मंगळवारी हवामान खात्याने शहराचे किमान तापमान ७.६ अंश सेल्सिअस नोंदवले, जे सरासरीपेक्षा ५ अंश कमी आहे. थंडीच्या लाटेमुळे २४ तासांत शहराचे तापमान ६ अंशांनी कमी झाले.
भारतीय हवामान खात्याने मंगळवारी दिल्लीत कमाल तापमान १३ ते १६ अंश सेल्सिअस दरम्यान असल्याचे सांगितले. पालम आणि लोधी रोड भागात थंड दिवसाची स्थिती नोंदवण्यात आली.
पुणे आणि परिसरात किमान तापमान ८ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले होते. त्यामुळे सकाळी आणि रात्री गारठा जाणवत होता. शनिवारी किमान तापमान १०.१ अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस नोंदवले…
राज्याच्या एकूण हरित वायू उत्सर्जनापैकी तब्बल ८२ टक्क्यांहून अधिक उत्सर्जन ऊर्जा क्षेत्रातून होत आहे. त्यात सौरऊर्जा, पवनऊर्जा, जलविद्युत, बायो-ऊर्जा, भरती-आहोटीची ऊर्जा या अपारंपरिक ऊर्जेचा वाटा अद्याप २०%च्याही आत आहे.
उत्तर भारतात तीव्र थंडीचा कडाका जाणवत आहे. अनेक राज्यांतील तापमान शून्यापेक्षाही खाली गेल्याचे दिसून येत आहे. अनेक राज्यांत तीव्र थंडी, दाट धुके आणि प्रदूषणाच्या एकत्रित समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
हरियाणा, पंजाब, चंदीगड, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये कडाक्याची थंडी जाणवत आहे. एका नवीन पश्चिमी विक्षोभामुळे पर्वतांमध्ये बर्फवृष्टी आणि तीव्र थंडी आली आहे.
गेल्या चार दिवसांपासून पारा किमान पातळी गाठत आहे. त्यामुळे नागपूरकर जॅकेट, स्वेटरबंद झाले आहेत. कमाल तापमान २९-३० दरम्यान असल्याने दुपारी नागरिकांना किंचित दिलासा मिळत असला.
दिल्ली-एनसीआर, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये थंडीची लाट तीव्र होत आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरच्या उंच भागात शून्याखालील तापमानामुळे जीवनमान कठीण झाले आहे.
शहरात १० अंश सेल्सिअस किमान तर २८ अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदविण्यात आले आहे. परिणामी थंडीमध्ये मोठी वाढ झाली आहे. पुणे आणि परिसरामध्ये मंगळवारी (ता. २) आणि बुधवारी (ता. ३)…
सध्या तामिळनाडूच्या अनेक किनारी जिल्ह्यांमध्ये आधीच मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहत आहेत. त्यानंतर आता या चक्रीवादळाचे संकट आहे. चक्रीवादळ डिटवा दक्षिण भारताच्या किनाऱ्याकडे वेगाने सरकत आहे.
मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई, रायगड या परिसरात पहाटेच्या वेळी थंडी स्पष्ट जाणवत आहे. उपनगरात सकाळी प्रवास करणाऱ्या नागरिकांना हुडहुडी जाणवत असून तापमानात हलकी घट नोंदली जाते.
तापमानाचा पारा घसरताना दिसत आहे. सध्या कमाल 30 आणि किमान 12 अंश सेल्सियसपर्यंत तापमान घसरले आहे. काही ठिकाणी धुकेही पाहायला मिळत आहेत. त्यामुळे चालू आठवड्यात तापमानात आणखी घट होऊन झोंबणारी…
राज्यात सामान्यतः या महिन्यात 'ऑक्टोबर हिट'मुळे विजेच्या मागणीत वाढ होत असते. याचा परिणाम म्हणून सर्व वीज उत्पादन कंपन्यांना क्षमता वाढवावी लागते. तर वितरण संस्थांना ग्राहकांना सातत्यपूर्ण पुरवठा देण्यासाठी दबाव वाढतो.
याशिवाय, मध्य प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडला. भोपाळ, इंदूर आणि उज्जैन येथेही जोरदार वारे वाहत होते. गुरुवारी सकाळी जयपूर, अलवर आणि करौलीसह राजस्थानातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस…
आता थोड्याशा वादळी पावसाने ही माती बसेल. पण पुन्हा धुरळाच पाहायला मिळणार आहे. अमावास्येच्या तोंडावर पाऊस लागेल, अशी शक्यता होती. पण आता वादळी पावसाने पुन्हा सुरुवात केली आहे.
राजकारणात न जाता, संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणे ही सरकारची जबाबदारी आहे. पण हे सरकार ती पाळत नाही. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या मदतीच्या घोषणांनाही फोल ठरली आहे.
दक्षिण भारत वगळता देशभरातील किमान तापमानात सरासरीपेक्षा १ ते ३ अंश सेल्सिअसने घट होईल. तसेच कमाल तापमानदेखील सरासरीच्या कमी राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
याशिवाय, गुजरात आणि पश्चिम उत्तर प्रदेशच्या बहुतेक भागांतूनही मान्सून परतला आहे. राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरील उत्तर प्रदेशातील भागातून मान्सून माघार घेण्यास सुरुवात झाली.