Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

माण तालुक्याच्या पश्चिमेस संततधार सुरु; तरीही 28 गावांसह 218 वाड्या-वस्त्यांना टँकरने पुरवठा

दहिवडी कुळकजाई हा रस्ता सिंदीखुर्द येथील ओढ्यावर पाणी असल्याने दिवसभर वाहतुकीसाठी बंद पडला होता. या रस्त्यावरील नवीन पुलाचे काम सुरू असून, तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी पूल केला होता.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 24, 2025 | 12:17 PM
राज्यातील विविध भागांना मुसळधार पावसानं झोडपलं

राज्यातील विविध भागांना मुसळधार पावसानं झोडपलं

Follow Us
Close
Follow Us:

दहिवडी / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : माण तालुक्यात सलग चार दिवसांपासून दमदार पावसाने हजेरी लावली असून, माण तालुक्याच्या पश्चिमेच्या भागात पावसाने जोर धरला आहे. शुक्रवारी पूर्ण दिवसभर दहिवडी, बिदाल, मलवडी, शिरवली, परकंदी, महिमानगड, पिंगळी, आंधळी, बिजवडी, कासारवाडी या गावांसह सर्वच भागात पावसाची संततधार सुरू होती. या पावसामुळे अनेक ठिकाणी ओढे-नाले ओसंडून वाहत होते.

दहिवडी कुळकजाई हा रस्ता सिंदीखुर्द येथील ओढ्यावर पाणी असल्याने दिवसभर वाहतुकीसाठी बंद पडला होता. या रस्त्यावरील नवीन पुलाचे काम सुरू असून, तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी पूल केला होता. मातीचा भरावा असलेला पर्यायी पूल खचल्याने या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद होती. गेल्या चार दिवस पावसाची संततधार सुरू असल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. त्या पावसामुळे जनावरांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.

तसेच टोमॅटो, आंबासारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसानही पाहायला मिळत आहे. भुईमूग पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मध्यंतरी वादळी वारा सुटल्याने कडवळसारखी चारा पिके भुईसपाट झाली आहेत.

अजूनही २८ गावांसह २१८ वाड्या वस्त्यांना टँकर सुरु

माण तालुक्यातील २८ गावांसह २१८ वाड्या वस्त्यांना शासकीय ३ खासगी ३१ टँकरच्या ५९ खेपाव्दारे पाणीपुरवठा सुरु आहे. टँकर सुरु असलेल्या गावाचे नावे पुढीलप्रमाणे बिजवडी, मोही, डंगिरेवाडी, थदाळे, वावरहिरे, अनभुलेवाडी, दानवलेवाडी, हस्तनपुर, सोकासन, धुळदेव, वरकुटे म्हसवड, कारखेल, भाटकी, खडकी, रांजणी, हवालदारवाडी, जाशी, पळशी, पिंगळी बु.,मार्डी , खुटबाव, पर्यंती, इंजबाव, भालवडी, विरळी, वारुगड, उकिर्डे, दोरगेवाडी अशा एकूण २८ गावे आणि २१८ वाडयाचा समावेश आहे.

मान्सूनपूर्व पावसाचा बसतोय मोठा फटका

महाराष्ट्राच्या अनेक भागांत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरूच आहे. या मान्सूनपूर्व पावसाचा मोठा फटका हा राज्याला बसला आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. या पावसामुळे काही ठिकाणी दुर्घटना देखील घडल्या आहेत. दरम्यान, आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Web Title: The continuous flow of water has started in the west of man taluka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2025 | 12:17 PM

Topics:  

  • Climate Change
  • Maharashtra Rain
  • water issues

संबंधित बातम्या

Shakti Cyclone: समुद्र खवळणार! अरबी समुद्रात ‘शक्ती’अधिक तीव्र होणार; गुजरातपासून फक्त…
1

Shakti Cyclone: समुद्र खवळणार! अरबी समुद्रात ‘शक्ती’अधिक तीव्र होणार; गुजरातपासून फक्त…

पूरस्थितीत शेती गेली वाहून…! राज्य सरकार कधी देणार मदत स्वतःहून
2

पूरस्थितीत शेती गेली वाहून…! राज्य सरकार कधी देणार मदत स्वतःहून

Maharashtra Rain: मेघालय, चेरापुंजी विसरा! महाराष्ट्रातील ‘या’ जागेवर केलाय पावसाने कहर
3

Maharashtra Rain: मेघालय, चेरापुंजी विसरा! महाराष्ट्रातील ‘या’ जागेवर केलाय पावसाने कहर

Beed : पंधरा गावातील सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली,जनजीवन विस्कळीत
4

Beed : पंधरा गावातील सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली,जनजीवन विस्कळीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.