहिमेमुळे गडावरील एकूण तोफांची संख्या आता पाच झाली…
कर्जत तालुक्यातील पाली तर्फे कोतवाल खलाटी ग्रामपंचायतीअंतर्गत साई डोंगर परिसरात टोरंट वीज निर्माण कंपनीचा जलविद्युत प्रकल्प उभारला जात आहे. या भागातील सुमारे 150 एकर दळी वन जमिनीवर पाली कातकरी वाडी,…
अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर महाडमध्ये रविवारी दमदार पावसाने हजेरी लावली आणि उकाड्याने त्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, शेतकऱ्यांच्या मनातही शेतीकामांबाबत नव्या आशा जागल्या…