कर्जत तालुक्यातील २०८ गावांमधील भाताच्या शेतीचे पंचनामे करण्याचे कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. कृषी,महसूल आणि ग्रामपंचायत विभागाचे अधिकारी कर्मचारी शेतीच्या बांधावर पोहचले आहेत.
कर्जत तालुक्यातील ओबीसी समाज संघटना महासंघ आक्रमक झाला आहे. कुणबी जातीचा चुकीच्या पद्धतीने उल्लेख करून मराठा समाजाला ओबीसीत समाविष्ट करण्यास संघटनेचा ठाम विरोध आहे.
महायुती सरकारने 'महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायदा' लागू करण्याची तरतूद विधिमंडळात केली आहे. या कायद्याविरोधात संघर्ष समिती व उद्धवसेनेच्यावतीने राज्यव्यापी आंदोलन सुरू केले आहे.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान जिल्ह्यातील प्रत्येक गावात यशस्वीरित्या राबवून जिल्हा राज्यात अभियानात अग्रेसर राहील, यादृष्टीने प्रयत्न करण्याचे आवाहन विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले.
माथेरान फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या कारला भीषण अपघात झाला. या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. दैवबलवत्तर म्हणून यातील प्रवाशी थोडक्यात बचावले आहेत.
कर्जत तालुक्याच्या आगरी समाज हॉलचे सुशोभीकरणासाठी दहा लाखाचा निधी कामगार नेते राष्ट्रीय इंटक अध्यक्ष महेंद्र घरत यांनी जाहीर केले. तसेच 160 विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळ्यात मान्यवर उपस्थित होते.
कर्जत तालुक्यातील युवा पत्रकार प्रथमेश कुडेकर यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्याने संपूर्ण पत्रकारिता क्षेत्रात संतापाची लाट उसळली आहे.
कर्जत मधील वाहतुकीची समस्या जटील बनली आहे. त्यावर मार्ग निघावा म्हणून महाराष्ट्र भुषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून कर्जत साठी शंभर बॅरिकेटस देण्यात आले.
आमदार महेंद्र थोरवे यांचा भाचा संकेत भासे यांनी केलेल्या खालापूर तालुक्यातील के.डी.एल बायोटेक कंपनीच्या बंद पडलेल्या कारखान्याच्या ३६ एकरच्या भुखंड खरेदी आणि विक्री प्रकरणामुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे.
Karjat news Marathi : समाजातील लोकांचा सफाई कर्मचाऱ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन नेहमीच संशयास्पद असतो. परंतु, या कर्मचाऱ्यांच्या भरवशावरच आजही सामान्य माणूस सुरक्षित आहे.
नेरळ माथेरान घाट रस्त्यात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला होता.मध्यवर्ती जुमापट्टी भागात नेरळ बाजारपेठेतील व्यापारी वर्गाने माथेरानच्या कुशीत असलेले जुमापट्टी विभागात भर पावसात वृक्षारोपण करण्यात आले.
भात लागवड अधिक सुलभ आणि खर्चिकदृष्ट्या किफायतशीर व्हावी यासाठी यांत्रिक पद्धतीने भात लागवड करण्याचे तंत्रज्ञान आजच्या काळाची गरज बनले आहे.कुशल मजुरांची अनुपलब्धता ही शेतीपुढे सध्याची मोठी समस्या आहे.
कर्जतमधील शेलू गावात एका गणेश मंदिरातील दान पेटी चक्क पाठवल्याची घटना घडली होती. मात्र, आता पोलिसांकडून ही दान पेटी पळवणाऱ्या बालकास पकडण्यात आले आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
पावसाला सुरुवात झाली असून कर्जत तालुक्यातील गावात दरड कोसळ्याच्या भितीने गावकरी चिंताग्रस्त झाले आहेत. पुन्हा एकदा इर्शाळवाडीच्या घटनेची पुनरावृती होत आहे याबाबत भिती व्यक्त केली जात आहे.
पावसाला सुरुवात होत नाही तेच कर्जत तालुक्यातील छोट्या गावांना जोडणारा वाहून गेल्याचं समोर आलं आहे. डांबरी करण केलेल्या रस्त्याची पावसाच्या सुरुवातीस झालेली दैना पाहून गावकरी आक्रमक झाले आहेत.
कर्जतजवळील आंबिवली गावानजीक असलेला पेठचा किल्ला नेहमीच ट्रेकर्ससाठी आकर्षणाचा विषय असतो. इतिहासाशी नाळ जुळवणाऱ्या या गडाचे शिवकालीन महत्त्वही मोठे आहे. कोथळी गडावरील पुरातन वस्तूंना नवी झळाळी देण्यात आली.