Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Supreme Court News: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थगित होणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

या आदेशामुळे स्थगितीच्या छायेत असलेल्या जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकांच्या प्रक्रियेला आता गती मिळण्याची शक्यता वाढली आहे. निवडणूक आयोगाने न्यायालयाच्या सूचनांचे पालन करून पुढील पावले उचलण्याची तयारी सुरू केली आ

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 28, 2025 | 02:28 PM
Supreme Court News:

Supreme Court News:

Follow Us
Close
Follow Us:
  •  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण
  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग अखेर मोकळा
  • जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकांच्या प्रक्रियेला आता गती
 

Supreme Court News:  राज्यातील जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकांबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण लागू केल्याच्या आक्षेपांवर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court)  आज (28 नोव्हेंबर) सुनावणी झाली. यावेळी खंडपीठाने निवडणूक आयोगाला आरक्षणाची मर्यादा 50% पेक्षा अधिक होणार नाही, याची विशेष काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत.

राज्य सरकारच्या या निर्णयानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. या प्रकरणातील याचिकांवर सुनावणी करताना सरन्यायाधीश सूर्यकांत शर्मा आणि न्यायमूर्ती जयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला. या आदेशामुळे स्थगितीच्या छायेत असलेल्या जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकांच्या प्रक्रियेला आता गती मिळण्याची शक्यता वाढली आहे. निवडणूक आयोगाने न्यायालयाच्या सूचनांचे पालन करून पुढील पावले उचलण्याची तयारी सुरू केली आहे.

Maharashtra Politics : महायुती 2 तारखेपर्यंत; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्याने उडणार राजकीय

सुनावणीत नेमकं काय घडलं?

सर्वोच्च न्यायालयात आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील (Local Body Election) आरक्षण मर्यादेबाबत तीन प्रमुख मुद्द्यावर सुनावणी झाली. निवडणूक आयोगाचे वकील बलबीर सिंह न्यायालयाला बोलताना म्हणाले की, ‘ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांची आता निवडणूक होणार आहे, त्यापैकी सुमारे 22% ठिकाणी आरक्षण 50% पेक्षा जास्त गेले आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने ठरविलेल्या मर्यादेनुसार ही परिस्थिती समस्या निर्माण करणारी आहे.”

बलबीर सिंह यांच्या युक्तीवादावर सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठाने महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले. ते म्हणाले की, ‘राज्यातील 40 नगरपालिकांमध्ये आरक्षणाची टक्केवारी वाढली आहे, हे नोंदवून न्यायालयाने म्हटलं की या 40 ठिकाणांचा अंतिम निकाल हा आरक्षणाबाबत पुढे होणाऱ्या सर्वोच्च निर्णयावर अवलंबून राहील. तसे न झाल्यास, त्या नगरपालिकांच्या निवडणुका स्थगित कराव्या लागू शकतात,’ असेही त्यांनी म्हटले.

त्यानंतर ओबीसी आरक्षण हक्क समितीच्या वतीने बाजू मांडताना वरिष्ठ वकील ॲड. इंदिरा जयसिंग यांनी न्यायालयाच्या प्रस्तावाला सहमती दर्शवली. “आरक्षण मर्यादेबाबत स्पष्ट आणि अंतिम निर्णय येईपर्यंत अशा ठिकाणांच्या निवडणुकांबाबत सावधगिरी बाळगणे योग्य राहील.” असे अॅड इंदिरा जयसिंग यांनी स्पष्ट केलं.

Maharashtra Politics: राज्य सरकारचा मोठा निर्णय; आधार वापरून दिले जाणारे जन्म प्रमाणपत्र रद्द करण्याचे

ओबीसी आरक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या बांठिया आयोगाने ओबीसींसाठी केवळ 50 टक्क्यांपर्यंतच आरक्षण मर्यादित केले आहे. त्यामुळे त्याला विरोध असल्याचे वरिष्ठ वकिल इंदिरा जयसिंग यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. या भूमिकेमुळे अनेक ठिकाणी ओबीसी समाजाला आरक्षण मिळत नसल्याचाही त्यांनी उल्लेख केला. जयसिंह यांच्या या युक्तीवादावर सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी संबंधित आयोगाचा अहवाल अद्याप वाचलेला नसल्याचे स्पष्ट केले.

त्यानंतर सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी जानेवारी 2026 च्या दुसऱ्या आठवड्यात तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होणार असल्याचे सांगितले. यावेळी अ‍ॅड. विकास सिंह यांनी त्या काळापर्यंत निवडणुका होऊ देऊ नयेत, अशी मागणी न्यायालयासमोर केली.

सरन्यायाधीश सुर्यकांत म्हणाले की, “मागील आदेशानुसार महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने न्यायालयाच्या विचारार्थ एक संक्षिप्त नोंद सादर केली आहे. राज्यातील केवळ 40 नगरपरिषद आणि 17 नगरपंचायतींमध्येच ओबीसी आरक्षणाचा टक्का 50 पेक्षा जास्त असल्याचे आयोगाने नोंदवले आहे.   त्यामुळे उद्भवणाऱ्या कायदेशीर मुद्द्यांचा हा विषय तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे वर्ग करण्याचे निर्देश देण्यात आले.

दरम्यान, इतर नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका अधिसूचित वेळापत्रकानुसार घेता येतील. मात्र, वरील 40 नगरपरिषद आणि 17 नगरपंचायतींचे निवडणूक निकाल ही कार्यवाही प्रलंबित असताना अंतिम निकालाच्या अधीन असतील, असही सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी स्पष्ट केलं.

 

Web Title: Supreme court news local body elections will not be postponed supreme courts big decision

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 28, 2025 | 01:12 PM

Topics:  

  • Supreme Court of India

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.