Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशात बेरोजगारी वाढली, कांद्याला भाव नाही, शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही’, सामान्यांच्या प्रश्नांवरून शरद पवारांची मोदी सरकारवर टीका

  • By युवराज भगत
Updated On: Aug 25, 2023 | 09:22 PM
देशात बेरोजगारी वाढली, कांद्याला भाव नाही, शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही’, सामान्यांच्या प्रश्नांवरून शरद पवारांची मोदी सरकारवर टीका
Follow Us
Close
Follow Us:
Sharad Pawar Kolhapur Sabha : शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करीत आहेत. जीव जाणे ही साधी गोष्ट नाही. शेतीमालाला भाव नाही. शेतकऱ्याच्या डोक्यावर कर्ज आहे. नाशिकमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या घामाची किंमत मिळत नाही. कांदा हा जगात पाठवला पाहिजे. मात्र, मोदी सरकारने या कांद्यावर प्रचंड कर बसवलेला आहे. बाहेर देशात या कांद्याला ग्राहक मिळत नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन केली. पण केंद्र सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत आहे, असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले आहेत.
भाजप सरकारवर जोरदार टीकास्त्र
कोल्हापूर येथील जाहीर सभेत बोलताना शरद पवार यांनी भाजप सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. देशात वाढत असलेल्या बेरोजगारीवरून केंद्र सरकारला लक्ष्य करीत ते म्हणाले की, या सरकारमध्ये लोक महागाईने त्रासले आहेत. आम्ही कष्ट करायला तयार आहे, घाम गळायला तयार आहे, आम्हाला नोकरी द्या अशी मागणी देशातील तरुण करीत आहेत.
दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचे वर्षभर आंदोलन
शरद पवार म्हणाले की, दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचे वर्षभर आंदोलन झाले. दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी कुटुंबासोबत आंदोलन केले. मोदी सरकारने त्यांच्या सहकार्याने त्यांच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. देशाच्या इतिहासात शेतकऱ्यांचा एवढा मोठा अपमान कुठल्याही सरकारने केला नाही.
मणिपूर हिंसाचारावर काही नाही
शरद पवार पुढे म्हणाले की, मणिपूरमध्ये दोन समाजाचा संघर्ष आहे. आया बहिणींची धिंड काढली जात आहे. ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांनी महिलांना सुरक्षा दिली नाही. आया बहिणींना सुरक्षा देण्याची ताकद ज्यांच्यात नाहीत, त्यांना सत्तेत बसण्याचा अधिकार नाही.
तेरा महिने राज्याचा गृहमंत्री तुरुंगात
ते म्हणाले की, आज सत्तेचा वापर विरोधी पक्षांच्या लोकांना त्रास देण्यासाठी होत आहे. तेरा महिने राज्याचा गृहमंत्री तुरुंगात जातो. त्यांना आमच्या गटात या, असे सांगण्यात आले, जर आला नाही तर, तुमची जागा तुरुंगात आहे, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Sharad pawars criticism of modi government from common questions they say unemployment has increased in country onion has no price farmers goods have no price nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2023 | 09:16 PM

Topics:  

  • NCP Chief Sharad Pawar

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.