सोलापूर : संस्कारक्षम मुले घडवा. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती रूजवा. 22 जुलै रोजी सर्व शाळांमध्ये ‘एक सभा तिरंग्यासाठी’ आयोजित करावी. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाची घराघरात जागृती करा. दशसूत्री शिक्षण पध्दतीमध्ये सुधारणा होईल, असे भावनिक आवाहन सीईओ दिलीप स्वामी (CEO Dilip Swami) यांनी केले.
सोलापूर जिल्हा परिषदेअंतर्गत सर्व शाळामधील प्राथमिक शिक्षकांसाठी आज फेसबुक लाईव्हद्वारे दशसुत्री च्या अंमलबजावणीसाठी विशेष कार्यक्रमाच्या आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील सर्व अधिकारी व शिक्षक यांना आज सिईओ दिलीप स्वामी यांनी ऑनलाईन फेसबुक लाईव्हद्वारे मार्गदर्शन केले. याप्रसंगी शिक्षणाधिकारी किरण लोहार, उप शिक्षणाधिकारी संजय जावीर, विस्तार अधिकारी स्वाती स्वामी, विस्तार अधिकारी गोदावरी राठोड, सुहास गुरव, हरीश राऊत, अतहर दफेदार, ग्यान प्रकाश फाऊंडेशन चे संभाजी रोडे, उपस्थित होते.
भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर “ हर घर तिरंगा” हा उपक्रम राबविण्यासाठी सीईओ यांनी भावनिक आवाहन करीत प्राथमिक शाळांमध्ये संस्कारक्षन विद्यार्थ्यी घडविणेसाठी व गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी सिईओ दिलीप स्वामी यांचे कल्पकतेतून दशसुत्री तयार करणेत आली आहे. याची सर्व शिक्षकांनी माहिती होणे साठी त्यांनी आज भावनिक आवाहन केले .
दिनांक 22.07.2022 रोजी सर्व शाळांमध्ये एक सभा तिरंग्यासाठी आयोजित करावी.
सदर सभा शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षतेखाली घेण्यात यावी. 25 जुलै रोजी ‘माझा तिरंगा माझा अभिमान’ या विषयावर सर्व शाळांमध्ये निबंध स्पर्धा आयोजित करण्यात यावी. (इयत्ता 5 वी ते 8 वी च्या विद्यार्थ्यांचा एक गट, इयत्ता 9वी व 10 वी साठी एक गट व इयत्ता 11 वी व 12 वी साठी एक गट करावा.) सदर निबंध स्पर्धा घेण्याचे आयोजनाची जबाबदारी गट शिक्षणाधिकारी यांची राहील.’ हर घर तिरंगा’ हा जास्तीत जास्त घरावर कसा लागेल याचे नियोजन करावे. असे आवाहन केले.
सायकल बॅंकेतून आठशे मुलींना लाभ
एखादे काम मनावर घेतले कि शिक्षण विभागातील सर्व लोक जिवापाड कामे करतात. याचा प्रत्येक स्वच्छ सुंदर शाळामध्ये आला आहे. निमगाव प्राथमिक शाळेने सुरू केलेली सायकल बॅंक ८०० मुलींना हातभर देऊ शकली. पंचायत राज समितीने देखील यांचे कौतुक केले.
खाजगी शाळेतील चार हजार मुले जिल्हा परिषद शाळांत दाखल
चांगले काम केले की पालक जिल्हा परिषदेकडे वळतात. खाजगी शाळेतील चार हजार मुले जिल्हा परिषदे शाळांत दाखल झाली आहेत. याचा विचार करता प्राथमिक शिक्षकांनी केलेले काम प्रेरणादायी आहे. दशसुत्रीची प्रभावी अंमलबजावणी करा, असे आवाहान सीईओ दिलीप स्वामी यांनी केले.
शाळांमधीस ४० बालकांचे जीव वाचले…!
माझे मूल माझी जबाबदारी अभियानात ८ लाख पेक्षा अधिक बालकांची तपासणी झाली. यामधील दुर्धर आजारातील हालते समोर आली. त्याचेवर उपचार केले मुळे त्यांची अपंगत्व व जीव वाचवू शकलो. कुणाचे हृदयाला छिद्र होते तर एका विद्यार्थ्याचे डोळ्यास इजा होती. हे काम महत्वाचे झाले आहे. पालकांचे आशिर्वाद शिक्षकांना मिळतील.