Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काजू उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय, १० रुपये अनुदानाचा निर्णय रद्द करा, सतिश सावंत यांची मागणी

शिवसेना उबाठा पक्षाची सतिश सावंत यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी आहे की, काजू उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे, त्याच्यावर १० रुपये अनुदानाचा निर्णय रद्द करावा अन्यथा ३० जुलै रोजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jul 23, 2024 | 03:31 PM
काजू उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय, १० रुपये अनुदानाचा निर्णय रद्द करा, सतिश सावंत यांची मागणी
Follow Us
Close
Follow Us:

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या संख्येने काजू उत्पादक शेतकरी आहेत. या जिल्ह्यात पिकणाऱ्या काजूची गुणवत्ता ही सर्वोत्कृष्ठ दर्जाची आहे. या काजूला योग्य हमीभाव मिळावा अशी मागणी वारंवार येथील शेतकरी करीत होते. परंतु संदर्भीय शासन निर्णयाने प्रति किलो १० रुपये अनुदान शासनाने जाहीर केलेले आहे. तसेच किमान ५० किलो आणि कमाल २००० किलो अशी मर्यादा घालून दिलेली आहे. त्याचप्रमाणे विक्री केलेल्या काजूला व्यापाऱ्याकडून GST बील घ्यावे अशी अट घातलेली आहे. परिणामी या शासन निर्णयामुळे काजू उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय झालेला आहे.

केवळ शासनाने काजू उत्पादक शेतकऱ्यांची दिशाभूल केली. काजू उत्पादक शेतकऱ्यांवर अन्यायकारक 10 रुपये अनुदानाचा शासन निर्णय रद्द करण्यात यावा अशी मागणी शिवसेना उबाठा पक्षाचे सतिश सावंत यांनी केली आहे. अन्यथा 30 जुलै आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा शिवसेना उबाठा पक्षाची सतिश सावंत यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

दिलेल्या निवेदनात, काजू बी ला किलोमागे किमान ५० रु अनुदान शासनाने शेतकऱ्याना द्यावे आणि GST बिलाची अट रद्द करून शासनाने शेतकऱ्यांना सरसकट अनुदान द्यावे अशी आमची मागणी आहे. सदर शासन निर्णयात बदल करण्यात यावा. आपणाकडून अपेक्षित कार्यवाही न झाल्यास ३० जुलै २०२४ रोजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना सोबत घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आपल्या कार्यालयासमोर सदर शासन निर्णयाची काजू टरफले पेटवून होळी करून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल , असा इशारा सतीश सावंत यांनी दिला आहे.

Web Title: Satish sawant demand cancel the government decision of rs 10 subsidy on cashew farmers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2024 | 03:31 PM

Topics:  

  • kankavali
  • Shivsena Thackeray Group

संबंधित बातम्या

कणकवलीतील मराठा सांस्कृतिक भवनाचे उद्घाटन कधी होणार? पालकमंत्री नितेश राणेंनी तारीखच सांगितली
1

कणकवलीतील मराठा सांस्कृतिक भवनाचे उद्घाटन कधी होणार? पालकमंत्री नितेश राणेंनी तारीखच सांगितली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.