Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘उद्धव ठाकरेंना जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न सुरु’; भास्कर जाधव यांची टीका

उद्धव ठाकरे यांना त्रास द्यायचाच हा एक कलमी कार्यक्रम सुरू आहे. जे जात आहेत त्यांना थांबविण्यासाठी पक्षप्रमुख प्रयत्न करत आहेत. उद्धव ठाकरे यांना जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न सुरु आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 13, 2025 | 01:22 PM
Bhaskar Jadhav on shivsena upset

Bhaskar Jadhav on shivsena upset

Follow Us
Close
Follow Us:

रत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. त्यातच आता ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी भाष्य केले. ते म्हणाले, ‘उद्धव ठाकरेंचे लोक फोडणं म्हणजे ‘ऑपरेशन टायगर’. आजही एकच टायगर उद्धव बाळासाहेब ठाकरे हे विरोधकांना मान्य करावं लागतं, याचा मला अभिमान आहे. उद्धव ठाकरेंना जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न सुरु असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

भास्कर जाधव यांनी राजन साळवी यांच्या शिवसेनेच्या प्रवेशावरही भाष्य केले. ते म्हणाले, ‘राजन साळवी हे नेहमी ‘मी एकमेव निष्ठावान’ म्हणायचे. स्वतःच स्वतःला एखादी बिरुदावली लावतो, सुरुवातीला लोकांना अप्रूप वाटतं. नंतर विषय चेष्टेचा होतो. हा निष्ठावान ही बिरुदावली तुम्हाला लावावी का? हे राजन साळवींना विचारा. राजन साळवी यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश का झाला नाही? तिथे विरोध कोणी केला? हे देखील माहिती घेणे गरजेचे आहे. तसेच आता सामंत बंधूंनी त्यांचं स्वागत केलं असेल तर मला माहित नाही. पण आता हे स्वागत आहे की, त्यांना कबड्डी-कबड्डी करून आत घेऊन त्यांना आपटायची तयारी आहे? हे येत्या काळात दिसेल’.

याशिवाय, उद्धव ठाकरेंचे लोक फोडणं म्हणजे ऑपरेशन टायगर. आजही एकच टायगर उद्धव बाळासाहेब ठाकरे हे विरोधकांना मान्य करावं लागतं, याचा मला अभिमान आहे. जाणाऱ्यांनी आणि येणाऱ्यांनी आपण जाण्याची आणि येण्याची वेळ आपल्या दृष्टीने योग्य आहे का? याचा विचार करून आहेच त्याच ठिकाणी थांबणे योग्य आहे.

उद्धव ठाकरेंना त्रास द्यायचाच हा एक कलमी कार्यक्रम सुरू

उद्धव ठाकरे यांना त्रास द्यायचाच हा एक कलमी कार्यक्रम सुरू आहे. जे जात आहेत त्यांना थांबविण्यासाठी पक्षप्रमुख प्रयत्न करत आहेत. उद्धव ठाकरे यांना जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न सुरु आहे. काही लोकांना वेगवेगळ्या मार्गाने आपल्याकडे वळविलं जातंय, दबाव आहे. केवळ सुडाचं राजकारण सुरू आहे, एवढं होऊनही उद्धव ठाकरे खचले नाहीत, हात टेकले नाहीत. त्यामुळे झोप उडाली आहे, अभी भी टायगर जिंदा है, ही भीती त्यांच्या मनात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Bhaskar jadhav criticizes on shinde group over political issues nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2025 | 01:22 PM

Topics:  

  • Bhaskar Jadhav
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

OBC शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान; म्हणाले, “खाडाखोड असलेल्या कागदपत्रांच्या…”
1

OBC शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान; म्हणाले, “खाडाखोड असलेल्या कागदपत्रांच्या…”

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका
2

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

Maharashtra Politics: “2014 ते 2019 खूप सन्मान दिला मात्र…”; चंद्रकांत पाटलांची ठाकरेंवर जहरी टीका
3

Maharashtra Politics: “2014 ते 2019 खूप सन्मान दिला मात्र…”; चंद्रकांत पाटलांची ठाकरेंवर जहरी टीका

युती होवो अथवा न होवो…नवी मुंबईचा महापौर मीच ठरवणार, वनमंत्री गणेश नाईकांचा दावा
4

युती होवो अथवा न होवो…नवी मुंबईचा महापौर मीच ठरवणार, वनमंत्री गणेश नाईकांचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.