Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News : इर्शाळवाडीची पुनरावृत्ती होणार ? भर पावसात गावकऱ्यांवर भितीचं सावट

पावसाला सुरुवात झाली असून कर्जत तालुक्यातील गावात दरड कोसळ्याच्या भितीने गावकरी चिंताग्रस्त झाले आहेत. पुन्हा एकदा इर्शाळवाडीच्या घटनेची पुनरावृती होत आहे याबाबत भिती व्यक्त केली जात आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jun 06, 2025 | 03:30 PM
Raigad News : इर्शाळवाडीची पुनरावृत्ती होणार ? भर पावसात गावकऱ्यांवर भितीचं सावट
Follow Us
Close
Follow Us:

कर्जत/ संतोष पेरणे:  दोन वर्षांपूर्वी पावसाळ्यात इर्शाळवाडीवर दरड कोसळली भर झोपेत झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक कुटुंब उधवस्त झाली. या सगळ्याची पुनरावृत्ती आता कर्जत तालुक्यातील पळसदरी येथे होताना दिसत आहे. इर्शाळवाडी येथे झालेल्या भूस्खलना दरम्यान पळसदरीमधल्या ठाकूरवाडी येथील 80 घरांचे स्थलांतरण करण्यात आले होते. या घटनेला दोन वर्ष उलटूनही अद्याप प्रशासनाला जाग आलेली नाही. ठाकूरवाडी येथील आदिवासी लोकांच्या वस्तीच्या मागे असलेले धोकादायक दगड हलवण्याबाबतस कोणतीही ठोस भूमिका अजूनही घेतलेली नाही. आदिवासी वसतिच्या मागच्या बाजूला असलेले दगड वन विभागाच्या जमिनीमध्ये असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाला हलवता येत नाहीत. मात्र तहसीलदार यांनी ते दगड हलवण्याचे आदेश दिल्यानंतर वन विभागाने सर्व ग्रासनथांना ते दगड हलविण्याबाबत परिस्थितीची माहिती दिली असून ते दगड पावसाळ्यानंतर हलविले जातील असे आश्वसन दिले आहे.दरम्यान पळसदरी ठाकूरवाडीवर कधीही कोसळतील अशा स्थितीत असलेले दगड आता पावसाळ्यानंतरच हटवले जाणार हे जवळपास नक्की झाले आहे.

इरसाळवाडी येथे जुलै 2023 मध्ये दुर्घटना घडल्यानंतर कर्जत खोपोली राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावर असलेल्या पळसदरी ठाकूरवाडीचे मागे धोकादायक स्थित असलेले दगड खाली कोसळतील अशा स्थितीत आहेत.असे दगड असताना ते काढण्यासाठी ग्रामस्थ पाठपुरावा करीत आहे.ते दगड हलवावेत यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी एप्रिल2024 मध्ये तहसीलदार यांना अर्ज दिले होते. मात्र प्रशासन सहकार्य करीत नसल्याने वाडीवर कोसळण्याच्या स्थितीत असलेले दगड हलविण्यात आलेले नव्हते.मात्र ते सर्व दगड हलविण्यात वन जमिनीचा अडथळा असल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग,पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाच्या पाहणी मध्ये स्पष्ट झाले होते. त्यामुळे शेवटी तहसीलदार कर्जत डॉ धनंजय जाधव यांनी वन विभाग यांना ते दगड हटवण्याचे आदेश दिले होते.त्यानंतर मौजे पळसदरी आदीवासीवाडी येथील टेकडीलगत राखीव वन स.नं. 43 मध्ये असलेले 3मोठे दगड धोकादायक दगड यांची पाहणी वन विभागाने केली

संबंधित क्षेत्र वनखात्याच्या अखत्यारीत असलेने वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी गटविकास अधिकारी कर्जत व ग्रामविकास अधिकारी पळसदरी यांचेशी समन्वय साधून तातडीने सदरचे दगड पारंपारीक दगड फोडणा-या व्यकर्तीच्या सहकार्याने मान्सून आगमन होण्यापूर्वी शक्य तितक्या जलद गतीने फोडून हटवावे यासाठी वन विभागाने प्रयत्न सुरु केले. त्यासाठी मुरबाड आणि लोणावळा येथून दगड फोडणारे कामगार यांना आणण्यात आणले.

दगड फोडण्यासाठी अवधी कमी असल्याने तसेच पाऊस सुतरु झाला असल्याने वन विभागाचे वनक्षेत्रपाल समीर खेडेकर यांनी महसूल विभागाचे मंडळ अधिकारी, ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी तसेच पोलीस कर्मचारी यांच्या समवेत पाहणी केली.त्यावेळी स्थानिक ग्रामस्थ देखील उपस्थिती होते. हि पाहणी झाल्यानंतर वन विभाग आणि शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी पळसदरी ठाकूर वाडी मध्ये ग्रामस्थांची बैठक घेतली आणि दगड हलवण्यात येत असलेल्या अडचणी यांची माहिती दिली.त्यामुळे आता ते दगड पावसाळा संपल्यावर वन विभाग यांच्या माध्यमातून हलविले जाणार हे ठरवण्यात आले असून वन विभाग ती सर्व कार्यवाही करेल असे आश्वासन ग्रांमस्थांना देण्यात आले आहे. तसेच हा सर्व अहवाल वन विभागाकडून शासनाला देण्यासाठी आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख तहसीलदार डॉ धनंजय जाधव यांना देण्यात आले आहेत.

Web Title: Raigad news will irshalwadi be repeated heavy rains cast a shadow of fear over the villagers of palasdari

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2025 | 03:30 PM

Topics:  

  • heavy rain update
  • Karjat

संबंधित बातम्या

Rain Update: पाऊस थांबेना! महाराष्ट्रासह १३ राज्यात पावसाचे अलर्ट, अनेक राज्यात कडाडणार वीज
1

Rain Update: पाऊस थांबेना! महाराष्ट्रासह १३ राज्यात पावसाचे अलर्ट, अनेक राज्यात कडाडणार वीज

२०८ गावांमधील भात पीक नुकसानीचे पंचनामे सुरु, ग्रामपंचायत विभागाचे अधिकारी कर्मचारी शेतीच्या बांधावर
2

२०८ गावांमधील भात पीक नुकसानीचे पंचनामे सुरु, ग्रामपंचायत विभागाचे अधिकारी कर्मचारी शेतीच्या बांधावर

Karjat : पावसामुळे कर्जत तालुक्यातील भातशेती भुईसपाट
3

Karjat : पावसामुळे कर्जत तालुक्यातील भातशेती भुईसपाट

Beed : पंधरा गावातील सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली,जनजीवन विस्कळीत
4

Beed : पंधरा गावातील सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली,जनजीवन विस्कळीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.