IMD Rain Alert News: हवामान विभागाने उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये पुढील पाच दिवस पाऊस, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता वर्तवली आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Maharashtra Weather: महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल पाहायला मिळत असून यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबईसह काही भागांत वाढत्या उष्णतेमुळे येलो अलर्ट देण्यात…
द्रोणीय रेषेमुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले असून, उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्र वगळता अनेक भागांत पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मात्र, ढगाळ वातावरण असूनही उकाड्याची झळ कायम आहे.
दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतात ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने सोसाट्याचा वाऱ्याचा अंदाज आहे, तर पूर्व उत्तर प्रदेश, झारखंड आणि ओडिशामध्ये मेघगर्जना आणि गारपीट होईल, अशी शक्यता आहे.
पशुधनास तसेच पाळीव प्राण्यांना छावणीत ठेवण्यात यावे. तसेच त्यांना पुरेसे पिण्याचे पाणी देण्यात यावे. वीज, वारा व पावसापासून बचावाकरिता सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्यात यावा. अशा स्थितीत झाडाखाली आश्रय घेऊ नये.
परभणीचे तापमान दोन दिवसांपासून ४२ अंशावर गेले आहे. यातच साडूला भेटण्यासाठी आलेल्या नाशिक येथील ३७ वर्षीय इसमाचा येथे उन्हाचा तडाखा बसल्याने मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
२२ ते २५ एप्रिल दरम्यान धाराशिव जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून संभाव्य अवकाळी पाऊस व वादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले आहे. नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
धाराशिव तालुक्यात अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच वीज कोसळल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
गेल्या आठ दिवसांत कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदविले गेले असून, लोहगाव परिसर सर्वाधिक तापमानाने अक्षरशः तापला आहे. ‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर उष्णतेचा प्रभाव अधिक तीव्र जाणवत असल्याने आरोग्य यंत्रणाही सतर्क…
सोमवारी दुपारी चारच्या सुमारास लक्ष्मण भंडारे शेतात काम करत असताना अचानक चक्कर येऊन कोसळले. त्यांना तातडीने औराद शहाजानी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
उष्णतेच्या वाढत्या झळा, आटत चाललेले जलस्रोत आणि कोसळणारी भूगर्भ जलपातळी यामुळे राज्य दुष्काळसदृश परिस्थितीकडे वाटचाल करत असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात भूगर्भजलपातळी सातत्याने खालावत आहे.
उन्हाच्या तीव्रतेनंतर वातावरणात बदल होत ढगाळ स्थिती निर्माण झाली असून तापमान ४० अंशांवरून ३५ अंशांपर्यंत खाली आले आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे.
देशभरातील हवामान झपाट्याने बदलत आहे. एकीकडे अनेक राज्यांमध्ये तीव्र उष्णता आणि उष्णतेच्या लाटा जाणवत आहेत, तर दुसरीकडे मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे.
सध्याच्या हवामान अंदाजानुसार १९ एप्रिल रोजी पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसर, तसेच उत्तर खानदेश आणि दक्षिण मराठवाड्यातील काही भागांमध्ये दुपारनंतर वादळी पावसाची शक्यता आहे.
दिल्लीत अचानक आलेल्या या पावसामुळे वाहनचालकांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. रात्रभरात अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे दिल्ली आणि एनसीआरच्या अनेक भागांमध्ये पाणी साचले.
अकोल्यात मंगळवारी 44 अंश सेल्सिअस तापमान होते. एल डोराडो हे संकेतस्थळ जागतिक तापमानाची नोंद ठेवते आणि या संकेतस्थळावर अकोल्याची जगातील दुसरे 'उष्ण' शहर म्हणून नोंद करण्यात आली.
यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने हा अंदाज अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
आज दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स हे संघ दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर आमनेसामने येणार आहेत. मात्र या सामन्यावर पावसाचे सावट असणार आहे. दिल्लीत आज पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.