Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तळपत्या उन्हात आदिवासी नागरिकांची घोटभर पाण्यासाठी पायपीट; शाळा सोडून विद्यार्थी भरतायेत पाणी

इगतपुरी तालुक्यातील आदिवासी बांधवांची पाण्यासाठी पायपीट होत आहे. यामुळे खरंच हा का धरणांचा तालुका असा प्रश्न निर्माण होतो.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 28, 2024 | 12:47 PM
तळपत्या उन्हात आदिवासी नागरिकांची घोटभर पाण्यासाठी पायपीट; शाळा सोडून विद्यार्थी भरतायेत पाणी
Follow Us
Close
Follow Us:

इगतपुरी : उन्हाळ्याची चाहूल लागताच राज्यामध्ये पाणीटंचाईची समस्या डोके वर काढत आहे. इगतपुरी तालुका हा धरणांचा तालुका म्हणून नावाजला जातो. इगतपुरी तालुक्यात अनेक छोटी मोठी धरणे आहेत. महाराष्ट्रात सर्वात जास्त पर्जन्यमान इगतपुरी तालुक्यात होते. मात्र याच इगतपुरी तालुक्यातील आदिवासी बांधवांची पाण्यासाठी पायपीट होत आहे. यामुळे खरंच हा का धरणांचा तालुका असा प्रश्न निर्माण होतो.

इगतपुरी तालुक्यातील वाकी खापरी धरणाजवळील अतिदुर्गम भागातील खडकवाडी येथील आदिवासी बांधव वास्तव्यास आहेत. मात्र या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी सकाळपासून या भागातील महिला, पुरुष यांना कामाचा खाडा करून तसेच लहान मुले यांची शाळा बुडवून पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. हसण्या खेळण्याच्या आणि शिक्षण घेण्याच्या वयात येथील लहान मुलांना डोंगर दऱ्या, जंगल खोऱ्यातून पाण्यासाठी जावे लागत आहेत. या भागामध्ये श्वापदांची देखील भीती आहे. त्यामुळे जीव मुठीत घेऊन हे आदिवासी बांधव पाण्यासाठी वणवण फिरत आहेत.

उन्हाच्या झळा आत्ताच बसू लागल्या आहेत. त्यामध्येच वाढती पाणीटंचाई सर्वांची डोकेदुखी वाढवत आहे. खडकवाडीतील बांधव पाण्यासाठी जीवावर उदार होऊन सहा ते सात किलोमीटर रणरणत्या उन्हातून चालत जात आहेत. एका लहानशा पाणी साचलेल्या डबक्यापाशी येऊन त्यांची पायपीट थांबते. जे पाणी जनावरेही पिणार नाही असे गढूळ आणि जंतू असलेले पाण्यातून या बांधवांना तहान भागविण्याची वेळ आली आहे. केंद्र शासनाची ‘हर घर नल हर घर जल’ या योजना या दुर्गम भागांपर्यंत अद्याप पोहचलेली देखील नाही. यावरुन महाराष्ट्र आदिवासी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष लकी जाधव आक्रमक झाले आहेत. ते म्हणाले, “निवडणुका येतात निवडणुका जातात मात्र आदिवासी बांधवांची घोटभर पाण्यासाठी होणारी पायपीट या लोकप्रतिनिधीं ना कधी दिसणार,” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. “शिक्षण घेण्याचा वयात शाळा बुडवून पाण्यासाठी मुलांना भटकंती करावी लागतेय यापेक्षा वेगळा आत्मनिर्भर भारत कसा असेल हे सांगायला नको.पाण्यासाठी आदिवासी बांधवांच्या डोळ्यात पाणी येतेय. जर या योजनेच्या कामाची चौकशी केली नाही तर येणाऱ्या निवडणुकीत आदिवासी समाज मतदानावर बहिष्कार टाकल्या शिवाय शांत बसणार नाही” असा आक्रमक पवित्रा लकी जाधव यांनी घेतला आहे.

Web Title: The tribal brothers of igatpuri taluka are struggling for water nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2024 | 12:47 PM

Topics:  

  • maharashtra news
  • Water Shortage

संबंधित बातम्या

Maharashtra Rain Update: महाराष्ट्र पावसाचा कहर! समुद्र खवळला, नद्यांची पातळीही ओलांडली
1

Maharashtra Rain Update: महाराष्ट्र पावसाचा कहर! समुद्र खवळला, नद्यांची पातळीही ओलांडली

Maharashtra 1st Conclave 2025: महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारे व्यासपीठ…
2

Maharashtra 1st Conclave 2025: महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारे व्यासपीठ…

परभणीच्या येलदरी धरणासाठी पाऊस ठरला फायद्याचा; धरणात तब्बल 95 टक्के जलसाठा
3

परभणीच्या येलदरी धरणासाठी पाऊस ठरला फायद्याचा; धरणात तब्बल 95 टक्के जलसाठा

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सक्रिय सहभाग घेऊन गावे आत्मनिर्भर करावीत : पालकमंत्री जयकुमार गोरे
4

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सक्रिय सहभाग घेऊन गावे आत्मनिर्भर करावीत : पालकमंत्री जयकुमार गोरे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.