Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“अशोक चव्हाण यांचे पुनर्वसन न करता महाराष्ट्राच्या राजकारणाबाहेर टाकले”; पृथ्वीराज चव्हाणांची उपहासात्मक टीका

  • By युवराज भगत
Updated On: Feb 15, 2024 | 06:54 PM
Throw Ashok Chavan out of Maharashtra politics without rehabilitating him; Satirical criticism of Prithviraj Chavan

Throw Ashok Chavan out of Maharashtra politics without rehabilitating him; Satirical criticism of Prithviraj Chavan

Follow Us
Close
Follow Us:
पुणे : ‘अशोक चव्हाण यांच्या भाजपसोबत वाटाघाटी बऱ्याच दिवसांपासून चालल्या होत्या. त्यांना उपमुख्यमंत्री आणि अजून महत्त्वाचे एक पद पाहिजे होते. ते मान्य झाले नाही. एका दृष्टीने त्यांना महाराष्ट्राच्या बाहेरच टाकले आहे. अशोक चव्हाण यांनी ते मान्य केले. त्यांना शुभेच्छा अशा शब्दात काँग्रेस पक्षाचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अशोक चव्हाण यांच्यावर उपहासात्मक टीका केली.
तीन वेळा बदलला कार्यक्रम
अशोक चव्हाण यांच्यासोबत भाजपमध्ये कोण जात आहे, अशा काही वावड्या उठवल्या जात आहेत. मात्र त्यांचेच पुनर्वसन झाले नाही, ते दुसऱ्यांचे काय संरक्षण करणार, असा सवालही पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. ते कार्यक्रमानिमित्त पुण्यात आले असता पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, ‘अशोक रावांच्या प्रवेशाचा कार्यक्रम दिल्लीत जे.पी नड्डा यांच्यासमोर ठरला होता. तो झाला नाही. मग छत्रपती संभाजीनगर येथे अमित शहा यांच्या उपस्थितीत ठरला होता. पण, आरएसएसच्या लोकांनी तीव्र निषेध केला. तिथला शाह यांचा दौरा रद्द झाला. यामुळे प्रवेशाचा कार्यक्रम मुंबईत घ्यावा लागला.’
‘पक्षातून कोणताही नेता गेला तरी नुकसान हे होतेच. लोकांना भाजपच्या कार्यशैलीबद्दल चीड आहे. त्याचा आम्हाला फायदा होईल. परंतु कार्यकर्त्यांनी सोडून जाऊ नये असाच आमचा प्रयत्न असतो. पण त्यांची कोणती अपरिहार्यता होती हे आम्हाला माहीत नाही.
भारत आणि महाराष्ट्रातील जनता पाहतेय
नरेंद्र मोदी आणि भाजप एकीकडे नेत्यांना भ्रष्टाचारी, ७० कोटींचा घोटाळा केला म्हणतात आणि नंतर त्यांना पक्षात सहभागी करून घेतात. नक्की त्यांची विचारधारा काय आहे? किती संधीसाधू राजकारण ते करीत आहेत. हे भारत आणि महाराष्ट्रातील जनता पाहात आहे. संसदेच्या अधिवेशनात आदर्श घोटाळ्याचा उल्लेख श्वेतपत्रिकेवर केला आहे. यानंतर दोन दिवसांत हा पक्षप्रवेश झाला. सत्ताधाऱ्यांनी राज्यसभेसाठी जे सहा उमेदवार दिले आहेत, त्यातील तीन माजी काँग्रेसचेच असल्याचेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

Web Title: Throw ashok chavan out of maharashtra politics without rehabilitating him satirical criticism of prithviraj chavan nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2024 | 06:53 PM

Topics:  

  • Deputy Chief Minister Ajit Pawar

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.