Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्रासह गुजरातमध्येही वाढतोय तापमानाचा पारा; चंद्रपूर चांगलंच तापलं, तापमान पोहोचलं…

गुजरातसह महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्येही कमालीचा उकाडा जाणवत आहे. असे असले तरी शनिवारपासून तापमानात घसरण येईल, असा दिलासा हवामान खात्याने दिला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 15, 2025 | 07:22 AM
राज्यात उन्हाचा कडाका वाढला; अकोल्यात तापमानाचा पारा 43.5 अंशांवर तर मुंबईत...

राज्यात उन्हाचा कडाका वाढला; अकोल्यात तापमानाचा पारा 43.5 अंशांवर तर मुंबईत...

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. त्यात मार्च महिन्याच्या मध्यातच उन्हाच्या तीव्र झळा सोसाव्या लागत आहेत. असे असताना देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये होळी उत्साहात साजरी करण्यात आली. सामान्यतः होळीनंतर उष्णता वाढण्यास सुरुवात होते, परंतु, यंदा हवामानातील बदलामुळे होळीआधीच कमालाची उकाडा जाणवत आहे.

सध्या महाराष्ट्रासह गुजरात राजधानी दिल्लीतील इतर शहरांमध्ये सूर्य आग ओकत आहे. गुजरातसह महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्येही कमालीचा उकाडा जाणवत आहे. असे असले तरी शनिवारपासून तापमानात घसरण येईल, असा दिलासा हवामान खात्याने दिला आहे. दिल्लीत शुक्रवारी कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले, जे की सामान्यपेक्षा 5.5 अंश सेल्सिअसने जास्त होते. तर किमान तापमान 18.6 अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली आहे.

दोन दिवस ढगाळ वातावरण राहणार

15 आणि 16 मार्च या दोन दिवस ढगाळ वातावरण राहील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. स्कायमेटच्या मते, 15 मार्चपासून उष्णतेची लाट कमी होईल. कमाल तापमान 30 अंशांच्या आसपास राहू शकते.

अनेक राज्यात उष्णतेचा तडाखा

होळीपूर्वीच गुजरात, महाराष्ट्र आणि राजस्थानमधील अनेक भाग उष्णतेच्या लाटेच्या तडाख्यात आहेत. गुजरात-राजस्थानमधील डझनभराहून अधिक शहरांमध्ये तापमानाने ४० अंशांचा टप्पा ओलांडला आहे. अनेक ठिकाणी तापमान सामान्यपेक्षा ८.८ अंश सेल्सिअसने जास्त आहे. चंद्रपूरात 41 अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाचा पारा गेल्याचे दिसून आले.

विदर्भातील अनेक शहरांमध्ये तापमानात वाढ

साधारणत: एप्रिल आणि मे महिन्यात पडणारा उष्मा यंदा मार्चमध्येच जाणवत आहे. फेब्रुवारीअखेरपर्यंत अकोल्यातील कमाल तापमान 28 ते 32 अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते, मात्र, मार्चच्या सुरुवातीपासून त्यात झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या पाच दिवसांपासून अकोल्यातील तापमान 39 ते 41 अंशांच्या दरम्यान दिसून आले. वाढत्या उन्हामुळे दुपारी बारानंतर रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी गर्दी कमी होताना दिसत आहे.

Web Title: Temperatures are rising in maharashtra and gujarat as well chandrapur is getting very hot nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2025 | 07:14 AM

Topics:  

  • Increase in Temperature
  • Maharashtra Weather
  • Weather Update

संबंधित बातम्या

India Rain Alert: मोठे संकट येणार! जून महिन्यातच मान्सूनवर…; प्रशांत महासागराच्या तापमानात वाढ
1

India Rain Alert: मोठे संकट येणार! जून महिन्यातच मान्सूनवर…; प्रशांत महासागराच्या तापमानात वाढ

उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा हाहा:कार; तीव्र वादळामुळे 62 जणांचा मृत्यू, अनेक जिल्ह्यांत वीजपुरवठा खंडित
2

उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा हाहा:कार; तीव्र वादळामुळे 62 जणांचा मृत्यू, अनेक जिल्ह्यांत वीजपुरवठा खंडित

अकोल्यातील तापमानात पुन्हा वाढ; पारा 45.6 अंशांवर, उन्हाचे बसत आहेत चटके
3

अकोल्यातील तापमानात पुन्हा वाढ; पारा 45.6 अंशांवर, उन्हाचे बसत आहेत चटके

Monsoon Update : 25 ते 27 मेदरम्यान केरळमध्ये दाखल होणार मान्सून, पाच राज्यांसाठी दिला ‘हा’ इशारा
4

Monsoon Update : 25 ते 27 मेदरम्यान केरळमध्ये दाखल होणार मान्सून, पाच राज्यांसाठी दिला ‘हा’ इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.