Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शाळेची वेळ 9 ची पण भरते 7 वाजता; शासनाच्या आदेशाला केराची टोपली

मुलांच्या वयाचा तसेच आरोग्याचा व्यापक विचार करता शासन एखादा निर्णय घेते. ज्या शाळेत विद्यार्थी प्रत्यक्ष शिक्षण घेतात, त्या शाळा मात्र विद्यार्थी हिताकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतात.

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 06, 2024 | 11:43 AM
होन्याळीच्या प्राथमिक शाळेत पहिलीत प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या घरफाळा माफीचा निर्णय

होन्याळीच्या प्राथमिक शाळेत पहिलीत प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या घरफाळा माफीचा निर्णय

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : लहान वयातील विद्यार्थ्यांचे आरोग्य व इतर बाबी लक्षात घेता पहिली ते चौथीपर्यंतची सकाळची शाळा 9 वाजता किंवा त्यानंतर भरविण्यात यावी, असे शासनाचे स्पष्ट आदेश आहेत. मात्र, असे असतानाही काही शाळा विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत आहेत. तसेच शासन आदेशाला न जुमानता सकाळची शाळा अद्यापही पूर्वीप्रमाणेच 7 किंवा 7.30 वाजता भरवत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

हेदेखील वाचा : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना किती वेतन मिळणार माहितीये का? ‘हा’ आकडा एकदा पाहाच…

विद्यार्थ्यांना सकाळी लवकर उठल्यामुळे झोपेची कमतरता निर्माण होते. सकाळी लवकर शाळेत जायचे असल्याने विद्यार्थी नाश्ता न करताच शाळेत जातात. पावसाळा, हिवाळा या ऋतूत सकाळी उठल्यामुळे आजाराचा धोका वाढू शकतो. पावसाळ्यात तथा हिवाळ्यात सकाळी पाऊस, धुके यामुळे प्रवासात धोका निर्माण होऊ शकतो. पालक तथा विद्यार्थ्यांची सकाळी शाळेच्या वेळी, विद्यार्थ्यांना तयार करणे, जेवणाचा डबा तयार करणे यासाठी मिळणाऱ्या कमी वेळामळे तारांबळ उडते.

मुलांच्या वयाचा तसेच आरोग्याचा व्यापक विचार करता शासन एखादा निर्णय घेते. ज्या शाळेत विद्यार्थी प्रत्यक्ष शिक्षण घेतात, त्या शाळा मात्र विद्यार्थी हिताकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतात. हा प्रकार निंदनीय आहे. शाळांनी शासन आदेशाचे तत्काळ पालन न केल्यास विद्यार्थी हितासाठी नक्कीच कायदेशीर लढा देण्यात येईल, असे पालकांचे म्हणणे आहे.

सकाळच्या सुमारास शाळेच्या वेळेबाबत ज्या शाळा शासन आदेशाचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर नियमानुसार योग्य ती कारवाई केली जाईल. बालवयातील विद्यार्थांचे आरोग्य, गैरसोय, प्रवास धोका, तसेच इतर काही बाबी लक्षात घेता वर्ग पहिली ते चौथीपर्यंत सकाळची शाळा ही 9 वाजता किंवा त्यानंतर भरविण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश आहेत. परंतु, अद्यापही काही शाळा मात्र सदर शासन आदेशाचे पालन करत नसल्याचे आढळून आले आहे.

याबाबत विद्यार्थी पालक संदीप गावंडे यांनी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना विचारणा केली असता त्यांना सक्षम कारण देता आले नाही. तसेच गटशिक्षणाधिकाऱ्यांना या प्रकाराबाबत अवगत केले असता शासन नियमांचे पालन न करणाऱ्या शाळांवर नियमानुसार कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

हेदेखील वाचा : Devendra Fadnavis: वडिलांना तुरूंगात टाकताच सोडली शाळा? काय आहे देवेंद्र फडणवीसांचा ‘तो’ किस्सा

Web Title: Schools not following timetable of government nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 06, 2024 | 11:43 AM

Topics:  

  • Maharashtra Education

संबंधित बातम्या

नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्राआधारे आता मिळणार शैक्षणिक कर्ज; राज्य सरकारचा ओबीसी विद्यार्थ्यांना दिलासा
1

नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्राआधारे आता मिळणार शैक्षणिक कर्ज; राज्य सरकारचा ओबीसी विद्यार्थ्यांना दिलासा

शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई; दोन शिक्षणाधिकाऱ्यांना अटक
2

शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई; दोन शिक्षणाधिकाऱ्यांना अटक

राज्यातील धोकादायक शाळा इमारतींचे सर्वेक्षण केले जाणार; शालेय शिक्षण राज्यमंत्र्यांची महत्त्वपूर्ण घोषणा
3

राज्यातील धोकादायक शाळा इमारतींचे सर्वेक्षण केले जाणार; शालेय शिक्षण राज्यमंत्र्यांची महत्त्वपूर्ण घोषणा

राज्यात उद्यापासून वाजणार शाळेची घंटा; नव्या शैक्षणिक वर्षाला होणार सुरुवात
4

राज्यात उद्यापासून वाजणार शाळेची घंटा; नव्या शैक्षणिक वर्षाला होणार सुरुवात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.