Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Election 2024 : नाहीतर २५ जागांवर निवडणूक लढवणार! महाविकास आघाडीला या पक्षाने दिला उद्या दुपारपर्यंतचा अल्टीमेटम

महाविकास आघाडीतील घटकपक्ष समाजवादी पक्षाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी ५ जागांची मागणी केली आहे. उद्या दुपार्यंतचा अल्टीमेटम दिला असून निर्णय झाला नाही तर २५ जागांवर निवडणूक लढण्याचा इशारा दिला आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Oct 25, 2024 | 07:04 PM
महाविकास आघाडीतील घटकपक्ष समाजवादी पक्षाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी ५ जागांची मागणी केली आहे.

महाविकास आघाडीतील घटकपक्ष समाजवादी पक्षाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी ५ जागांची मागणी केली आहे.

Follow Us
Follow Us:

राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ ४ दिवस बाकी आहे. तरीही महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. आघाडीतील तिन्ही पक्षांचं ८५-८५-८५ च्या फार्म्युल्यावर एकमत झालं आहे. मात्र मित्रपक्षांकडूनही अनेक जागांवर दावा केला आहे. समाजवादी पक्षाने तर महाविकास आघाडीकडे ५ जागांची मागणी केली असून उद्या दुपारपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. निर्णय झाला नाही तर २५ जागांवर निवडणूक लढण्याचाही इशारा सपाने दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे.

महाराष्ट्र सपाचे अध्यक्ष अबू आजमी यांनी शुक्रवारी शरद पवारांसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी 5 जागांची मागणी केली असून यावर निर्णय देण्यासंदर्भात शनिवारीची अंतिम तारीख दिली आहे. यावर अबू आजमी यांनी, “मी 5 जागा मागितल्या आहेत. यात दोन विद्यमान जागा (भिवंडी पूर्व आणि मानखुर्द) आहेत. तसेच भिवंडी पश्चिम, मालेगांव आणि धुळे शहर अशा अन्य तीन जागांची मागणी केली आहे. या जागांवर सपाचे उमेदवार नक्की निवडून येतील. त्यामुळे या जागांसाठी आमचा आग्रह आहे.”

…तर दुसरा हरियाणा

आम्ही शनिवारी दुपारपर्यंत प्रतीक्षा करणार आहे. त्यानंतर आम्ही आमचा निर्णय घेऊ. मी 25 उमेदवारांची घोषणा करू शकतो. अखिलेश यादव यांनी मला सांगितले आहे की महाराष्ट्रात मी निर्णय घेणारा आहे. जर नवाब मलिकांना आवडत असेल, तर ते मानखुर्द-शिवाजीनगरमध्ये माझ्या विरोधात निवडणूक लढवू शकतात. जर तुम्ही अल्पसंख्याकांना प्रतिनिधित्व दिले नाही, तर ते निवडणूक लढतील आणि तुमच्याकडे आणखी एक हरियाणा होईल, असा टोलाही त्यांनी कॉंग्रेस आणि महाविकास आघाडीला लगावला आहे.

समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनीही, राज्यात भाजप आणि महायुतीचा दारुण पराभव होणार आहे, असं म्हटलं आहे. दरम्यान बुधवारी महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत तीन मोठ्या पक्षांनी 85-85-85 जागांचे वाटप करण्याची घोषणा केली होती. तथापि, अंतिम निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी चर्चा अद्याप सुरू आहे. तीन पक्ष 288 पैकी उर्वरित 33 जागा एकमेकांमध्ये आणि लहान पक्षांमध्ये वाटपावर चर्चा करीत आहेत. उद्धव ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले की, 288 जागांपैकी 270 जागांवर सहमती झाली आहे. राऊत म्हणाले, “ समाजवादी पक्ष, पीडब्ल्यूपी, सीपीआय (एम), सीपीआय आणि आप यांना समाविष्ट करू. उर्वरित जागांवर अद्याप चर्चा सुरू आहे. महायुतीला हरवण्यासाठी महाविकास आघाडी सर्व पक्ष एकत्र लढणार आहेत.”

महाराष्ट्राच्या 288 विधानसभा जागांसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत. मागील निवडणुकीत बीजेपीला 105, शिवसेनेला 56, एनसीपीला 54 आणि काँग्रेसला 44 जागा मिळाल्या होत्या. तथापि, निवडणुकेनंतर शिवसेना एनडीएपासून वेगळी झाली आणि एनसीपी-काँग्रेससोबत सरकार स्थापन केले. शिवसेनेचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. जून 2022 मध्ये शिवसेनेत उभी फूट पडली आणि त्यानंतर ४० आमदारांनी एकनाथ शिंदेंना साथ दिली. एकनाथ शिंदे भाजपच्या पाठिंब्याने् मुख्यमंत्री बनले. आता शिवसेना दोन गटांमध्ये विभागली गेली आहे. शरद पवार यांची एनसीपीही दोन गटांमध्ये विभागली गेला आहे.

महाराष्ट्रात सध्या कोणाची किती ताकद

सध्या महायुतीत बीजेपीचे 103, शिवसेना (शिंदे) च्या 40, एनसीपी (अजित पवार) च्या 40 आणि बहुजन विकास आघाडीचे ३ आमदार आहेत. महाविकास आघाडीत, काँग्रेसचे 43, शिवसेना (ठाकरे) 15 आणि एनसीपीचे (शरद पवार) 13 आमदार आहेत. समाजवादी पार्टीचे दोन, एआयएमआयएमचे दोन, पीजेपीचे दोन, एमएनएस, सीपीएम, शेकाप, स्वाभिमानी पार्टी, राष्ट्रीय समाज पार्टी, महाराष्ट्र जनसुराज्य शक्ति पार्टी, क्रांतिकारी शेतकारी पक्षाचा एक-एक आमदार आहेत.

Web Title: Samajwadi party dimand 5 seat in maharashtra assembly election 2024 mahavikas aghadi warned contest 25 seats if not decision

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2024 | 06:55 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024
  • Mahavikas Aghadi
  • Samajwadi Party

संबंधित बातम्या

‘शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा केलाच पाहिजे’; भाजप सरकारवर हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघात, कर्जमाफीसाठी एल्गार तीव्र
1

‘शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा केलाच पाहिजे’; भाजप सरकारवर हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघात, कर्जमाफीसाठी एल्गार तीव्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.